शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

'आधी पोटोबा मग विठोबा' हे बरोबर आहे का? शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:15 IST

अनेक गोष्टींची आपल्याला सवय असते परंतु त्या सवयी योग्य आहेत की अयोग्य ते वेळोवेळी तपासून घ्यावे.

आपल्यापैकी अनेकांना सवय असते, सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्कीट खाण्याची! ही सवय एवढी अंगवळणी पडते, की अनेकदा या सवयीमुळे उपास तुटतो. कारण आज उपास आहे आणि उपासाला बिस्कीट खाल्लेले चालत नाही, हे लक्षातच येत नाही. परंतु हा सवयीचा भाग योग्य आहे की अयोग्य, याबाबत शास्त्र काय सांगते, ते पाहू!

शास्त्रात म्हटले आहे, की अंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये. उठल्यावर आपल्या दिनचर्येची सुरुवात प्रसन्न व्हावी, यासाठी व्यायाम, अंघोळ, पूजाआणि नंतर न्याहारी असा शास्त्राने क्रम ठरवून दिला आहे. ज्यांना औषध घ्यावे लागते, त्यांचा अपवाद वगळता सुदृढ लोकांनी अंघोळ केल्याशिवाय न्याहारी करू नये, असे म्हटले आहे. सकाळी उठल्यापासून विषय सुखात मन अडकवून न घेता परमात्म्याचे चिंतन करावे मग अन्य विषयांचा विचार करावा, ही त्यामागील भावना आहे. त्याला विज्ञानाने देखील पुष्टी दिली आहे. 

विज्ञान सांगते -व्यायाम केल्याने शरीरातून येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. स्नान केल्याने ती पातळी संतुलित होते. शरीराला शीतलता आणि स्फूर्ती येते आणि भूक देखील लागते. भूक लागल्यानंतर आपण काही खाल्ले तर ते अन्न शरीराला जास्त पुष्टिवर्धक असते. अंघोळ करण्यापूर्वी काही खाल्ले, तर जठराग्नी ते पचवण्याचे कार्य करते. त्यानंतर अंघोळ केल्यास ते थंड पडते आणि पचनक्रिया मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि पचनक्रियेचे आजार उद्भवतात. पोटात वात धरतो आणि दिवसभर अस्वस्थता जाणवते. 

म्हणून सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप, मध लिंबू पाणी, कोमट पाणी असे द्रव पदार्थ काहीही प्या, परंतु व्यायाम, अंघोळ, पूजा झाल्यानंतरच अन्नाचे सेवन करा.