शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:52 IST

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना प्रेमानंद महाराज यांनीदेखील सडेतोड बोल ऐकवले आहेत. 

काश्मीर येथील पहलगाम भागात भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीव मारले गेले. याबद्दल देशभरातून संतप्त सूर उमटत असताना अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनीही टिप्पणी केली आहे. 

सद्यस्थितीत जाती, धर्म, भाषा यावरून समाजात तेढ निर्माण होत आहे. लोकांच्या मनात द्वेषाने एवढे घर केले आहे की प्रसंगी तो उफाळून येतो आणि पोटातले ओठावर येते आणि बाचाबाची होत गुन्हे घडत आहेत. मात्र शस्त्र घेऊन निष्पाप जीवांना त्यांचा धर्म विचारत त्यांचे प्राण घेणे कोणत्याही धर्मात समर्थनीय नाही, असे प्रेमानंद महाराज म्हणतात. 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले, 'जर कोणी दुसऱ्यांना संपवून आपला धर्म मोठा करू पाहत असेल तर तो धर्म नाही अधर्म आहे. कारण तसे करण्याची शिकवण कोणत्याही धर्मात नाही. निष्पाप जीवांचा बळी घेणे, त्रास देणे, छळ करणे हा गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीमुळे कुटुंब, कुटुंबामुळे वसाहत, वसाहतीमुळे समाज, समाजामुळे राज्य, राष्ट्र असुरक्षित होत असेल तर त्या गुन्हेगाराचा बंदोबस्त करणे हा धर्म आहे. विश्वशांतीसाठी अशा लोकांना शासन झालेच पाहिजे. आपली मनमानी करणे हा धर्म नाही तर विकृती आहे. असे वागणारे लोक कोणत्याही धर्माचे असोत, त्यांच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असेल, लोक भयभीत होत असतील, असुरक्षित वाटून घेत असतील तर अशा गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. असाहाय, निर्बल घटकांवर शक्ती प्रयोग करणे हे मती भ्रष्ट झालेल्या लोकांचेच काम आहे. त्यांना शासन करूनच नियंत्रणात आणले पाहिजे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला