शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अंधश्रद्दांना वैज्ञानिक आधार आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 16:15 IST

अंधश्रद्धांना काही वैज्ञानिक आधार आहे, का त्या केवळ मानवजातीची दिशाभूल करणार्‍या परंपरागत तर्कहीन श्रद्धा आहेत? सद्गुरु नाण्याच्या दोन्ही बाजूंवर चर्चा करतात.

सद्गुरु:अनेक लोकं नेहेमी भाग्यवान ग्रह, भाग्यवान तारे, भाग्यवान आकडे – यासारख्या अनेक गोष्टींच्या शोधात असतात. या शोधण्याच्या आणि गोष्टी घडून येण्याची वाट पाहण्याच्या प्रक्रियेत, ते स्वतः अगदी सहजगत्या निर्माण करू शकले असते , अशा अनेक गोष्टी ते पुर्णपणे गमावून बसतात. आयुष्याच्या प्रत्येक पैलूमधे, ते घडवून आणणारे तुम्हीच असले पाहिजे. तुमची शांतता आणि तुमची अशांतता ही तुमची जबाबदारी आहे. तुमचा आनंद आणि तुमचे दुखः ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्यामधे असलेला देव आणि राक्षस ही तुमची जबाबदारी आहे. जेंव्हा तुम्ही योगायोगाने जीवन जगता, तेंव्हा तुम्ही भीती आणि चिंतेत जीवन जगता. जेंव्हा तुम्ही हेतुपूर्ण आणि सक्षम जीवन जगता, तेंव्हा काय घडते आहे किंवा काय घडत नाहीये याने काही फरक पडत नाही – किमान तुमच्यात जे काही घडते आहे ते तुमच्या नियंत्रणात असते. तसे जीवन अधिक स्थिर जीवन असते.काही वर्षांपूर्वी, माझ्या महितीतील एक महिला एका महत्वाच्या व्यावसायिक भेटीची तयारी करत होती. तामिळनाडुमधे अनेक लोकांची अशी श्रद्धा आहे की जेंव्हा तुम्ही सकाळी गाडी सुरू करता, तेंव्हा तुम्ही ती रिव्हर्स गियरमधे सुरू करू नये. नाहीतर तुमचे संपूर्ण आयुष्यच उलट्या दिशेने जाईल. म्हणून सकाळी ते कायमच थोडे पुढच्या दिशेला सरकतात. तर घराबाहेर पडण्यासाठी गाडी मागे घेण्याआधी तिला तिची गाडी थोडी पुढे घ्यायची होती. अतिशय चिंतातुर होऊन आणि घाबरून जाऊन, काही इंच गाडी पुढे घेण्याच्या प्रयत्नात, तिचा पाय क्लचवरुन निसटला आणि भिंतीला धडक मारून गाडी थेट बेडरुममधे शिरली!

योग्य प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यासाठी आवश्यक ते आंतरिक आणि बाह्य वातावरण आपल्याभोवती निर्माण करण्याऐवजी, तसे घडवून आणण्यासाठी आपण कायमच भलत्याच गोष्टीकडे पहात असतो. तुमचा आजचा आंतरिक अनुभव कसा होता हे नक्कीच तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणत्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवता त्यावर ते अवलंबून नाही. हे फक्त तुम्ही तुमच्या भोवतालच्या जीवनाकडे किती संवेदनशीलतेने , हुशारीने आणि किती जाणीवपूर्वक पाहता यावर अवलंबून आहे.

तर मग या कशातच काही सत्य नाही का? तसे असणे गरजेचे नाही. त्यापैकी बहुतांश गोष्टींमागे एक वैज्ञानिक आधार आहे पण काळाच्या ओघात त्याचा विनाश झालेला आहे. पिढ्यानपिढ्या विज्ञानाने त्याचा मूळ आकार गमावला आहे आणि त्याने दुसरेच स्वरूप धारण केले आहे. त्या व्यतिरिक्त, आज, राजकीय आणि इतर प्रकारच्या वर्चस्वामुळे आपण या निष्कर्षापर्यंत पोचलो आहोत की एखादी गोष्ट पश्चिमेकडून आली असेल तर ते विज्ञान आहे, जर ती पूर्वेकडून आली असेल तर ती अंधश्रद्धा आहे.या संस्कृतीत उल्लेखल्या गेलेल्या अनेक गोष्टींचा शोध , संशोधनावर अब्जावधी डॉलर्सचा खर्च करून आज पुन्हा एकदा लावला जात आहे आणि त्याला मानवी स्वभावाविषयी अतिशय “महान” संशोधन असे म्हटले जात आहे. आपल्याला या गोष्टी नेहेमीच ठाऊक होत्या कारण ही संस्कृती जगण्याच्या सक्तीतून निर्माण झालेली नाही. ही एक अशी संस्कृती आहे जी संत आणि ऋषिमुनींनी जाणीवपूर्वक विकसित केलेली आहे. त्यामध्ये प्रचंड वैज्ञानिक मूल्य आहेत. अगदी तुम्ही बसावे कसे, उभे कसे राहावे आणि खावे कसे इथपासून प्रत्येक गोष्ट – मानवी कल्याणासाठी सर्वोत्तम काय आहे यानुसार संरचित करण्यात आली होती. दुर्दैवाने आपण आज पहात असलेली आध्यात्मिक संस्कृती अनेक आक्रमणांनी आणि अनेक शतके अस्तीत्वात असलेल्या गरिबीमुळे मोडकळीस आली आहे. तरीसुद्धा आध्यात्मिक प्रक्रियेची मूलभूत नीती नष्ट होत नाही किंवा नष्टही केली जाऊ शकत नाही. या प्राचीन परंपरेचे फायदे संपूर्णतः घेण्याची वेळ आता आलेली आहे.