शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वरत्व ओळखावयास हवे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 13:26 IST

ईश्वराने मनुष्यप्राण्याला बुद्धीस्वातंत्र्य दिले असल्यामुळेच आजचा मानव हा ईश्वरालाच रिटायर्ड करण्याची भाषा बोलू लागला, ही कृतज्ञता आहे की कृतघ्नता कळत नाही..! 

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३.)

भारतीय संस्कृती व सनातन धर्म हा विश्वव्यापक आहे. याचे कारण या धर्मांत देव नाही असे ठिकाणंच नाही. तो सर्वत्र भरलेला आहे. खरं तर सर्वांतरयामी ईश्वराचं अस्तित्व आहे हा सिद्धांत फक्त याच धर्मांत आहे.

जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥

एवढी विश्वव्यापक धर्मदृष्टी अन्यत्र कुठे आहे..? संतांचा भागवत धर्म हा तर फक्त मानवतावादाचीच शिकवण देतो. समता, बंधुता व एकता यातून खरा समाजवाद तर या देशांत संत महात्म्यांनी भक्तीच्या माध्यमांतूनच निर्माण केला. 

टाळकुट्यांनी देश बुडविला, संताळ्यांनी प्रारब्धाच्या नावाखाली समाज निष्क्रीय बनविला, पारलौकिक जीवनाचे तत्वज्ञान मांडून माणसाला प्रयत्नवादापासून परावृत्त केले, असे आरोप प्रत्यारोप करणाराही संत साहित्याचा सूक्ष्म अभ्यास केला तर त्यांच्या नक्की लक्षांत येईल की, या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत, महंत, त्यागी, संन्यासी, अवलिया, फकीर जन्माला आले म्हणूनच तर हे राष्ट्र महान् राष्ट्र ठरले. रंजल्या गांजल्यांपर्यंत, तळागाळांतील व्यक्तिंपर्यंत ज्ञानाची भांडारं खुली झाली.

सकळांसी येथे आहे अधिकार ।कलियुगी उद्धार हरिनामे ॥

अशी हाक दिली व सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत मुक्तीचा मार्ग खुला केला. जगाचा समतोल राखण्यासाठी हे सर्व कार्य ईश्वरानेच संतांच्या माध्यमांतून अवतार घेऊन पूर्ण केले.

जगद्नियंत्या परमेश्वराने चराचर सृष्टी निर्माण केली त्याचवेळी सर्व प्राणिमात्रांच्या जीवनाची व्यवस्था निश्चित केली. सर्वांना अन्न, सर्वांना पाणी, सर्वांना सूर्यप्रकाश यांत ईश्वराने कधी भेदभाव केला का..? सर्वांच्या शरीरातील रक्त लाल रंगाचेच आहे या रक्तांत कुठे फरक आहे का..? सर्वांना बुद्धी दिली. आता तिचा वापर कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. ईश्वराने मनुष्य प्राण्याला हे बुद्धीस्वातंत्र्य दिले असल्यामुळेच आजचा मानव हा ईश्वरालाच रिटायर्ड करण्याची भाषा बोलू लागला, ही कृतज्ञता आहे की कृतघ्नता कळत नाही..!

मानवांतील ईश्वरता ओळखायला सुद्धा सर्वभूतात्म्यैकबुद्धी लागते. ती असेल तरच खरा देव कळेल..! आज ईश्वराने दिलेला अनमोल किंमतीचा हा देह, हे शरीर आम्ही स्वार्थ, कपटीपणा, मत्सर, सूडभावना, तिरस्कार या विकारात खर्च करण्यापेक्षा त्याच्याच प्राप्तीसाठी खर्ची घातलं तर किती चांगलं होईल..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक