शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांशी चांगले वागूनही तुमच्या वाट्याला विश्वासघात येत आहे? मग अशी करा व्यक्तिपरीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:04 IST

कोणावरही डोळे झाकून विश्वास टाकण्याचा काळ गेला. आता ताकही फुंकून प्यावे अशी परिस्थिती आहे. त्यासाठी ही व्यक्तिपरीक्षा!

चाणक्य नीती महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली आहे. यामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्या आजही पूर्णपणे परिस्थितीला लागू पडतात. मग ते आयुष्यात यश मिळवण्यासाठी असो, नातेसंबंध जपण्यासाठी असो किंवा चांगल्या किंवा वाईट व्यक्तीची परीक्षा घेणे असो. चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्याही व्यक्तीशी भावनिक जवळीक साधण्याआधी काही गोष्टी तपासल्या पाहिजेत, अन्यथा ती व्यक्ती तुमची फसवणूक करून गंभीर नुकसान करू शकते.

आचार्य चाणक्य म्हणतात की ज्याप्रमाणे सोन्याला आगीत तावून सुलाखून काढले जाते त्याचप्रमाणे माणसाच्या काही गोष्टींची चाचणी घेणे आवश्यक आहे. ते चांगले की वाईट हे ठरवण्याचा हा मार्ग आहे. दुधाने तोंड भाजले की ताकही फुंकून प्यावे म्हणतात, ते यासाठीच!

आचरण : माणसाची वागणूक ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आचरणाने माणसाची सहज चाचणी होते. जर ती व्यक्ती सर्व वाईट सवयींपासून दूर राहिली, अनैतिक वागली नाही, इतरांबद्दल वाईट भावना मनात ठेवत नाही. अशी व्यक्ती नातेसंबंधात राहण्यास पात्र आहे. नसेल तर त्याच्यापासून दूर राहणेच बरे. याशिवाय खोटे बोलणाऱ्या, गर्विष्ठ आणि इतरांचा अपमान करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

त्याग: चांगल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तो इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करतो. अशी व्यक्ती चांगली आणि सत्यवादी असते. त्याचबरोबर जो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान करतो, त्याची कधीही साथ देऊ नका. भविष्यात तो तुमचे नुकसान करण्यासाठीही मागे पुढे पाहणार नाही. 

कर्म: जर एखाद्या व्यक्तीची कृती वाईट असेल तर ती व्यक्ती स्वतः बरोबर इतरांनाही बुडवेल. त्यामुळे चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्या किंवा वाईट काम करणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. नाहीतर त्याची वाईट सावली तुमचे मोठे नुकसान करेल.

या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी यावरून व्यक्तीचे चारित्र्य ओळखता येते. स्वार्थी माणसं फार काळ चांगला मुखवटा घालून वावरू शकत नाहीत. तो मुखवटा उतरेपर्यंत त्यांना जवळ करू नका. अन्यथा तुमचेच नुकसान होईल.