शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी - समर्थ वचनाचा प्रत्यय देणरी बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 16, 2020 19:07 IST

स्वतःसाठी किती जगलो, हे महत्त्वाचे नाही, दुसऱ्यांसाठी किती जगलो, हे महत्त्वाचे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

तुम्हाला ते राज कपूर यांचे गाणे आठवते का, `एक दिन बित जाएगा, माती के मोल, जगमे रह जाऐंगे, प्यारे तेरे बोल, दुजे के होठो को, देकर अपने गीत, कोई निशानी छोड, फिर दुनियासे डोल...' आठवले ना? हिंदी, मराठी सिनेमात अशी अनेक आशयघन गाणी आहेत. मात्र, आपण फक्त त्याच्या सुरावटीत रमतो. त्या शब्दांकडे बारकाईने लक्ष दिले, तर सिनेसंगीत वाटणारी गाणी संत वाङमयाशी साधर्म्य साधताना दिसतील. तसेच हे गाणे ऐकताना, समर्थ रामदास स्वामी यांचा मनातील श्लोक संग्रहातला श्लोक आठवतो,

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, अकस्मात तेचि क्रीया धरावी,मना चंदनाचे परित्वा झिजावे, परि अंतरी सज्जना नीववावे।।

ज्याप्रमाणे चंदनाचे खोड सहाणेवर झिजत असतानाही, सुगंधी परीमळ देऊन जातो, तसाच मनुष्याने इहलोकीची यात्रा संपवण्याआधी आपल्या सत्कर्माचा परिमळ मागे दरवळत ठेवला पाहिजे. हेच सांगणारी बोधकथा-

अरब आणि रोमन यांच्यात घनघोर लढाई झाली. दोन्ही बाजूचे अनेक योद्धे मारले गेले. बरेच जखमी झाले. संध्याकाळ झाली की लढाई थांबवायची असा लढाईचा नियम होता.

हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

एक दिवस संध्याकाळी लढाई थांबवल्यानंतर अरबांच्या सैन्यातील एक तरुण आपल्या चुलतभावाला शोधायला निघाला. भाऊ जखमी झाला असेल, तर त्याला औषधपाणी करावे, असे त्याला वाटत होते. आपल्या भावाला तहान लागली असेल आणि पाण्याविना तो व्याकुळ झाला असेल, असे त्याला वाटले, म्हणून जाताना त्याने तांब्याभर पाणी घेतले. कदाचित तो मृत्यू पावला असेल, तर त्याचे दफन करावे, अशा अनेक विचारांनी तो पुनश्च रणभूमीवर गेला. 

एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन तो समरांगणावर पोचला. जखमी योद्धे आणि मृत शरीरे यांच्यात फिरत तो आपल्या भावाचा शोध घेऊ लागला. थोड्या वेळात त्याला आपला भाऊ सापडला. त्याच्या शरीरावर खोल जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होते. त्याला फार तहान लागली होती आणि कह्णत तो पाण्याची याचना करत होता. तो वाचण्याची शक्यता नव्हती.

अरबाने कंदील खाली ठेवला आणि तांब्या दोन्ही हातात घेऊन त्याला पाणी पाजणार इतक्यात दुसऱ्या जखमी शिपायाचे कह्णने त्याला ऐकू आले. `पाणीऽऽऽ!' अरबाचा जखमी भाऊ मोठ्या प्रयासाने त्याला म्हणाला, `त्या जखमी शिपायास आधी पाणी पाज, नंतर मला दे.' एवढे बोलून त्याने आपले तोंड बंद केले. 

जिथून आवाज आला, त्या दिशेने अरब जाऊ लागला. जवळ जाऊन पाहिले, तर तो जखमी, एक मोठा सरदार होता. अरब त्याला पाणी पाजण्यासाठी वळला, तर तिसरीकडून आवाज आला, `पाणीऽऽऽ!'

सरदार फार जखमी झाला होता. मोडके-तोडके शब्द आणि खुणांच्या आधारे त्याने त्या अरबास सांगितले, की त्या तिसऱ्या शिपायाला पाणी मिळाल्याशिवाय मी पाणी पिणार नाही. बिचारा अरब बुचकळ्यात पडला. एक क्षणही दवडणे शक्य नव्हते. तो झपाट्याने पाणी मागणाऱ्या तिसऱ्या योद्ध्याच्या दिशेने जाऊ लागला. पण जेव्हा तो त्या पाणी मागणाऱ्या तिसऱ्या योद्ध्याजवळ पोहोचला आणि त्याला पाणी पाजू लागला, इतक्यात त्या योद्ध्याने कायमचे डोळे मिटले.

तो अरब धावत-धावत त्या सरदाराजवळ आला. तो सरदार मरण पावला होता. अरबाच्या दु:खाला पारावार राहिला नाही. दु:खी मनाने परमेश्वराचे नाव घेत तो आपल्या भावाजवळ आला. तर त्यानेही इहलोकीची यात्रा संपवली होती. 

या तिन्ही योद्ध्यांपैकी कुणालाच पाणी मिळाले नाही, परंतु पहिले दोन योद्धे मानवतेच्या इतिहासात आपले नाव अमर करून गेले.

हेही वाचा : संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!