शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदत्तगुरुंची उपासना, भक्तांची पूर्ण झाली इच्छा; स्वामी समर्थांनी दिले दत्तावतारांत दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:42 IST

Shree Swami Samarth: गुरुवारी औदुंबर पंचमी आहे. स्वामींची विशेष पूजा केल्यास शुभफल मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

Shree Swami Samarth: स्वामी समर्थांचे शिष्यगण, सेवेकरी यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगदी जवळून पाहिल्या आहेत. तत्कालीन सेवकांनी बहुतांश गोष्टी या पाहून त्याची नोंद करून ठेवल्याचे सांगितले जाते. स्वामी वचनांचा तर आजच्या काळातही अनेक जण अनुभव घेत असल्याचे दिसून येते. स्वामी दत्तावतार मानले जातात. अनेक प्रसंगांमधून खुद्द स्वामींनीच स्वतःची ओळख सांगितली आहे. गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे. यानिमित्त दत्तावतार असलेल्या स्वामींचे आवर्जून विशेष पूजन, नामस्मरण आणि स्वामीनामाचा जप केल्यास शुभ-पुण्य मिळू शकेल. स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले जाते. गुरुवारी औदुंबर पंचमी येणे, विशेष शुभ-फलदायी मानले गेले आहे. स्वामींनी काही भाविकांना दत्तावरांत दर्शन दिल्याच्या कथा आढळून येतात. जाणून घेऊया...

ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा लोक साक्षात डोलायचे. ते अनन्य दत्तभक्त होते. मात्र, अंगावर कोड आल्यामुळे ते अत्यंत दुःखी झाले होते. आयुष्यभर एवढी अनन्य भावांनी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला? असा विचार ते कायम करत बसायचे. एक दिवस वैतागून निर्णय करतात की, आता संसार सोडून काशीला जायचे आणि उर्वरित जीवन तिथेच व्यतीत करायचे. आपल्या कुटुंबाची व्यवस्था लाऊन काशीला जायची तयारी करतात. मात्र, त्यापूर्वी ते गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतात.

स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी प्रचिती येते

काशीला जायच्या आधी गावकऱ्यांच्या आग्रहाखातर कीर्तन करतात. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की, काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने ते काशीला न जाता अक्कलकोटला जातात. स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की, हमारी कस्तुरी लाओ! ठाकुरदासना स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी प्रचिती येते. स्वामी चरणी नतमस्तक होतात. ठाकुरदास स्वामींना म्हणतात की, आयुष्यभर दत्त उपासना करूनही मला रोग का झाला? स्वामी म्हणतात की, हे तुझे भोग आहेत. वेळ आले की, ते संपतील. काही दिवसांनी स्वामी कृपेने रोग बरा होतो. स्वामी बोध करतात की, कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले, तरही सद्कर्माची कास कधीही सोडू नये. उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की, आपोआप संपणार.

आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना?

दुसरीकडे, गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात, असे त्याचे मत होते. अक्कलकोटला पोहोचल्यावर तत्क्षणी तो पुजारी वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात की, काय रे! गाणगापूर मंदिराचा पुजारी ना! आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना? स्वामींच्या प्रश्नाने पुजारी चपापतो. पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात की, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? यावर पुजारी उत्तरतो की, श्रीनरसिंहसरस्वतीची!

साक्षात नरसिंहसरस्वती यांचे दर्शन घडते

स्वामी म्हणतात की, आम्ही नरसिंहभान आहोत! नीट बघ आम्हाला! तेथेच पुजाऱ्याला साक्षात नरसिंहसरस्वती यांचे दर्शन घडते. पुजाऱ्याला गहिवरून येते. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते की, स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामीचरणी नतमस्तक ठेऊन क्षमा मागतो आणि म्हणतो की, अक्कलकोट हेच गाणगापूर आणी गाणगापूर हेच अक्कलकोट आहे.

||श्री स्वामी समर्थ||

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक