शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ईश्वरत्व ओळखावयास हवे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 13:26 IST

ईश्वराने मनुष्यप्राण्याला बुद्धीस्वातंत्र्य दिले असल्यामुळेच आजचा मानव हा ईश्वरालाच रिटायर्ड करण्याची भाषा बोलू लागला, ही कृतज्ञता आहे की कृतघ्नता कळत नाही..! 

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३.)

भारतीय संस्कृती व सनातन धर्म हा विश्वव्यापक आहे. याचे कारण या धर्मांत देव नाही असे ठिकाणंच नाही. तो सर्वत्र भरलेला आहे. खरं तर सर्वांतरयामी ईश्वराचं अस्तित्व आहे हा सिद्धांत फक्त याच धर्मांत आहे.

जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥

एवढी विश्वव्यापक धर्मदृष्टी अन्यत्र कुठे आहे..? संतांचा भागवत धर्म हा तर फक्त मानवतावादाचीच शिकवण देतो. समता, बंधुता व एकता यातून खरा समाजवाद तर या देशांत संत महात्म्यांनी भक्तीच्या माध्यमांतूनच निर्माण केला. 

टाळकुट्यांनी देश बुडविला, संताळ्यांनी प्रारब्धाच्या नावाखाली समाज निष्क्रीय बनविला, पारलौकिक जीवनाचे तत्वज्ञान मांडून माणसाला प्रयत्नवादापासून परावृत्त केले, असे आरोप प्रत्यारोप करणाराही संत साहित्याचा सूक्ष्म अभ्यास केला तर त्यांच्या नक्की लक्षांत येईल की, या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत, महंत, त्यागी, संन्यासी, अवलिया, फकीर जन्माला आले म्हणूनच तर हे राष्ट्र महान् राष्ट्र ठरले. रंजल्या गांजल्यांपर्यंत, तळागाळांतील व्यक्तिंपर्यंत ज्ञानाची भांडारं खुली झाली.

सकळांसी येथे आहे अधिकार ।कलियुगी उद्धार हरिनामे ॥

अशी हाक दिली व सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत मुक्तीचा मार्ग खुला केला. जगाचा समतोल राखण्यासाठी हे सर्व कार्य ईश्वरानेच संतांच्या माध्यमांतून अवतार घेऊन पूर्ण केले.

जगद्नियंत्या परमेश्वराने चराचर सृष्टी निर्माण केली त्याचवेळी सर्व प्राणिमात्रांच्या जीवनाची व्यवस्था निश्चित केली. सर्वांना अन्न, सर्वांना पाणी, सर्वांना सूर्यप्रकाश यांत ईश्वराने कधी भेदभाव केला का..? सर्वांच्या शरीरातील रक्त लाल रंगाचेच आहे या रक्तांत कुठे फरक आहे का..? सर्वांना बुद्धी दिली. आता तिचा वापर कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. ईश्वराने मनुष्य प्राण्याला हे बुद्धीस्वातंत्र्य दिले असल्यामुळेच आजचा मानव हा ईश्वरालाच रिटायर्ड करण्याची भाषा बोलू लागला, ही कृतज्ञता आहे की कृतघ्नता कळत नाही..!

मानवांतील ईश्वरता ओळखायला सुद्धा सर्वभूतात्म्यैकबुद्धी लागते. ती असेल तरच खरा देव कळेल..! आज ईश्वराने दिलेला अनमोल किंमतीचा हा देह, हे शरीर आम्ही स्वार्थ, कपटीपणा, मत्सर, सूडभावना, तिरस्कार या विकारात खर्च करण्यापेक्षा त्याच्याच प्राप्तीसाठी खर्ची घातलं तर किती चांगलं होईल..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक