शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

दत्तगुरुंचे चोवीस गुरु : पाचवा गुरु: पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:56 IST

पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत.

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल.

अवधुताचा पुढचा गुरु आहे, पाणी. नाथ सांगतात की, पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. पवित्र व्हावया प्राणियांसी, तीथी तीर्थत्व उदकासी,                                                                                                                                                            इतुकी लक्षणे योगियासी, अहर्निशी असावी।

हेही वाचा : दत्तगुरुंचे चोवीस गुरु: चौथा गुरु: आकाश गुरु

तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत. गंगा ही अत्यंत पवित्र नदी मानली जाते. आपली पापे नष्ट व्हावी म्हणून असंख्य लोक गंगेत स्नान करीत असतात. ही गंगा मूळ स्वर्गस्थ नदी. हिला आपल्या तपश्चर्येने भगिरथाने पृथ्वीवर आणले. पृथ्वीवर अवतरण्यापूर्वी गंगेने भगिरथाला प्रश्न विचारला. 'भगिरथा, मी पृथ्वीवर आल्यावर लक्षावधी पापी लोक माझ्यात स्नान करतील व मी अपवित्र होईन. मग मी पुन्हा पवित्र कशी होईन?' भगिरथाने उत्तर दिले, `हे गंगामाते, पृथ्वीवर केवळ पापीच लोक राहतात असे समजू नकोस. पृथ्वीवर अनेक साधू प्रवृत्तीचेही संत राहतात. हे संत तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील आणि तू पुन्हा पवित्र होशील. संतांच्या स्पर्शात पाप नाशाचे, अपवित्राला पवित्र करण्याचे सामर्थ्य आहे.'

कुक्कुट ऋषींच्या चरणस्पर्शांनी गंगा, यमुना व सरस्वती या नद्या पवित्र होत असत अशी कथा आपल्याला पुंडलिकाच्या पूर्व चरित्रात वाचायला मिळते. पुंडलिकाचा अधिकार तर एवढा मोठा होता, की तिथे पवित्र होण्यासाठी रोज माध्यान्ह काळी पुंडलिकाच्या दर्शनाला येतात, असे वर्णन नामदेवरायांनी केले आहे, ते सुद्धा खुद्द शंकराच्या तोंडून- शंकर सांगे ऋषीजवळी, सकळ तीर्थ माध्यान्हकाळी, येती पुंडलीकाजवळी, करिती अंघोळी वंदिती चरण। पाणी अपवित्राला पवित्र करते पण मी यांना निर्मळ केले असा अहंकार ते धरीत नाही. त्याप्रमाणे योगी हा भक्ती करणे ज्याचा स्वभाव आहे, असे श्रद्धाळू भाविक जे आहेत, त्यांचे उपदेशद्वारा कलीदोष घालवूनही मी सर्व भाविकांचा गुरु आहे, अशा गुरुपणाने अभिमानाने बळ धारण करीत नाही. वाल्याचा वाल्मिकी केल्याबद्दल नारदाने अहंकार धरला काय? विसोबा खेचराचा उद्धार करून त्याला नामदेवाला गरु केल्याबद्दल माऊलींना अहंकार झाला काय? संतांना अहंकाराची बाधा कधीही होत नाही.

हेही वाचा : दत्त गुरुंचे चोवीस गुरु : तिसरे गुरु : वायू