शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

सर्व पापकर्मांचा नाश व इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या कामिका एकादशीचे व्रत असे करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:16 IST

मनुष्याने मनातील मतभेद विसरून एकोप्याने प्रत्येक क्षणाचा आनंद स्वतः घ्यावा व दुसऱ्याला घेऊ द्यावा. हाच खरा कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे.

आषाढ कृष्ण एकादशीला कामिका एकादशी असे नाव आहे. उद्या म्हणजेच बुधवारी ४ ऑगस्ट रोजी ही एकादशी आहे. या एकादशीची पवित्रा एकादशी आणि कृष्णैकादशी अशी दुसरी नावेही आहेत. या एकादशीला नेहमच्या एकादशीसारखाच उपास आणि पूजा करायची असते. शिवाय श्रीधर या नावाने भगवान विष्णूंची पूजा करून चोवीस तास अखंड तेवता असा तुपाचा दिवा लावणे, हा विशेष विधी असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पंचामृत पूजा करावी. पूजेत तुळस असणे आवश्यक असते. तसेच आपल्याला शक्य होईल त्या गोष्टीचे दान द्यावे. 

या एकादशीची एक कथा आहे - 

पूर्वी एका शूर क्षत्रियवीराच्या हातून अपघाताने ब्रह्महत्या घडली. त्यावेळी त्याने त्या ब्राह्मणाचे तेरावे आणि पुन्हा चौदाव्या दिवशीचे अंत्यसंस्कार विधी करायचे असे ठरवले. परंतु ब्रह्महत्या घडली म्हणून सर्व ब्राह्मणांनी त्याच्याकडे जायचे नाकारले. मात्र त्यांनी या पापाचा नाश व्हावा म्हणून त्याला ही कामिका एकादशी करायचा सल्ला दिला. त्याने मनोभावे हे व्रत केले. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले. त्याची पापातून मुक्तता केली. व त्याला स्वर्गप्राप्ती झाली.

सद्यस्थितीत या व्रताचे महत्त्व -

आपल्याकडून दर दिवशी कळत नकळत अनेक पापं घडत असतात. व त्यात नित्यनेमाने भर पडत असते. पाप म्हणजे केवळ कोणाची हत्या असे नाही, तर अपमान, अपशब्द, फसवणूक, तिरस्कार अशा कृतीतूनही आपण समोरच्याचे मन दुखावतो. ते मोठे पाप आहे. शरीराला बसलेले घाव एकवेळ भरून निघतीलही, परंतू मनाला झालेले घाव भरून निघत नाहीत. याच पापाचे परिमार्जन व्हावे यासाठी अशा व्रताचे आयोजन केले आहे. यात उपास केवळ शरीराला नाही तर मनालाही घडवणे अपेक्षित आहे, तसे घडले तरच पापक्षालन होण्यास मदत होईल व पुढच्या वेळी कोणासही दुखवताना व्रतस्थ मन तसे करण्यास धजावणार नाही. 

व्रत उत्सवाचा उद्देश मुळात हाच आहे, की मनुष्याने मनातील मतभेद विसरून एकोप्याने प्रत्येक क्षणाचा आनंद स्वतः घ्यावा व दुसऱ्याला घेऊ द्यावा. हाच खरा कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे. हे ज्यादिवशी आपल्याला कळेल, तेव्हा एकादशीचे व्रत खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. तो दिवस आपल्या आयुष्यात लवकर येवो, म्हणून भगवान विष्णूंना प्रार्थना करायची. त्यांना शरण जायचे. पवित्र तुळशी वाहून आपले आयुष्यही पवित्र होवो अशी प्रार्थना करायची. तसे झाले की आपोआप पापक्षय होईल आणि इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल. हीच या कामिका एकादशी व्रताची फलश्रुती. 

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।