शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर; वाचा दोन जिवलग मित्रांची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 09:03 IST

कशीही परिस्थिती असली, तरी चांगलीच कर्मे करावीत. कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते.

जिवबा आणि महादबा नावाचे दोन तरुण मित्र होते. गावात त्यांना कोणताही कामधंदा नव्हता. आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे, त्याशिवाय लग्न करायचे नाही असे त्यांनी ठरवले.

ठरल्याप्रमाणे जिवबा आणि महादबा शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले. शहरात गेल्यावर काही दिवस त्यांनी घरगडी म्हणून काम केले. हळूहळू साठलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला. सुदैवाने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला. हातात पैसा खेळू लागला. बरेच सोने नाणे खरेदी केले. आता आपल्या गावी जाऊन लग्न करून सुखाने संसार करु, असा विचार करून दोघेही आपल्या गावी जायला निघाले. त्यावेळी वाहतुकीची साधने नसल्याने पायीच प्रवास करावा लागे.

मजल दरमजल करत भरपूर धनदौलत घेऊन ते प्रवासाला निघाले. एका नदीकिनारी आले. जेवून थोडी विश्रांती घ्यावी असे त्यांनी ठरवले. जिवबा हात पाय धुण्यासाठी नदीवर गेला. महादबाने जेवणाचे डबे उघडले. त्याचवेळी महादबाच्या मनात दुष्ट विचार आला, की जिवबा जर पाय घसरुन नदीत वाहून गेला तर...! त्याच्याजवळची संपत्तीही आपल्यालाच मिळेल. गावात आपल्याएवढा श्रीमंत कोणीच नसेल. तेवढ्यात जिवबा शांतपणे उपरण्याला हात पाय पुसत येत होता. महादबाने ताबडतोब विषारी झाडपाला आणून तो जिवबाच्या जेवणात मिसळला. जेवण झाल्यावर जिवबाला कसेसेच होऊ लागले. थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला. महादबाने जिवबाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले. जिवबा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला. महादबाने त्याची धनाची थैली आपल्या गाठोड्यात लपवून तो पुढे निघाला. गावात पोहोचताच जोराने हंबरठा फोडून रडू लागला. 

आपला मित्र जिवबा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून सांगू लागला. मलापण मरायचे आहे. मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू? असे खोटे खोटे रडू लागला. त्याचे रडण्याचे नाटक इतके बेमालूम होते, की कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. 

सर्व काही शांत झाल्यावर महादबाने मोठे घर बांधले. लग्न केले. गडीमाणसे दारात राबू लागली. पुढे तो सावकारी करू लागला. वर्ष लोटले. महादबाच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले. एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचे कोडकौतुक होऊ लागले. बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर एकाएकी आजारी पडले. डॉक्टर, वैद्य, हकीम त्याच्यावर इलाज करु लागले. पण बाळाचा आजार काही बरा होईना. महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारेना. कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला. पण आजार बरा होण्याचे चिन्ह काही दिसेना.

एका गावात फार मोठे सिद्धपुरुष आले. ते त्रिकाल ज्ञानी होते. त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून महादबा बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला. सिद्धपुरुषाला आपली व्यथा सांगितली. थोडा वेळ ध्यानस्थ होत ते म्हणाले, `आतापर्यंत मुद्दल वसूल झाली, परंतु व्याज अजून बाकी आहे. ते फिटले की बाळाला बरे वाटेल.' महादबा म्हणाला, `महाराज मी नाही समजलो.' सिद्धपुरुष म्हणाले, `महादबा, अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जिवलग मित्र जिवबा आहे. त्याला कपटाने मारून त्याची संपत्ती तू हडप केलीस, ती व्याजासह वसूल करायला तो आलाय. प्रारब्धाचे भोग आहेत हे!'

मनुष्य आज जे कर्म करेल ते संचित कर्म पुढे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येईल. त्यालाच कर्माचे फळ म्हणतात. चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे वाईट फळ भोगावेच लागते. म्हणून कशीही परिस्थिती असली, तरी चांगलीच कर्मे करावीत. कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते.