शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भूतकाळात घडलेल्या चुकांमुळे सतत अस्वस्थ आहात? मग 'हे' वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 08:00 IST

चूक झाली, हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा व मोठेपणा हवा. झालेली चूक पुन्हा घडू नये यासाठी मनाचा जागरुकपणा हवा.

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो हुशार माणूस आणि घडलेल्या चुका पुन्हा घडूच देत नाही तो देव माणूस! अशी एक व्याख्या आपल्याकडे सांगितली जाते. हा साधा विचार आपल्याला कळूनही, पटूनही आपण बऱ्याचदा घडलेल्या चुकांच्या अपराधी भावनेत आयुष्य वाया घालवतो. मग या अपराधी भावनेतून स्वतःची सुटका कशी करावी, हा जर तुमचा प्रश्न असेल, तर शेवट्पर्यंत वाचा. 

मुळात चूक घडली की केली, हे कळणे महत्त्वाचे आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. चुकत चुकत आपण शिकत जातो. हातून चुका होणारच नाहीत, अशी व्यक्ती या जगात नाहीच. त्यामुळे चुका घडत असतील तर ते प्रगतीचे लक्षण आहे. परंतु वारंवार एकच चूक घडत असेल, तर तो आपल्या आकलन क्षमतेचा दोष ठरू शकतो. तर मूळ मुद्दा हा आहे, की चुका अजाणतेपणी घडल्या आहेत की जाणून बुजून केल्या आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे. 

उदा. रस्त्यावरून वाहन चालवताना सगळे नियम पाळूनही चुकून अपघात घडतात, ही नकळत किंवा परिस्थिती मुळे झालेली चूक आहे, तर नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने गाडी चालवत वाटेत येईल त्याला तुडवत जाणे ही जाणून बुजून केलेली चूकच नाही, तर अक्षम्य अपराध आहे. या दोहोंतला फरक लक्षात घेतला, तर आपल्या हातून घडलेल्या चुकांचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. 

काही गोष्टी स्थळ, काळ, परिस्थिती, व्यक्तिनुरूप घडून जातात. त्याक्षणी योग्य वाटलेला निर्णय आयुष्यभरासाठी अपराधी भाव निर्माण करणारा ठरू शकतो. अशा वेळी, सर्वात आधी घडून गेलेली गोष्ट का घडली, ती टाळता आली असती का, भविष्यात त्याचे काय पडसाद उमटणार आहेत, चूक मान्य केल्याने अपराधी भावातून मुक्तता होणार आहे का, या गोष्टींचा सर्वांगीण विचार करा. घडून गेलेल्या घडनेत कोणीच बदल घडवू शकत नाही, परंतु चूक मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो. त्या चुकीची जाणीव होऊन तीच चूक हातून पुन्हा घडत नाही. पुढच्या वेळेस निर्णय घेताना आपण सावध पवित्रा घेतो. शक्य तेवढ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतो. 

यासाठी चूक झाली, हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा व मोठेपणा हवा. झालेली चूक पुन्हा घडू नये यासाठी मनाचा जागरुकपणा हवा. या गोष्टींचा नीट विचार केला असता, अपराधीपणाचे ओझे आयुष्यभर मनावर वाहावे लागणार नाही. चुका होणे ही सामान्य बाब आहे, परंतू आपल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागत असेल, तर ती चूक नाही अपराध आहे. या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी निदान क्षमा मागणे ही पहिली पायरी आहे आणि अशा चुका हातून घडू न देणे ही अंतिम पायरी आहे. 

आयुष्य छोटं आहे. ते कुढत जगू नका. आनंदात जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदात जगू द्या. आपण जगाला फसवू शकतो, पण स्वतःला नाही. स्वतःशी कायम प्रामाणिक राहा आणि आपल्या मनाचा कौल घेत राहा.