शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Diwali 2021 : संतांच्या नजरेतून वाचा 'वसुबारस' या सणाचे महत्त्व आणि आई व बाळाचे अतूट नाते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:40 IST

Vasu Baras 2021 : आई-लेकराचे नाते अतुल्य असते. आईला मुलांप्रती आणि मुलांना आाईप्रती वाटणारा जिव्हाळा इतर नात्यांमध्ये क्वचितच सापडू शकेल. म्हणून या नात्याचे प्रतीकात्मक रूप म्हणून गोवत्स द्वादशीला गायीची आणि तिच्या लेकराची पूजा करतात.

गाय आणि तिचे वासरू हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते, ते केवळ अनुपमेय असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. दुसऱ्या कोणाला ते बधत नाही. ओळखत नाही. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी नामदेवांची रचना घेऊन वर्णन केले आहे, 

तू माझी माऊली, मी तुझे वासरू,नको पान्हा चोरू, पांडुरंगे।धेनु चरे वनी, वत्स असे घरी, चित्त वत्सावरी, ठेवूनि फिरे।

अशी विठ्ठलाची मनधरणी केली आहे. यासारखे अनेक गोवत्स संदर्भ नामदेवांच्या अभंगात येत असतात. जनाबाईदेखील म्हणतात,

मी वत्स माझी गायी, न ये आता करू काई?मज पाडसाची माय, भक्ति वत्साची ते गाय।।

अशा शब्दात पांडुरंग आणि आपल्यामधील नात्याचे वर्णन केले आहे. ते गाय वासराच दृष्टांत देऊनच. तुकाराम महाराज म्हणतात, 

वत्स पळे धेनु, धावे पाठीलागी,प्रीतीचा तो अंगी, आविर्भाव।।

अशा शब्दात या नैसर्गिक, अकृत्रिम प्रेमाची थोरवी गायली आहे. ज्ञानदेवांच्या सदाप्रसन्न, तृप्त, शांत व्यक्तिमत्त्वाला वत्स-धेनू हा दृष्टांत अधिक आवडला नसता, तरच नवल. ज्ञानेश्वरीतील गाय वासराचे असंख्य संदर्भ नवनवीन रूपात आपल्या समोर येतात.

नाना गाय चरे डोंगरी, परि चित्त बांधिले वत्स घरी.वत्सावरूनि धेनूचे, स्नेह राना न वचे।

गाय डोंगरात चरत असते, पण तिचे सारे लक्ष गोठ्यातल्या वासरावर असते, त्याप्रमाणे स्थिरपुरुष देहाने फिरत असला तरीही त्याचे चित्त चंचल नसते, असा यथार्थ दृष्टांत ज्ञानदेव देतात. ज्ञानी भक्त आणि देव यांच्यामधील अद्वैत सांगताना वासरू जसे तनमनप्राणाने आपल्या आईलाच ओळखते, त्याच्या या अनन्यगतीमुळे गायीचीही त्याच्यावर तशीच अपार माया असते. तृप्त झाल्यावरही गाय आपल्यापासून दूर जाऊ नये, असे वासराला वाटत राहते. या प्रसंगाचे वर्णन ज्ञानोबा करतात,

वत्स धालया परी, धेनु न वचावी दुरी,अनन्य प्रीतीची परी, ऐसीच आहे।

देवांची स्थिती तरी गायींपेक्षा वेगळी कुठे होती?

अहो वासरू देखिलियाचि साठी, धेनु खडबडोनि मोहे उठी, मग स्नामुखाचिये भेटी, काय पान्हा न ये।।

वासराला पाहून गाय प्रेमाने पटकन उठून उभी राहते. तिला पान्हा फुटतो. तसाच भगवद्गीतेतील अर्जुन साक्षात कामधेनुच्या अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या आश्रयाला आल्यावर, तो तरी ज्ञानामृत प्यायल्यावाचून कसा वंचित राहील? गीतेतील तत्वज्ञान केवळ अर्जुनसाठी नसून संपूर्ण मनुष्यसृष्टीसाठी आहे. म्हणून आपणही वासरू बनून गीतारुपी तत्वज्ञानाला शरण जावे. 

आई-लेकराचे नाते अतुल्य असते. आईला मुलांप्रती आणि मुलांना आाईप्रती वाटणारा जिव्हाळा इतर नात्यांमध्ये क्वचितच सापडू शकेल. म्हणून या नात्याचे प्रतीकात्मक रूप म्हणून गोवत्स द्वादशीला गायीची आणि तिच्या लेकराची पूजा करतात.

आपणही हे वात्सल्य, संस्कृती, आनंद जपुया आणि दिवाळीच्या शुभेच्छा  हॅपी दीपावली, न म्हणता शुभ दिवाळी म्हणत मराठमोळ्या पद्धतीने साजरी करूया.

Diwali 2021 : मालिकांमध्ये दाखवतात तेवढे सासू सुनेचे नाते वाईट नसतेच मुळी; वाचा वसुबारसेची सासू सुनेची कथा!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021