शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Diwali 2022: निदान दिवाळीच्या दिवसात घरात भांडणं टाळा, संपत्तीच्या ऱ्हासावर बसेल आळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 11:43 IST

Diwali 2022: जिथे कलह, वाद-विवाद होतात, तिथे लक्ष्मी थांबत नाही; हेच सांगणारी बोधकथा!

चोर-दरोडेखोरांजवळ अमाप पैसा असतो. परंतु, तो त्यांना कधीच लाभत नाही. कारण तो पैसा त्यांनी वाममार्गाने कमावलेला असतो. त्यांच्या तिजोरीतून लक्ष्मी वारंवार बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. याउलट जिथे कष्ट, श्रम, प्रामाणिकपणा आहे, तिथे लक्ष्मी सन्मानाने जाते, राहते आणि वृद्धिंगत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तिची पूजा करतोच, अशा वेळी तिच्याकडे काय मागितले पाहिजे, हे सांगणारी एक बोधकथा. 

आटपाट नगराच्या कोण्या एका रंकावर लक्ष्मी प्रसन्न झाली. हा रंग जन्मापासून दरिद्री असल्यामुळे त्याला कुठल्याही कामात अर्थलाभ होत नसे, हाताला यश लाभत नसे. अगदी अटीतटीचा, निर्वाणीचा उपाय म्हणून लक्ष्मीची उपासना त्याने केली आणि त्यामुळे लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली. प्रसन्न होऊनही लक्ष्मी चिरकालासाठी त्याच्याकडे येऊन राहू शकत नव्हती तडजोड म्हणून लक्ष्मीने प्रेरणा दिली आणि त्या राज्यातल्या राजाचा प्रधान झाला, त्याचा सगळा जीवनक्रमच बदलला. दिवस कसे सरले, त्याला कळलेच नाही आणि बारा वर्षांचा काळ निघून गेला. 

बारा वर्षानंतर लक्ष्मी जशी आली, तशी निघून जाऊ लागली. पण त्यापूर्वी तिने ह्या पूर्वाश्रमीचा रंक असलेल्या प्रधानाची भेट घेतली. ती त्याला म्हणाली, `मी निघाले, आता यापुढे तू तुझा संसार सांभाळ.' प्रधान गडबडला. लक्ष्मी नसल्याने काय होते, याचा दारुण अनुभव त्याने घेतला होता. पुन्हा त्याला तो अनुभव नको होता. पण काय करणार? लक्ष्मीने दिलेली बारा वर्षांची मुदत संपून गेली होती.  तो आणि त्याची बायको-मुले गयावया करू लागली, रडू लागली, गडाबडा लोळू लागली. 

लक्ष्मी म्हणाली, `हे बघा, मी तर या घरातून जातच आहे, पण तुम्हाला असे दु:खात लोटून जाणे, मला बरे वाटणार नाही. तुम्ही माझ्याकडे काही मागा, तेवढे मी देते आणि बाकीचे सगळे घेऊन जाते.' प्रधान म्हणाला, `माते, आम्हाला विचार करायला एक दिवसाची मुदत दे.'

लक्ष्मीकडे काय मागावे, याबद्दल तो बायकोशी बोलला. बायको म्हणाली, `ही सोन्याच्या जरीने मढवलेली पैठणी आणि तो सप्तपदरी चंद्रहार एवढे माझ्यासाठी ठेवायला सांगा. बाकीचे नेले तरी चालेल.' प्रधानाचा मोठा मुलगा म्हणाला, `ज्या घोड्यावरून मी रोज रपेट करतो, तो मला राहू द्या.' मोठी मुलगी म्हणाली, `मी माझ्या मैत्रिणींना जे चार दागिने दाखवते आणि चार घोड्यांच्या रथातून फिरते, तो राहू द्या, बाकीचे न्या.' प्रधानांची धाकटी मुलगी चुणचुणीत होती. ती म्हणाली, 'बाबा, प्रत्येक जण त्याला काय हवे, ते मागत आहे, लक्ष्मींने तुमच्या घराला काय हवे आहे, ते मागायला सांगितले आहे. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा. कारण एकदा लक्ष्मी गेली, की तिच्यासकट बाकी गोष्टीही आपोआप जातील.'

प्रधान विचारात पडला. असे काय मागावे, की घरातला आनंद चिरकाल टिकून राहील? त्याने मुलीलाच विचारले, 'बाळ, तूच सांग मी काय मागू?' मुलीने वडिलांना सांगितले, 'सत्य आणि शांती घरात ठेव आणि कलह तू घेऊन जा, असे लक्ष्मी मातेला सांगा.' प्रधान आनंदून गेला. त्याने हेच मागणे लक्ष्मीकडे मागितले. ते ऐकून लक्ष्मीही गंभीर झाली आणि प्रधानाला म्हणाली, 'वत्सा, जिथे सत्य असते, तिथे माझा अधिवास असतो आणि जिते माझा अधिवास असतो तिथे कलह नसतो. कलहाचे आगमन झाले, की मी निघून जाते. तुझ्या मागाणीप्रमाणे इथे सत्य राहिले, म्हणजे मलाही राहावेच लागेल.'

लक्ष्मी म्हणजे केवळ बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम नव्हे, लक्ष्मी म्हणजे तिजोऱ्या आणि कपाटे भरभरून ठेवलेला दोन नंबरचा पैसाही नव्हे. लक्ष्मी म्हणजे सत्य आणि शांती. या स्वरूपातील लक्ष्मीने सर्वांच्या घरी निरंतर अधिवास करावा, हीच आपणही लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करायची. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021