शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

दत्तगुरुंचे चोवीस गुरु : पाचवा गुरु: पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:56 IST

पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत.

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल.

अवधुताचा पुढचा गुरु आहे, पाणी. नाथ सांगतात की, पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. पवित्र व्हावया प्राणियांसी, तीथी तीर्थत्व उदकासी,                                                                                                                                                            इतुकी लक्षणे योगियासी, अहर्निशी असावी।

हेही वाचा : दत्तगुरुंचे चोवीस गुरु: चौथा गुरु: आकाश गुरु

तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत. गंगा ही अत्यंत पवित्र नदी मानली जाते. आपली पापे नष्ट व्हावी म्हणून असंख्य लोक गंगेत स्नान करीत असतात. ही गंगा मूळ स्वर्गस्थ नदी. हिला आपल्या तपश्चर्येने भगिरथाने पृथ्वीवर आणले. पृथ्वीवर अवतरण्यापूर्वी गंगेने भगिरथाला प्रश्न विचारला. 'भगिरथा, मी पृथ्वीवर आल्यावर लक्षावधी पापी लोक माझ्यात स्नान करतील व मी अपवित्र होईन. मग मी पुन्हा पवित्र कशी होईन?' भगिरथाने उत्तर दिले, `हे गंगामाते, पृथ्वीवर केवळ पापीच लोक राहतात असे समजू नकोस. पृथ्वीवर अनेक साधू प्रवृत्तीचेही संत राहतात. हे संत तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील आणि तू पुन्हा पवित्र होशील. संतांच्या स्पर्शात पाप नाशाचे, अपवित्राला पवित्र करण्याचे सामर्थ्य आहे.'

कुक्कुट ऋषींच्या चरणस्पर्शांनी गंगा, यमुना व सरस्वती या नद्या पवित्र होत असत अशी कथा आपल्याला पुंडलिकाच्या पूर्व चरित्रात वाचायला मिळते. पुंडलिकाचा अधिकार तर एवढा मोठा होता, की तिथे पवित्र होण्यासाठी रोज माध्यान्ह काळी पुंडलिकाच्या दर्शनाला येतात, असे वर्णन नामदेवरायांनी केले आहे, ते सुद्धा खुद्द शंकराच्या तोंडून- शंकर सांगे ऋषीजवळी, सकळ तीर्थ माध्यान्हकाळी, येती पुंडलीकाजवळी, करिती अंघोळी वंदिती चरण। पाणी अपवित्राला पवित्र करते पण मी यांना निर्मळ केले असा अहंकार ते धरीत नाही. त्याप्रमाणे योगी हा भक्ती करणे ज्याचा स्वभाव आहे, असे श्रद्धाळू भाविक जे आहेत, त्यांचे उपदेशद्वारा कलीदोष घालवूनही मी सर्व भाविकांचा गुरु आहे, अशा गुरुपणाने अभिमानाने बळ धारण करीत नाही. वाल्याचा वाल्मिकी केल्याबद्दल नारदाने अहंकार धरला काय? विसोबा खेचराचा उद्धार करून त्याला नामदेवाला गरु केल्याबद्दल माऊलींना अहंकार झाला काय? संतांना अहंकाराची बाधा कधीही होत नाही.

हेही वाचा : दत्त गुरुंचे चोवीस गुरु : तिसरे गुरु : वायू