शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

सर्वांशी चांगले वागूनही तुमच्या वाट्याला विश्वासघात येत आहे? मग अशी करा व्यक्तिपरीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:04 IST

कोणावरही डोळे झाकून विश्वास टाकण्याचा काळ गेला. आता ताकही फुंकून प्यावे अशी परिस्थिती आहे. त्यासाठी ही व्यक्तिपरीक्षा!

चाणक्य नीती महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली आहे. यामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्या आजही पूर्णपणे परिस्थितीला लागू पडतात. मग ते आयुष्यात यश मिळवण्यासाठी असो, नातेसंबंध जपण्यासाठी असो किंवा चांगल्या किंवा वाईट व्यक्तीची परीक्षा घेणे असो. चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्याही व्यक्तीशी भावनिक जवळीक साधण्याआधी काही गोष्टी तपासल्या पाहिजेत, अन्यथा ती व्यक्ती तुमची फसवणूक करून गंभीर नुकसान करू शकते.

आचार्य चाणक्य म्हणतात की ज्याप्रमाणे सोन्याला आगीत तावून सुलाखून काढले जाते त्याचप्रमाणे माणसाच्या काही गोष्टींची चाचणी घेणे आवश्यक आहे. ते चांगले की वाईट हे ठरवण्याचा हा मार्ग आहे. दुधाने तोंड भाजले की ताकही फुंकून प्यावे म्हणतात, ते यासाठीच!

आचरण : माणसाची वागणूक ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आचरणाने माणसाची सहज चाचणी होते. जर ती व्यक्ती सर्व वाईट सवयींपासून दूर राहिली, अनैतिक वागली नाही, इतरांबद्दल वाईट भावना मनात ठेवत नाही. अशी व्यक्ती नातेसंबंधात राहण्यास पात्र आहे. नसेल तर त्याच्यापासून दूर राहणेच बरे. याशिवाय खोटे बोलणाऱ्या, गर्विष्ठ आणि इतरांचा अपमान करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

त्याग: चांगल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तो इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करतो. अशी व्यक्ती चांगली आणि सत्यवादी असते. त्याचबरोबर जो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान करतो, त्याची कधीही साथ देऊ नका. भविष्यात तो तुमचे नुकसान करण्यासाठीही मागे पुढे पाहणार नाही. 

कर्म: जर एखाद्या व्यक्तीची कृती वाईट असेल तर ती व्यक्ती स्वतः बरोबर इतरांनाही बुडवेल. त्यामुळे चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्या किंवा वाईट काम करणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. नाहीतर त्याची वाईट सावली तुमचे मोठे नुकसान करेल.

या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी यावरून व्यक्तीचे चारित्र्य ओळखता येते. स्वार्थी माणसं फार काळ चांगला मुखवटा घालून वावरू शकत नाहीत. तो मुखवटा उतरेपर्यंत त्यांना जवळ करू नका. अन्यथा तुमचेच नुकसान होईल.