शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का? ५ कामे करा, चमत्कार बघा; अशक्य शक्य होईल!

By देवेश फडके | Updated: May 28, 2025 10:14 IST

Shree Swami Samarth Maharaj: लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले जाते. तुम्ही या गोष्टींचे पालन करता की नाही?

Shree Swami Samarth Maharaj: अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा, सेवा असंख्य भाविक करत असतात. नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे, दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो. अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण, उपासना, स्वामी मंत्रांचे जप, तारक मंत्राचे पारायण करत असतात. आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा, असे वाटत असते. परंतु, हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरते. या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात. या गोष्टींचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी, असे सांगितले जाते. 

मुळात स्वामींची सेवा करावी, हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते. आपले पूर्वसुकृत बळकट असावे लागते. तरच संत चरण लाभते. सेवा करायची आहे, एकदा का हा विचार मनात रुजला की, समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. स्वामी सेवा करताना सर्व प्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत, मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे ही तर खरच कसोटी आहे. हम गया नही जिंदा हैं... याची प्रचिती क्षणोक्षणी आहे. कुणाचीही ओंजळ रिती राहणार नाही, इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी घालणार आहेतच. परंतु, त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे. सक्षम व्हायला हवे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशाप्रकारे स्वामी सेवा, पूजा, भक्ती करावी. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया...

तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का?

- स्वामीसेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे. वाईट आचरण करणे, खोटेपणाने वागणे, या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत. अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत, असे म्हटले जाते. 

- आपले विचार नेहमी सकारात्मक असावे. काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात. असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत. ज्यांना स्वत:वर विश्वास नाही, त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही. स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे. चांगले तेच बोलावे. सकारात्मक विचार ठेवायला हवेत.

- स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. आपले नित्य कर्म करावे. कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावी. एकदा संकल्प घेतला की, तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा. वेळेचे पालन अशावेळी काटेकोरपणे करावे. 

- दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणे, दुसऱ्यांवर विनाकारण जळणे, इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असते. स्वाम या मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. मन चांगले ठेवा, स्वामी सदैव साथ देतील.

- स्वामींवर विश्वास असला की, अशक्यही शक्य होते. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात, असे म्हटले जाते. स्वामींविषयी तर तारकमंत्रातही हेच सांगितले आहे की, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसांत शक्य होत नाहीत. त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा. स्वामीसेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत, असे सांगितले जाते.

‘हे’ही नेहमीच लक्षात असू द्या

- स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. 

- स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. 

- स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात, असे म्हटले जाते. 

- कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत, आपले कार्य त्यांना समर्पित करावे. स्वामी निश्चित मदत करतील अन् अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा.

श्री स्वामी समर्थ

 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थshree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधी