शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या आयुष्याशी करू नका-गौर गोपालदास प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:38 IST

प्रत्येकाची परिस्थिती, काळ, वेळ, वय, समस्या वेगवेगळ्या असतात. या सर्वाचा विचार करून पाहिले, तर प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे.

आपल्या दु:खाचे मूळ कारण आहे तुलना. आपण जोपर्यंत तुलना करणे थांबवणार नाही, तोवर आपण सुखी समाधानी होणार नाही. आईने आपल्याला व आपल्या धाकट्या भावाला खाऊ दिला, तर माझ्यापेक्षा त्याला जास्त का दिला याचा विचार करण्यात आपण खाऊ खाण्यातली मजा गमावून बसतो. तीच सवय अंगवळणी पडते आणि कायमस्वरूपी राहते. पण ही तुलना थांबवा, तुलना कधीही न संपणारी असते पण ती करण्यात आनंद संपून जातो हे लक्षात ठेवा.

समजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब ताशी अनुक्रमे ८ आणि १० किलोमीटर धावतात, तर त्यांच्यात वेगवान कोण? तुम्ही उत्तर द्याल - बसमजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब चे वय अनुक्रमे ४० आणि २० आहे, तर त्यांच्यात जास्त निरोगी कोण? तुम्ही उत्तर द्याल - असमजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब यांच्यात अ निरोगी आहे पण ब ला दुर्धर आजार आहे, तरीही तो धावतोय, त्यांच्यात विजेता कोण? तुम्ही उत्तर द्याल - बयाचाच अर्थ, प्रत्येकाची परिस्थिती, काळ, वेळ, वय, समस्या वेगवेगळ्या असतात. या सर्वाचा विचार करून पाहिले, तर प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे. आपण करत असलेली तुलनाच अयोग्य आहे. 

प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे, त्यामुळे साहजिकच उत्तरपत्रिकाही वेगवेगळी आहे. चुकूनही दुसऱ्याचे उत्तर कॉपी करायला जाऊ नका, त्याच्यासाठी ते बरोबर असेलही, पण तुमच्यासाठी ते चुकीचे ठरू शकते. शालेय गणितात शिकवलेली सूत्रे नियम पाठ्यपुस्तकातील गणिते सोडवू शकतील, परंतु आयुष्याचे गणित सोडवायचे असेल, तर एकच फॉर्म्युला सगळीकडे वापरून चालणार नाही. तो व्यक्तीपत्वे बदलत जाईल. 

प्रत्येकाला भगवंताने एकमेवाद्वितीय बनवले आहे. कोणीही कोणासारखा नाही. कोणी नशिबाने मोठा होतो तर कोणी प्रयत्नाने. मात्र जो तुलना करत बसतो, तो कधीच मोठा होऊ शकत नाही. म्हणून तुलना करणे थांबवा आणि आयुष्याचा आनंद घेत समाधानाने जगायला शिका.