शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

श्रीदत्तगुरुंची उपासना, भक्तांची पूर्ण झाली इच्छा; स्वामी समर्थांनी दिले दत्तावतारांत दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:42 IST

Shree Swami Samarth: गुरुवारी औदुंबर पंचमी आहे. स्वामींची विशेष पूजा केल्यास शुभफल मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

Shree Swami Samarth: स्वामी समर्थांचे शिष्यगण, सेवेकरी यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगदी जवळून पाहिल्या आहेत. तत्कालीन सेवकांनी बहुतांश गोष्टी या पाहून त्याची नोंद करून ठेवल्याचे सांगितले जाते. स्वामी वचनांचा तर आजच्या काळातही अनेक जण अनुभव घेत असल्याचे दिसून येते. स्वामी दत्तावतार मानले जातात. अनेक प्रसंगांमधून खुद्द स्वामींनीच स्वतःची ओळख सांगितली आहे. गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे. यानिमित्त दत्तावतार असलेल्या स्वामींचे आवर्जून विशेष पूजन, नामस्मरण आणि स्वामीनामाचा जप केल्यास शुभ-पुण्य मिळू शकेल. स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले जाते. गुरुवारी औदुंबर पंचमी येणे, विशेष शुभ-फलदायी मानले गेले आहे. स्वामींनी काही भाविकांना दत्तावरांत दर्शन दिल्याच्या कथा आढळून येतात. जाणून घेऊया...

ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा लोक साक्षात डोलायचे. ते अनन्य दत्तभक्त होते. मात्र, अंगावर कोड आल्यामुळे ते अत्यंत दुःखी झाले होते. आयुष्यभर एवढी अनन्य भावांनी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला? असा विचार ते कायम करत बसायचे. एक दिवस वैतागून निर्णय करतात की, आता संसार सोडून काशीला जायचे आणि उर्वरित जीवन तिथेच व्यतीत करायचे. आपल्या कुटुंबाची व्यवस्था लाऊन काशीला जायची तयारी करतात. मात्र, त्यापूर्वी ते गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतात.

स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी प्रचिती येते

काशीला जायच्या आधी गावकऱ्यांच्या आग्रहाखातर कीर्तन करतात. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की, काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने ते काशीला न जाता अक्कलकोटला जातात. स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की, हमारी कस्तुरी लाओ! ठाकुरदासना स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी प्रचिती येते. स्वामी चरणी नतमस्तक होतात. ठाकुरदास स्वामींना म्हणतात की, आयुष्यभर दत्त उपासना करूनही मला रोग का झाला? स्वामी म्हणतात की, हे तुझे भोग आहेत. वेळ आले की, ते संपतील. काही दिवसांनी स्वामी कृपेने रोग बरा होतो. स्वामी बोध करतात की, कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले, तरही सद्कर्माची कास कधीही सोडू नये. उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की, आपोआप संपणार.

आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना?

दुसरीकडे, गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात, असे त्याचे मत होते. अक्कलकोटला पोहोचल्यावर तत्क्षणी तो पुजारी वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात की, काय रे! गाणगापूर मंदिराचा पुजारी ना! आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना? स्वामींच्या प्रश्नाने पुजारी चपापतो. पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात की, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? यावर पुजारी उत्तरतो की, श्रीनरसिंहसरस्वतीची!

साक्षात नरसिंहसरस्वती यांचे दर्शन घडते

स्वामी म्हणतात की, आम्ही नरसिंहभान आहोत! नीट बघ आम्हाला! तेथेच पुजाऱ्याला साक्षात नरसिंहसरस्वती यांचे दर्शन घडते. पुजाऱ्याला गहिवरून येते. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते की, स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामीचरणी नतमस्तक ठेऊन क्षमा मागतो आणि म्हणतो की, अक्कलकोट हेच गाणगापूर आणी गाणगापूर हेच अक्कलकोट आहे.

||श्री स्वामी समर्थ||

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक