शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

दत्त गुरुंचे चोवीस गुरु : पर्वत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:12 IST

पर्वताकडून अवधुताने परोपकार हा गुण घेतला आहे. रत्नादि पदार्थ, गवत, पाणी आणि इतर नाना पदार्थ पर्वतावर सापडतात. पण हे सगळे केवळ परोपकारासाठीच तो बाळगतो.

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल. 

अवधुताचा पहिला गुरु 'पृथ्वी' या पृथ्वीवर असलेले पर्वत व वृक्ष यांनाही अवधुताने गुरु मानले आहे. पर्वताकडून अवधुताने परोपकार हा गुण घेतला आहे. जो स्वत:साठी, केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी जगला, त्याचे जगणे कसले? जो दुसऱ्यासाठी जगला तोच खरा जगला. परोपकार हा गुण पर्वताकडून आपण कसा शिकलो याचे नाथांनी सुंदर वर्णन केले आहे.

हेही वाचा : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!

रत्न निकर समस्त, पर्वत परार्थीच वाहत,वृणजळ नाना अर्थ, तेही परार्थ धरितसे।कोणासी नेमी ना निवारी, उबगोनि न घाली बाहेरी।याचकाचे इच्छेवरी, परोपरकारी देतसे।ग्रीष्माअंती सर्व सरे, परी तो देता मागे न सरे।सवेचि भगवंते की जे पुरे, वर्षोनि जळधरे समृद्धी।

रत्नादि पदार्थ, गवत, पाणी आणि इतर नाना पदार्थ पर्वतावर सापडतात. पण हे सगळे केवळ परोपकारासाठीच तो बाळगतो. पर्वत कोणाला या म्हणत नाही, नको म्हणत नाही किंवा कंटाळून कोणाला बाहेर घालवीत नाही. याचकाची जी इच्छा असेल ती परोपकारबुद्धीने तो पूर्ण करतो. ग्रीष्मऋतुु संपताना त्यावरील गवत, पाणी, धान्य वगैरे सगळे संपून जाते. पण याचकाला देताना तो मागे सरत नाही. म्हणून भगवंत देखील लागलीच मेघवृष्टी करून त्याला समृद्ध करून सोडतो.

या ठिकाणी नाथांनी 'दातृत्वाबद्दल' एक महत्त्वाचे रहस्य सांगितले आहे. आपण देत राहिले की आपल्याला मिळत राहते. नेहमी मागत राहणाऱ्याला कधी मिळत नाही. देण्याने धन, संपत्ती, विद्या, ज्ञान सर्व वाढते. कारण देणाऱ्याची काळजी भगवान स्वत: घेतो.

जंव जंव उल्हासे दाता देतु, तंव तंव पुरवी जगन्नाथु।विकल्प न धरिता मनाआतु, देता अच्युतु अनिवार।

खरा दाता जसजसा उल्हासाने दान देऊ लागतो, तसतसा भगवंत त्याला पाठपुरवठा करीत जातो. मनात विकल्प धरला नाही, शंका घेतली नाही, तर भगवंत अनिवारपणे दाता होतो. खरा दाता तर भगवंतच आहे. या विश्वाचा खरा मालक, खरा स्वामी कोण? भगवंतच खरा मालक नव्हे काय? आपण कोणीही हे दान देता ते भगवंतानेच आपल्याला दिले आह. मन देताना हात मागे का घेता? नाथ म्हणतात, भगवंत खरा दाता आहे, हे संशयाने पछाडलेल्या लोकांना पटत नाही. म्हणून त्यांना दारिद्र्य भोगावे लागते.'

हेही वाचा : दत्तगुरुंच्या चोवीस गुरुंपैकी पहिला गुरु : पृथ्वी!