शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

सर्व पापकर्मांचा नाश व इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या कामिका एकादशीचे व्रत असे करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:16 IST

मनुष्याने मनातील मतभेद विसरून एकोप्याने प्रत्येक क्षणाचा आनंद स्वतः घ्यावा व दुसऱ्याला घेऊ द्यावा. हाच खरा कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे.

आषाढ कृष्ण एकादशीला कामिका एकादशी असे नाव आहे. उद्या म्हणजेच बुधवारी ४ ऑगस्ट रोजी ही एकादशी आहे. या एकादशीची पवित्रा एकादशी आणि कृष्णैकादशी अशी दुसरी नावेही आहेत. या एकादशीला नेहमच्या एकादशीसारखाच उपास आणि पूजा करायची असते. शिवाय श्रीधर या नावाने भगवान विष्णूंची पूजा करून चोवीस तास अखंड तेवता असा तुपाचा दिवा लावणे, हा विशेष विधी असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पंचामृत पूजा करावी. पूजेत तुळस असणे आवश्यक असते. तसेच आपल्याला शक्य होईल त्या गोष्टीचे दान द्यावे. 

या एकादशीची एक कथा आहे - 

पूर्वी एका शूर क्षत्रियवीराच्या हातून अपघाताने ब्रह्महत्या घडली. त्यावेळी त्याने त्या ब्राह्मणाचे तेरावे आणि पुन्हा चौदाव्या दिवशीचे अंत्यसंस्कार विधी करायचे असे ठरवले. परंतु ब्रह्महत्या घडली म्हणून सर्व ब्राह्मणांनी त्याच्याकडे जायचे नाकारले. मात्र त्यांनी या पापाचा नाश व्हावा म्हणून त्याला ही कामिका एकादशी करायचा सल्ला दिला. त्याने मनोभावे हे व्रत केले. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले. त्याची पापातून मुक्तता केली. व त्याला स्वर्गप्राप्ती झाली.

सद्यस्थितीत या व्रताचे महत्त्व -

आपल्याकडून दर दिवशी कळत नकळत अनेक पापं घडत असतात. व त्यात नित्यनेमाने भर पडत असते. पाप म्हणजे केवळ कोणाची हत्या असे नाही, तर अपमान, अपशब्द, फसवणूक, तिरस्कार अशा कृतीतूनही आपण समोरच्याचे मन दुखावतो. ते मोठे पाप आहे. शरीराला बसलेले घाव एकवेळ भरून निघतीलही, परंतू मनाला झालेले घाव भरून निघत नाहीत. याच पापाचे परिमार्जन व्हावे यासाठी अशा व्रताचे आयोजन केले आहे. यात उपास केवळ शरीराला नाही तर मनालाही घडवणे अपेक्षित आहे, तसे घडले तरच पापक्षालन होण्यास मदत होईल व पुढच्या वेळी कोणासही दुखवताना व्रतस्थ मन तसे करण्यास धजावणार नाही. 

व्रत उत्सवाचा उद्देश मुळात हाच आहे, की मनुष्याने मनातील मतभेद विसरून एकोप्याने प्रत्येक क्षणाचा आनंद स्वतः घ्यावा व दुसऱ्याला घेऊ द्यावा. हाच खरा कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे. हे ज्यादिवशी आपल्याला कळेल, तेव्हा एकादशीचे व्रत खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. तो दिवस आपल्या आयुष्यात लवकर येवो, म्हणून भगवान विष्णूंना प्रार्थना करायची. त्यांना शरण जायचे. पवित्र तुळशी वाहून आपले आयुष्यही पवित्र होवो अशी प्रार्थना करायची. तसे झाले की आपोआप पापक्षय होईल आणि इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल. हीच या कामिका एकादशी व्रताची फलश्रुती. 

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।