शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

तुम्हीसुद्धा तणावग्रस्त आयुष्य जगताय का? 'या' उपायांनी फरक पडू शकेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 16:05 IST

माणसाच्या मागे जी एक प्रकारची अनामिक भीती असते ती योग्य व्यक्तीपुढे बोलून दाखवली जात नाही, तोवर मन मोकळे होऊ शकत नाही

पुष्कळ माणसांना एक अनामिक भीती वाटत असते. ही भीती ते कोणापुढेही बोलून दाखवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या हृदयावर ताण पडतो, हृदय हलके होत जाते व पुढे हृदयविकाराने मनुष्य जातो. बऱ्याच लोकांंना याचे ज्ञान नसते. अनामिक भीती बोलायची कोणापुढे? बायको मुलांजवळ बोलता येत नाही. त्यांच्यापुढे जर असे भीतीदायक काही बोलले तर ते उगाच घाबरतील, संसार विस्कळीत होईल. म्हणून हे लोक मनातल्या मनात भीती दाबून ठेवतात, बाहेर बोलून दाखवत नाहीत, मनातल्या मनात कुढत जातात. अशा वेळी योग्य व्यक्तीकडे भीती बोलून दाखवावी, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. ऐकणारी व्यक्ती अयोग्य असेल तर तर ती तुमच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊ शकेल.

माणसाच्या मागे जी एक प्रकारची अनामिक भीती असते ती योग्य व्यक्तीपुढे बोलून दाखवली जात नाही, तोवर मन मोकळे होऊ शकत नाही. तोवर मनावरचा भार हलका होत नाही. मन:शांती कशी मिळवावी, याचा मार्ग पुस्तकात मिळू शकेल, पण मन:शांतीचे समाधान सुख-दु:खाची वाटणी केल्याशिवाय मिळत नाही. अशा वेळेस आपल्या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीचा आधार घ्यावा. किंवा अध्यात्ममार्गातील गुरुंचा उपदेश घ्यावा. जपजाप्य करावे. तरच मन:शांती मिळू शकेल.

सत्पुरुषांच्या संगतीने, त्यांच्या उपदेशाने तुमचे निश्चितच कल्याण होईल. सर्व भार ईश्वरावर सोडा, त्याचे अनुसंधान ठेवा. ती एक प्रभावी शक्ती आहे. रोज ब्रह्म मुहूर्तावर उठून ईश्वराचे स्मरण, चिंतन करा. मनावरचा ताण हलका होईल.

मनाला आधार निर्माण होण्यासाठी व शांतता मिळवण्यासाठी ईश्वराची उपासना करा. ईश्वराच्या उपासनेचे स्तोम करू नका. आपण उपासना करतो, ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वत:च्या उन्नतीसाठी केली पाहिजे. दुसऱ्यांप्रती द्वेषाच्या भावनेचा त्याग केला, तर तुमचेही कल्याण होईल.