शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दत्त गुरुंचे चोवीस गुरु : पर्वत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:12 IST

पर्वताकडून अवधुताने परोपकार हा गुण घेतला आहे. रत्नादि पदार्थ, गवत, पाणी आणि इतर नाना पदार्थ पर्वतावर सापडतात. पण हे सगळे केवळ परोपकारासाठीच तो बाळगतो.

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल. 

अवधुताचा पहिला गुरु 'पृथ्वी' या पृथ्वीवर असलेले पर्वत व वृक्ष यांनाही अवधुताने गुरु मानले आहे. पर्वताकडून अवधुताने परोपकार हा गुण घेतला आहे. जो स्वत:साठी, केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी जगला, त्याचे जगणे कसले? जो दुसऱ्यासाठी जगला तोच खरा जगला. परोपकार हा गुण पर्वताकडून आपण कसा शिकलो याचे नाथांनी सुंदर वर्णन केले आहे.

हेही वाचा : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!

रत्न निकर समस्त, पर्वत परार्थीच वाहत,वृणजळ नाना अर्थ, तेही परार्थ धरितसे।कोणासी नेमी ना निवारी, उबगोनि न घाली बाहेरी।याचकाचे इच्छेवरी, परोपरकारी देतसे।ग्रीष्माअंती सर्व सरे, परी तो देता मागे न सरे।सवेचि भगवंते की जे पुरे, वर्षोनि जळधरे समृद्धी।

रत्नादि पदार्थ, गवत, पाणी आणि इतर नाना पदार्थ पर्वतावर सापडतात. पण हे सगळे केवळ परोपकारासाठीच तो बाळगतो. पर्वत कोणाला या म्हणत नाही, नको म्हणत नाही किंवा कंटाळून कोणाला बाहेर घालवीत नाही. याचकाची जी इच्छा असेल ती परोपकारबुद्धीने तो पूर्ण करतो. ग्रीष्मऋतुु संपताना त्यावरील गवत, पाणी, धान्य वगैरे सगळे संपून जाते. पण याचकाला देताना तो मागे सरत नाही. म्हणून भगवंत देखील लागलीच मेघवृष्टी करून त्याला समृद्ध करून सोडतो.

या ठिकाणी नाथांनी 'दातृत्वाबद्दल' एक महत्त्वाचे रहस्य सांगितले आहे. आपण देत राहिले की आपल्याला मिळत राहते. नेहमी मागत राहणाऱ्याला कधी मिळत नाही. देण्याने धन, संपत्ती, विद्या, ज्ञान सर्व वाढते. कारण देणाऱ्याची काळजी भगवान स्वत: घेतो.

जंव जंव उल्हासे दाता देतु, तंव तंव पुरवी जगन्नाथु।विकल्प न धरिता मनाआतु, देता अच्युतु अनिवार।

खरा दाता जसजसा उल्हासाने दान देऊ लागतो, तसतसा भगवंत त्याला पाठपुरवठा करीत जातो. मनात विकल्प धरला नाही, शंका घेतली नाही, तर भगवंत अनिवारपणे दाता होतो. खरा दाता तर भगवंतच आहे. या विश्वाचा खरा मालक, खरा स्वामी कोण? भगवंतच खरा मालक नव्हे काय? आपण कोणीही हे दान देता ते भगवंतानेच आपल्याला दिले आह. मन देताना हात मागे का घेता? नाथ म्हणतात, भगवंत खरा दाता आहे, हे संशयाने पछाडलेल्या लोकांना पटत नाही. म्हणून त्यांना दारिद्र्य भोगावे लागते.'

हेही वाचा : दत्तगुरुंच्या चोवीस गुरुंपैकी पहिला गुरु : पृथ्वी!