शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!

By देवेश फडके | Updated: October 29, 2025 11:21 IST

Shree Swami Samarth Maharaj: तुम्हालाही असा अनुभव कधी आलाय का? श्री स्वामी समर्थ.

Shree Swami Samarth Maharaj: श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला मानली गेली आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. आयुष्यात अनेक समस्या येत असतात, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा मनापासून हाक मारली, तर स्वामी मदतीला धावून येतात, असा अनेकांचा अनुभव असल्याचे म्हटले जाते.

जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात. मात्र, काही वेळेस अशा काही घटना घडतात, तेव्हा मन उद्विग्न होते. बेचैन व्हायला होते. अनेक दिवस अशाच अशांत मानसिकतेत जात असतात. आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, चाचपडत असतो. परंतु, केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो. सगळे दिवस सारखे नसतात, सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. अनेकदा मन अशांत, अस्थिर असते. अनामिक भीती मनात दाटून येत असते. काय करावे, काहीच सूचत नाही, अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून हाक मारावी, असे वाटते. चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात. तेव्हा अशक्यही शक्य करतील स्वामी, हा अतूट विश्वास, श्रद्धा कायम ठेवावी. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो.

सगळे संपले असे वाटते? स्वामींचे शब्द जगण्याचे बळ, प्रेरणा देतील

आयुष्यात जीवन जगत असताना अशी एक वेळ येते, जेव्हा आपल्याला असे वाटते की, सारे काही आता संपले. हातातून सर्व काही निसटून जात आहे. हातातून वाळू निसटावी, अशा सर्व एक एक गोष्टी सुटून जात आहेत. अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगत असतात की, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्याला श्रद्धा आणि सबुरी ठेवण्यास सांगत असतात. तुमचे कर्म तुम्ही करत राहा, फळ कधी मिळेल, याची वाट पाहू नका. काळ सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. तुम्ही तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. ही वेळही निघून जाईल. जेव्हा तुम्हाला असे वाटत राहते की, एकटे आहात. तेव्हा स्वामी तुमच्या सोबतीला असतात. स्वामी आपली परीक्षा घेत असतात. आपण कोंडीत सापडलेले असतो, तेव्हा स्वामीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अशक्यही शक्य करतात. नवीन संधी देत असतात.  असा अनुभव आतापर्यंत हजारो स्वामी भक्तांना आल्याचे म्हटले जाते.

स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. स्वामी निश्चित मदत करतील अन् अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1344461803812766/}}}}

English
हिंदी सारांश
Web Title : Feeling lost? Swami's words offer strength, faith, and renewed hope.

Web Summary : When life feels hopeless, remember Swami Samarth's message: Have faith, do your duty, and trust that this difficult time will pass. Swami is always with you, guiding you through challenges and offering new opportunities. Maintain unwavering devotion and service.
टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक