शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

एखादा निर्णय घेताना मनात द्विधा परिस्थिती निर्माण होतेय? 'या' टिप्स फॉलो करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 15:50 IST

मोठ्या आणि यशस्वी लोकांकडून चुका होत नाहीत का? तर होतात. परंतु, त्या चुकांवर मात करण्याची किंवा त्यातून उद्भवणारे धोके पत्करण्याची त्यांची तयारी असते.

यशस्वी लोकांकडे पाहून अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, की यांचे निर्णय कधीच कसे चुकत नाहीत? नाहीतर आम्ही, सतत धडपडतो, चुकतो, ठेचकाळतो. अशाने आम्ही कधी पुढे जाणार? यावर प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांचे सुंदर वाक्य आहे. ते लिहितात, `समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते!'

याचाच अर्थ मोठ्या आणि यशस्वी लोकांकडून चुका होत नाहीत का? तर होतात. परंतु, त्या चुकांवर मात करण्याची किंवा त्यातून उद्भवणारे धोके पत्करण्याची त्यांची तयारी असते. याउलट आपण मात्र, संभाव्य धोक्यांची भीती बाळगून निर्णय घेणेच टाळतो. 

निर्णयक्षमता एकाएक वाढत नसते. ती टप्प्याटप्प्याने वाढवावी लागते. यासाठी छोटे छोटे निर्णय घेण्याचा सराव केला पाहिजे. त्यातून आपण शिकत जातो आणि आपला आत्मविश्वास वाढतो.  

असे म्हणतात, की वाहन चालवायला शिकलो की आपली आत्मविश्वास वाढतो. परंतु, वाहन चालवण्याच्या कलेने आत्मविश्वास वाढत नाही, तर वाहन चालवताना आजूबाजूच्या वाहनांचा वेध घेऊन आपल्या वाहनाची गती नियंत्रित करत चालवताना आत्मविश्वास दुणावत जातो.

 सचिन तेंडुलकर उत्तम क्रिकेट खेळतो, परंतु दरवेळी त्याच्या मनावर दडपण असते, लाखो चाहत्यांच्या अपेक्षांचे. त्याने नीट खेळी खेळली नाही, तर चाहते निराश होतात, नावे ठेवतात, धिंगाणा घालतात. परंतु ही खेळी वाटते तेवढी सोपी नसते. बॉलरच्या बॉल टाकण्याच्या पद्धतीपासून तो आपल्या दिशेने कसा टप्पा पडून येणार आहे आणि तो पुढे कोणत्या दिशेला टोलवला, तर जास्तीत जास्त रन काढता येणार आहे, असा सगळा अभ्यास त्या एका क्षणात करून निर्णय घ्यावा लागतो. अशात कधी सिक्सर लागतो, कधी चौका तर कधी क्लीन बोल्ड!

हीच बाब आपल्या आयुष्यातही घडते. आपल्यावर आई बाबांच्या स्वप्नांची जबाबदारी, समाजाच्या चौकटीची जबाबदारी, गुरुजन-मित्रपरिवार यांच्या अपेक्षांची जबाबदारी यांचे एवढे दडपण असते, की आपण स्वत:ची काय स्वप्ने आहेत, तेच विसरून जातो. दुसऱ्यांची स्वप्ने पूर्ण करताना आपल्याला आनंदच मिळणार नसेल तर काय उपयोग? अशा वेळी एक निर्णय, ज्याबाबत तुम्हाला खात्री वाटते, ज्याबाबत तुम्ही ठाम आहात, जो तुम्हाला आयुष्यभर आनंद देईल असे वाटते, तो निर्णय इतरांच्या मनाविरुद्ध असला, तरी तो निर्णय घेण्याचे धाडस दाखवा. त्या यशापयशाची जबाबदारी स्वीकारा.

दरवेळी दुसऱ्यांच्या खांद्यावर आपल्या जबाबदारीचे ओझे न टाकता आपण आपल्या निर्णयाची जबाबदारी घेऊया आणि आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखवूया.