शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

तुम्हीसुद्धा तणावग्रस्त आयुष्य जगताय का? 'या' उपायांनी फरक पडू शकेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 16:05 IST

माणसाच्या मागे जी एक प्रकारची अनामिक भीती असते ती योग्य व्यक्तीपुढे बोलून दाखवली जात नाही, तोवर मन मोकळे होऊ शकत नाही

पुष्कळ माणसांना एक अनामिक भीती वाटत असते. ही भीती ते कोणापुढेही बोलून दाखवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या हृदयावर ताण पडतो, हृदय हलके होत जाते व पुढे हृदयविकाराने मनुष्य जातो. बऱ्याच लोकांंना याचे ज्ञान नसते. अनामिक भीती बोलायची कोणापुढे? बायको मुलांजवळ बोलता येत नाही. त्यांच्यापुढे जर असे भीतीदायक काही बोलले तर ते उगाच घाबरतील, संसार विस्कळीत होईल. म्हणून हे लोक मनातल्या मनात भीती दाबून ठेवतात, बाहेर बोलून दाखवत नाहीत, मनातल्या मनात कुढत जातात. अशा वेळी योग्य व्यक्तीकडे भीती बोलून दाखवावी, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. ऐकणारी व्यक्ती अयोग्य असेल तर तर ती तुमच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊ शकेल.

माणसाच्या मागे जी एक प्रकारची अनामिक भीती असते ती योग्य व्यक्तीपुढे बोलून दाखवली जात नाही, तोवर मन मोकळे होऊ शकत नाही. तोवर मनावरचा भार हलका होत नाही. मन:शांती कशी मिळवावी, याचा मार्ग पुस्तकात मिळू शकेल, पण मन:शांतीचे समाधान सुख-दु:खाची वाटणी केल्याशिवाय मिळत नाही. अशा वेळेस आपल्या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीचा आधार घ्यावा. किंवा अध्यात्ममार्गातील गुरुंचा उपदेश घ्यावा. जपजाप्य करावे. तरच मन:शांती मिळू शकेल.

सत्पुरुषांच्या संगतीने, त्यांच्या उपदेशाने तुमचे निश्चितच कल्याण होईल. सर्व भार ईश्वरावर सोडा, त्याचे अनुसंधान ठेवा. ती एक प्रभावी शक्ती आहे. रोज ब्रह्म मुहूर्तावर उठून ईश्वराचे स्मरण, चिंतन करा. मनावरचा ताण हलका होईल.

मनाला आधार निर्माण होण्यासाठी व शांतता मिळवण्यासाठी ईश्वराची उपासना करा. ईश्वराच्या उपासनेचे स्तोम करू नका. आपण उपासना करतो, ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वत:च्या उन्नतीसाठी केली पाहिजे. दुसऱ्यांप्रती द्वेषाच्या भावनेचा त्याग केला, तर तुमचेही कल्याण होईल.