शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

Datta Jayanti 2024: संसारी माणसाने गुरुचरित्र वाचताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 10:26 IST

Datta Jayanti 2024: यंदा १४ डिसेंबर रोजी शनिवारी दत्त जयंती आहे, त्यानिमित्त गुरु चरित्र पारायणाचा विचार करत असाल पण नियमांना घाबरत असाल तर हे वाचाच!

>> गणेश कुलकर्णी 

"अंतःकरण असता पवित्र! सदाकाळ वाचावे गुरूचरित्र!!

कोणतेही अध्यात्मिक कार्य तसेच उपासना नामस्मरण नामसंकीर्तन भजन पूजन भक्ती ही त्याविषयी मनात जेंव्हा तळमळ निर्माण होईल त्या वेळी कुठलेही शुभसंकेत न पाहता तत्काळ प्रारंभ करावेत कारण....

"शुभस्य शीघ्रं अशुभस्य काल हरणम्"

आपली भूमी ही मृत्यूभूमी आहे.  इथे जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यूच्या अधीन व्हावेच लागते.  भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात....

"जातस्यहि धृवो मृत्यू, धृवं जन्म मृतस्य च"

म्हणूनच एक संत वचन आहे की..‌‌

नाही देहाचा भरवसा!कोण दिवस येईल कैसा?!!

त्यातल्या त्यात आपल्या मनात गुरूंच्या सेवेविषयी तीव्र तळमळ ओढ आणि नम्रभाव असेल तेव्हा कुठल्याही ग्रंथाचे पारायण केले तरी चालते.फक्त त्या ठिकाणी सात्विक भाव निर्माण होईल असे वातावरण, पवित्र देह आणि शुद्ध सात्विक आहार विचार उच्चार आणि मनाची प्रसन्नता शांतता एकाग्रता असलीच पाहिजे तर त्या पारायणातून परमेश्वराच्या दिव्य लहरी त्या ठिकाणी फिरू लागतात आणि त्या तेथील सर्वांना उत्साह प्रेरणा बुद्धी ज्ञान वैराग्य प्रेम आणि आनंद प्राप्त करून देतात आणि त्या साधकाचा,भक्ताचा गुरूंच्या विषयी सेवा मार्गाचा प्रवास प्रारंभ होतो.आणि जर वर सांगितलेल्या प्रमाणे कुठले पावित्र्य नियम जर न पाळता "लोकांनी आपल्याला कुणी तरी महान संत समजावे, सन्मान करावा, आपल्या आज्ञेत वागावे" या उद्देशाने पारायण केले तर ते पारायण होत नाही तर आपल्यामधे अहंकार गर्व अज्ञान पाखंडी पणा भरण्याचा एक उपक्रम होतो!

पारायण या शब्दाचा अर्थ...."सदैव रत तल्लीन, एकनिष्ठ आणि अखंड भक्तीत रममाण होणे" असा आहे. 

आपण जेवायला बसताना आपले जेवणाचे ताट स्वच्छ आहे का? हे पाहूनच जेवणाचा खरा आनंद घेतो आणि जर कसे तरी वातावरण, अपवित्र अस्वच्छ जागा तसेच अस्वस्थ परिस्थितीत अन्न भक्षण केले तर मन तृप्त होईल का? शरीराला आरोग्य मिळेल का? अशा प्रकारे या शास्त्राचा विचार करून कुठल्याही ग्रंथाचे पारायण करावे. आपल्याला प्रपंच सांभाळून जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळावेत! शेवटी "नियम" कालमानाप्रमाणे बदलत राहतात पण "यम" कधीच बदलत नाही हे आपण प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे जाणून घेतले आहे.

शेवटी एकच विनंती शरिराला क्लेश देऊन आणि दुसऱ्यांवर छाप पडावी म्हणून केलेली कुठलीही उपासना भक्ती ही कधीही यशस्वी होत नाही तर ज्या वेळी जो कोणी परमेश्वराचे नामस्मरण नामसंकीर्तन भजन पूजन भक्ती उपासना चिंतन शुद्ध सात्विक पवित्र भावनेने करतो तीच शुभ घटिका तेच खरे लग्न (शुभ मुहूर्त) तेच सर्व ग्रहांचे बळ मानले जाते.

"तदेव लग्नं सुदिनं तदेव!ताराबलं चन्दबलं तदेव!!विद्याबलं दैवबलं तदेव!लक्ष्मीपती ते मनसा स्मरामि!!हरि ॐ तत् सत्

अशी पारायण सेवा भक्ती उपासना करणाऱ्या सर्व भक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम!

टॅग्स :datta jayantiदत्त जयंती