शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Deep Amavasya 2024: दीप आमवस्येला दुसर्‍यांचेही आयुष्य उजळूया आणि पुण्य कमवूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 07:00 IST

Deep Amavasya 2024: ४ ऑगस्ट रोजी दीप अमावस्या आहे, या दिवशी घरातले तर दिवे आपण उजळणार आहोतच, शिवाय एखाद्याचे आयुष्य उजळण्याचा प्रयत्न करूया

स्वदेस चित्रपटातली ती आजी आठवते? जिच्या घरात पहिल्यांदा बल्ब लागल्यावर आपल्या बोळक्या तोंडाने ती आनंदून म्हणते, `बिजली...बिजली!' ही केवळ चित्रपटातील नाही, तर आजही अनेक खेडेगावत ही परिस्थिती आहे. एवढेच काय, तर अलीकडेच आलेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत आपण आपल्या परीने शक्य ती मदत करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मकतेची, विश्वासाची आणि आशेची ज्योत प्रज्वलित करू शकतो. तसे केल्याने दीप अमावस्येचा मूळ हेतू म्हणजे अंधार नष्ट करणे, मग तो आपल्या आयुष्यातला असो नाहीतर दुसऱ्यांच्या आयुष्यातला, तो निश्चित साध्य होऊ शकेल.

सध्याच्या जगगात ट्यूबलाइट्स, बल्ब, सौरदिवे ही दिव्यांची आधुनिक रूपे आहेत. म्हणून असे दिवे एखाद्या संस्थेला, शाळांना, आश्रमांना द्यावेत. तशी आवश्यकता नसेल तर तेथील लाईट बिलाची रक्कम यथाशक्त अदा करावी. एखादा लामणदिवा, समई विकत घेऊन मंदिरात दान करावी आणि देवासमोर प्रज्वलित करावी.

आज आपल्या देशात शेकडो देवळे अशी आहेत की अनास्थेमुळे तिथे देवांची नित्यपूजा होत नाही. देवासमोर एखादा दिवासुद्धा कोणी लावत नाहीत. अशा आडगावच्या, आडवाटेच्या देवळात या दिवसाचे निमित्त साधून समविचारी मंडळींना सोबत घेऊन देवळाची स्वच्छता करावी. मूर्तीची पूजा करून दिवाबत्ती करावी. तुम्हाला तिथे रोज जाणे शक्य नसेल, तर तेथील गरजू स्थानिकाला या कामासाठी नेमून वर्षभराची दिवाबत्तीची सोय लावून द्यावी. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील व गरजू व्यक्तीला आर्थिक मदत मिळेल.

याचप्रमाणे कोणाच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावावा अशी इच्छा असेल, तर एखाद्या गरजू मुला-मुलीचा शैक्षणिक खर्च उचलावा. ती ज्ञानज्योत मुलांच्या मनात आयुष्यभर तेवत राहील व आपल्याला मदत मिळाली तशी भविष्यात कोणाला मदत करण्याची प्रेरणा त्यांना मिळू शकेल. शेवटी या उत्सवाचा सारांश काय, तर `ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो!'