शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा आरोग्य होईल कष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 13:39 IST

वेदांमध्ये सूर्यास्ताच्या वेळी काही काम करणे निषिद्ध आहे.  पुढील गोष्टी केल्याने पैशाची आणि आरोग्याची हानी होते.

वेदांमधील ज्ञानाच्या सर्व गोष्टींबरोबरच दैनंदिन जीवन आणि सवयींबद्दलही मार्गदर्शन केले आहे. शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो. म्हणूनच, या ग्रंथांमध्ये अन्न, राहणीमान, आचरण आणि वागणूक यासारख्या अनेक बाबींबद्दल चर्चा केली गेली आहे. त्यांच्या मते संध्याकाळी काही काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर लोक सूर्यास्ताच्या वेळी हे काम करत असतील तर यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते . तसेच, त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. या दोन्ही गोष्टींचा ऱ्हास टाळायचा असेल, तर पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा. 

सूर्यास्ताच्या वेळी कधीही खाऊ नका. सूर्याला आपण देव मानतो. तो आपला निरोप घेत असताना आपण भोजन करणे उचित नाही. म्हणून शास्त्राने रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यायला सांगितले आहे. आरोग्य शास्त्रानेही त्यास दुजोरा दिला आहे. सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याचा विपरीत परिणाम आरोग्याला भोगावा लागतो. आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या की औषधोपचार करण्यात पैशांचाही अपव्यय होतो. म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर जेवण टाळा. 

सूर्यास्ताची वेळ आणि दिवेलागणीची वेळ एकत्र येते. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाल्यावर घराला प्रकाशमान करण्याची जबाबदारी दिव्यावर येते. छोटीशी पणती, समई, निरांजन घरात प्रकाश पसरवते. त्यावेळेस लक्ष्मी घरात येते, अशी आपली श्रद्धा आहे. मग त्यावेळी झोपून राहिल्यास तो लक्ष्मीचा अपमान ठरेल आणि ती रुसून पुढच्या घरी जाईल. म्हणून संध्याकाळ झाली की लोळत पडू नये किंवा झोपूही नये. 

संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो. म्हणून संध्याकाळी कोणाला कर्ज देऊ नये किंवा घेऊही नये. हा व्यवहार दिवसभरात केव्हाही करावा, परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये, असे शास्त्र सांगते. 

या वेळेत ध्यान करा. सायंकालीन संधिप्रकाश काळ ध्यान धारणेसाठी उचित मानला जातो. या काळात मन स्थिर नसते, ते ध्यानधारणेत गुंतवले पाहिजे. तसेच या कालावधीत शरीर संबंधही टाळले पाहिजेत. त्यातून गर्भधारणा झाल्यास संततीवर सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. 

यासाठीच मन शांत ठेवून स्तोत्रपणठण करावे. मन ईश्वर चिंतनात रमवावे. किंवा चांगले विचार अथवा वाचन, मनन करावे.