शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

coronavirus: ...म्हणून काळजीला दूर ठेवण्याची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 10:54 IST

आपले जीवन किती अस्थिर आहे हे ‘कोविड-१९’ने दाखवून दिले असून, निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत काळजी न करता त्याच्याशी लढायला शिकायला हवे. यासाठी शांतचित्ताने भगवंताचे नामस्मरण करीत कर्तव्य पार पाडणे आणि एकमेकांना धीर देत आनंदी राहणे एवढे आपल्या हाती आहे.

- स्नेहलता देशमुखआपले जीवन किती अस्थिर आहे हे ‘कोविड-१९’ने दाखवून दिले असून, निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत काळजी न करता त्याच्याशी लढायला शिकायला हवे. यासाठी शांतचित्ताने भगवंताचे नामस्मरण करीत कर्तव्य पार पाडणे आणि एकमेकांना धीर देत आनंदी राहणे एवढे आपल्या हाती आहे. काळजी करण्याने मानसिक व शारीरिक आजार बळावतात. काळजी करायला काही कारण लागत नाही. कारण ती आपल्यापाशीच असते; पण आपण एकमेकांना धीर देताना काळजी घ्या स्वत:ची म्हणतो आणि काळजी वाढवितो. रक्तदाब व साखरेचे प्रमाण वाढवतो. अनेक आजारांना जणू निमंत्रण देतो. हे टाळायचे तर कर्तव्य करता करता भगवंतावर निष्ठा ठेवून आत्मविश्वास वाढवून कामावर लक्ष केंद्रित करून मनाच्या काळजीचे दार बंद करणे उत्तम. संकट आले की, आपण कुंडली मांडतो, ज्योतिषाकडे जातो. गुरूकडे जातो. त्यांनी सुचवलेले उपाय करतो. पैसे खर्च करतो; पण काळजी काही दूर होत नाही. भगवंताचे नामस्मरण स्थिर, प्रसन्न चित्ताने मांडी घालून, दीर्घ श्वसन करून एका बिंदूवर लक्ष केंद्रित केल्यास मेंदूचा छोटासा भाग उद्दिपीत होतो आणि त्या पिट्युटरी ग्रंथीतून एल्लङ्मि७्रस्रँ्रल्ल२ नावाची एल्ल९८ेी२ स्रावतात. ही एल्ल९८ेी२ प्रतिकारशक्ती म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवितात. आपले मन स्थिर होते. आजच्या ताण-तणावाच्या काळात सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणे, अहंभाव दूर ठेवणे हा काळजी दूर करण्याचा उपाय आहे. देहाभिमान दूर ठेवला तर प्रपंचातली काळजी सहज दूर होईल. लहान मुलाकडून शिकण्यासारखी छोटी गोष्ट. पावसाचे पाणी जमा झाले की, मुले होड्या करतात व त्या पाण्यात सोडतात. काही होड्या छान तरंगतात. त्यामुळे मुले टाळ्या वाजवून हसतात. काही होड्या बुडतात, तरीसुद्धा ही मुले होडी बुडली म्हणूनही हासतात. म्हणूनच ‘सुख-दु:खे समे कृत्वा लाभा लाभौजया जयू...’ आनंदी राहा आणि म्हणा ‘आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वव:’’

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक