शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या आयुष्याशी करू नका-गौर गोपालदास प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:38 IST

प्रत्येकाची परिस्थिती, काळ, वेळ, वय, समस्या वेगवेगळ्या असतात. या सर्वाचा विचार करून पाहिले, तर प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे.

आपल्या दु:खाचे मूळ कारण आहे तुलना. आपण जोपर्यंत तुलना करणे थांबवणार नाही, तोवर आपण सुखी समाधानी होणार नाही. आईने आपल्याला व आपल्या धाकट्या भावाला खाऊ दिला, तर माझ्यापेक्षा त्याला जास्त का दिला याचा विचार करण्यात आपण खाऊ खाण्यातली मजा गमावून बसतो. तीच सवय अंगवळणी पडते आणि कायमस्वरूपी राहते. पण ही तुलना थांबवा, तुलना कधीही न संपणारी असते पण ती करण्यात आनंद संपून जातो हे लक्षात ठेवा.

समजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब ताशी अनुक्रमे ८ आणि १० किलोमीटर धावतात, तर त्यांच्यात वेगवान कोण? तुम्ही उत्तर द्याल - बसमजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब चे वय अनुक्रमे ४० आणि २० आहे, तर त्यांच्यात जास्त निरोगी कोण? तुम्ही उत्तर द्याल - असमजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब यांच्यात अ निरोगी आहे पण ब ला दुर्धर आजार आहे, तरीही तो धावतोय, त्यांच्यात विजेता कोण? तुम्ही उत्तर द्याल - बयाचाच अर्थ, प्रत्येकाची परिस्थिती, काळ, वेळ, वय, समस्या वेगवेगळ्या असतात. या सर्वाचा विचार करून पाहिले, तर प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे. आपण करत असलेली तुलनाच अयोग्य आहे. 

प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे, त्यामुळे साहजिकच उत्तरपत्रिकाही वेगवेगळी आहे. चुकूनही दुसऱ्याचे उत्तर कॉपी करायला जाऊ नका, त्याच्यासाठी ते बरोबर असेलही, पण तुमच्यासाठी ते चुकीचे ठरू शकते. शालेय गणितात शिकवलेली सूत्रे नियम पाठ्यपुस्तकातील गणिते सोडवू शकतील, परंतु आयुष्याचे गणित सोडवायचे असेल, तर एकच फॉर्म्युला सगळीकडे वापरून चालणार नाही. तो व्यक्तीपत्वे बदलत जाईल. 

प्रत्येकाला भगवंताने एकमेवाद्वितीय बनवले आहे. कोणीही कोणासारखा नाही. कोणी नशिबाने मोठा होतो तर कोणी प्रयत्नाने. मात्र जो तुलना करत बसतो, तो कधीच मोठा होऊ शकत नाही. म्हणून तुलना करणे थांबवा आणि आयुष्याचा आनंद घेत समाधानाने जगायला शिका.