शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

अपार मेहनत घेऊनही तुम्हाला वाटते की अपयश आले? पण ती तर यशाची सुरुवात असते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 08:00 IST

प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे, त्या प्रयत्नाचे फळ काय द्यायचे, ते देव बघून घेईल. निराश होऊ नका.

आजचा जमाना इन्स्टंट फूड चा आहे. सगळे काही आपल्याला दोन मिनिटात हवे असते. अगदी यश सुद्धा! परंतु कोणतीही चांगली गोष्ट मिळवायची तर त्यात सातत्य, मेहनत, चिकाटी, प्रयत्न यांचे खतपाणी घालावे लागते, तरच यशाचा अंकुर फुटतो आणि भविष्यात त्याचा वटवृक्ष होतो. आज बी पेरले तर उद्या झाड उगवेल ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. याचाच अर्थ लागवड वाया गेली का? तर नाही, हा काळ बीज रुजण्याचा, अंकुर फुटण्याचा आणि त्याच्या वाढीचा असतो. त्याचप्रमाणे तुमचे प्रयत्न कधीच वाया जात नाहीत, फक्त ते योग्य दिशेने असावे लागतात. याबाबत प्रख्यात व्याखाते गौर गोपालदास प्रभू छानशी गोष्ट सांगतात... 

एका तरुणाला आयुष्यात अचाट काहीतरी साध्य करायचे असते. पण नेमके काय हेच माहीत नसते. एक दिवस तो विचारात बुडालेला असताना त्याला कुठूनतरी अदृश्य आवाज येतो, 'तुला अचाट कामगिरी करायची आहे ना, मग तुझ्या गावाजवळ असलेला भला मोठा डोंगर सहा महिने सातत्याने हलव आणि मग परिणाम बघ!'

आपल्याला नक्कीच देवाने हा आदेश दिला असावा, अशा विचाराने त्या तरुणाने दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत डोंगर हलवण्यास सुरुवात केली. देवाने सांगितल्या प्रमाणे तो एकही दिवस आळस न करता सलग सहा महिने डोंगर हलवण्याचा प्रयत्न करत राहिला. परंतु डोंगर तसूभरसुद्धा जागेवरून हलला नाही. हे पाहून निराश होऊन त्याने उद्यापासून हे काम बंद करायचे असे ठरवून टाकले. त्या दिवशी त्या तरुणाला पुन्हा तोच आवाज आला. 'निराश का होतोस?'

तरुण म्हणाला, 'निराश होऊ नको तर काय करू? मला अचाट कामगिरी करायची होती. सहा महिने मेहेनत घेऊनही काहीच फरक पडला नाही.'देवाने म्हटले, 'फरक नाही पडला असे का म्हणतोस? आरशासमोर उभा राहा, तुझा शर्ट काढ आणि रोज मेहनत घेतल्यामुळे केवढे पोलादी शरीर तयार झाले आहे बघ. भविष्यात यश मिळाले तर ते पचवण्यासाठी ताकद हवी. ती ताकद तुझ्यात निर्माण झाली आहे. आता याहून अचाट कामगिरी करण्यासाठी सिद्ध हो!'

प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे, त्या प्रयत्नाचे फळ काय द्यायचे, ते देव बघून घेईल. निराश होऊ नका. यश मिळाले, तरी ते पचवता आले पाहिजे, यासाठीच अपयशाला यशाची पहिली पायरी म्हटले आहे. ज्याअर्थी तुम्हाला वारंवार अपयश येत आहे, त्याअर्थी तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात, हे लक्षात ठेवा आणि प्रयत्न सोडू नका. काय सांगावं, तुमच्या अपार कष्टांनी अपयशाचा डोंगर हलेलही!