शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:52 IST

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना प्रेमानंद महाराज यांनीदेखील सडेतोड बोल ऐकवले आहेत. 

काश्मीर येथील पहलगाम भागात भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीव मारले गेले. याबद्दल देशभरातून संतप्त सूर उमटत असताना अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनीही टिप्पणी केली आहे. 

सद्यस्थितीत जाती, धर्म, भाषा यावरून समाजात तेढ निर्माण होत आहे. लोकांच्या मनात द्वेषाने एवढे घर केले आहे की प्रसंगी तो उफाळून येतो आणि पोटातले ओठावर येते आणि बाचाबाची होत गुन्हे घडत आहेत. मात्र शस्त्र घेऊन निष्पाप जीवांना त्यांचा धर्म विचारत त्यांचे प्राण घेणे कोणत्याही धर्मात समर्थनीय नाही, असे प्रेमानंद महाराज म्हणतात. 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले, 'जर कोणी दुसऱ्यांना संपवून आपला धर्म मोठा करू पाहत असेल तर तो धर्म नाही अधर्म आहे. कारण तसे करण्याची शिकवण कोणत्याही धर्मात नाही. निष्पाप जीवांचा बळी घेणे, त्रास देणे, छळ करणे हा गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीमुळे कुटुंब, कुटुंबामुळे वसाहत, वसाहतीमुळे समाज, समाजामुळे राज्य, राष्ट्र असुरक्षित होत असेल तर त्या गुन्हेगाराचा बंदोबस्त करणे हा धर्म आहे. विश्वशांतीसाठी अशा लोकांना शासन झालेच पाहिजे. आपली मनमानी करणे हा धर्म नाही तर विकृती आहे. असे वागणारे लोक कोणत्याही धर्माचे असोत, त्यांच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असेल, लोक भयभीत होत असतील, असुरक्षित वाटून घेत असतील तर अशा गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. असाहाय, निर्बल घटकांवर शक्ती प्रयोग करणे हे मती भ्रष्ट झालेल्या लोकांचेच काम आहे. त्यांना शासन करूनच नियंत्रणात आणले पाहिजे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला