शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दत्तगुरुंचे चोवीस गुरु : पाचवा गुरु: पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:56 IST

पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत.

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल.

अवधुताचा पुढचा गुरु आहे, पाणी. नाथ सांगतात की, पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. पवित्र व्हावया प्राणियांसी, तीथी तीर्थत्व उदकासी,                                                                                                                                                            इतुकी लक्षणे योगियासी, अहर्निशी असावी।

हेही वाचा : दत्तगुरुंचे चोवीस गुरु: चौथा गुरु: आकाश गुरु

तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत. गंगा ही अत्यंत पवित्र नदी मानली जाते. आपली पापे नष्ट व्हावी म्हणून असंख्य लोक गंगेत स्नान करीत असतात. ही गंगा मूळ स्वर्गस्थ नदी. हिला आपल्या तपश्चर्येने भगिरथाने पृथ्वीवर आणले. पृथ्वीवर अवतरण्यापूर्वी गंगेने भगिरथाला प्रश्न विचारला. 'भगिरथा, मी पृथ्वीवर आल्यावर लक्षावधी पापी लोक माझ्यात स्नान करतील व मी अपवित्र होईन. मग मी पुन्हा पवित्र कशी होईन?' भगिरथाने उत्तर दिले, `हे गंगामाते, पृथ्वीवर केवळ पापीच लोक राहतात असे समजू नकोस. पृथ्वीवर अनेक साधू प्रवृत्तीचेही संत राहतात. हे संत तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील आणि तू पुन्हा पवित्र होशील. संतांच्या स्पर्शात पाप नाशाचे, अपवित्राला पवित्र करण्याचे सामर्थ्य आहे.'

कुक्कुट ऋषींच्या चरणस्पर्शांनी गंगा, यमुना व सरस्वती या नद्या पवित्र होत असत अशी कथा आपल्याला पुंडलिकाच्या पूर्व चरित्रात वाचायला मिळते. पुंडलिकाचा अधिकार तर एवढा मोठा होता, की तिथे पवित्र होण्यासाठी रोज माध्यान्ह काळी पुंडलिकाच्या दर्शनाला येतात, असे वर्णन नामदेवरायांनी केले आहे, ते सुद्धा खुद्द शंकराच्या तोंडून- शंकर सांगे ऋषीजवळी, सकळ तीर्थ माध्यान्हकाळी, येती पुंडलीकाजवळी, करिती अंघोळी वंदिती चरण। पाणी अपवित्राला पवित्र करते पण मी यांना निर्मळ केले असा अहंकार ते धरीत नाही. त्याप्रमाणे योगी हा भक्ती करणे ज्याचा स्वभाव आहे, असे श्रद्धाळू भाविक जे आहेत, त्यांचे उपदेशद्वारा कलीदोष घालवूनही मी सर्व भाविकांचा गुरु आहे, अशा गुरुपणाने अभिमानाने बळ धारण करीत नाही. वाल्याचा वाल्मिकी केल्याबद्दल नारदाने अहंकार धरला काय? विसोबा खेचराचा उद्धार करून त्याला नामदेवाला गरु केल्याबद्दल माऊलींना अहंकार झाला काय? संतांना अहंकाराची बाधा कधीही होत नाही.

हेही वाचा : दत्त गुरुंचे चोवीस गुरु : तिसरे गुरु : वायू