शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धर्माचरण ही अंधश्रद्धा नाही, तर त्याला विज्ञानाचाही दुजोरा; वाचा फायदे आणि तोटे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 14:17 IST

केवळ आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी धर्माची विटंबना न करता हिंदू धर्म आणि धर्माचरण यांचा सखोल अभ्यास करणे, ही काळाची गरज आहे. 

मंगळावर भराऱ्या मारणाऱ्या विज्ञानाला वैदिकांचा एकही धर्माचार असिद्ध ठरवता आलेला नाही. किंबहुना विज्ञानाच्या प्रत्येक प्रगतीबरोबर हे धर्माचार शास्त्रीय ठरत आहेत. धर्म अंधश्रद्धेला खतपाणी कधीच घालत नाही. धर्मातील बाबी या शास्त्राला धरून असतात. याबाबत अभ्यासक सुधा धामणकर लिहितात, 'धर्माचार पालनासाठी स्थलविचार, कालविचार, ऋतुविचार, मुहूर्तविचार, स्नानाने देहशुद्धि, मंत्रोच्चाराने चित्तशुद्धि, पापनाश व देवता साक्षात्कार, उपासनेने चित्तशुद्धि व चित्ताची एकाग्रता, अंतर्मनाची जागृति, बाह्य मनोलय, आसनाविधी, सोवळे-ओवळे, स्पर्शास्पर्शपालन, आहारपावित्र्य, भोगपावित्र्य इ. लाभ पदरी पडतात, याला विज्ञानाने देखील दुजोरा दिला आहे.' 

आचारपालनाने बीजशुद्धि, वंशशुद्धि, वंशसातत्य, संकरजन्य दोषांतून मुक्तता, अन्नशुद्धि, आरोग्यप्राप्ति, पर्यावरण शुद्धि, दीर्घायुष्यता, स्त्रीपावित्र्याचे संरक्षण, सुसंततिलाभ, सर्व प्रकारच्या कर्तव्याचे पालन, कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था इ. अनेक लाभ प्राप्त होतात. आचारत्यागामुळे अकालमृत्यू येतो, असेही म्हटले जाते. तर आचारपालनाने दीर्घायुष्य लाभते.

आचारपालनाला दोन प्रकारचे, दृष्ट आणि अदृष्ट लाभाचे फळ आहे. उपयुक्त सर्व दृष्ट फळांप्रमाणेच पूर्वजांना सद्गति, असद्गतितून मुक्तता, यमदंडापासून मुक्तता, परलोकात सद्गति, आध्यात्मिक उन्नति, देवता कृपा, देवता साक्षात्कार इ. अदृष्ट लाभही मिळतात.

आचारत्यागाने अनारोग्य, अल्पायुष्य, स्वैराचार, उत्छृंखलता, अनाचार, दुराचार, व्यभिचार, कामक्रोधादि विकारांचे आक्रमण चित्ताची अशांतता, नैतिकतेत शैथिल्य, व्यसनाधिनता, कौटुंबिक अशांति, कलह, विघटन, इ. द्वारा दु:ख, दारिद्र्य भोगावे लागते. परलोकात अधोगति, पारलौकिक अकल्याण, पापपरिणामांचा भोग भोगावा लागतो. 

आचार पालनात कंटाळा, आलस्य, अविश्वास, विरोध, टिंगल टवाळी इ. रूपाने आचारपालनाचा त्याग इ. चालू आहे. आचारपालन जवळ जवळ दिसेनासेच झाले आहे. तथापि गेली हजारो वर्षे ते आचार आजसुद्धा टिवूâन राहिले आहेत त्या अर्थी त्या आचारांमध्ये शास्त्रीयता, उपयुक्तता, विज्ञानुकूलता असली पाहिजे आणि आहे हे मान्य करावयास हवे.

खोल विचार, संशोधन, प्रत्यक्षानुभव, विचारांत घेता वेदिकाचे सर्व आचार निसर्गनिय, आयुर्वेद, विज्ञान ज्योतिष, देश काल स्थिती, मानसशास्त्र, प्राणिशास्त्र, वंशशास्त्र, समाजशास्त्र इ. सर्वांशी अनुकूल मिळते जुळते आहे, हे सिद्ध होते. 

म्हणून केवळ आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी धर्माची विटंबना न करता हिंदू धर्म आणि धर्माचरण यांचा सखोल अभ्यास करणे, ही काळाची गरज आहे.