शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तारतम्य कौटुंबिक जीवनाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 12:04 IST

कौटुंबिक सभासदांच्या अंतर मनातील स्वर आपल्याला ऐकू येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनाचे तारतम्य आपल्या लक्षात येईल.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत तारतम्य या शब्दाचा उल्लेख ७२ वेळा केलेला आहे. मानवी जीवनात तुमचा आमचा वेगवेगळ्या क्षेत्रात संबंध येतो. पण या क्षेत्राशी संबंधित जे तारतम्य आहे हे कसं सांभाळायचं या बाबतीत आपण अनभिज्ञ असतो. ते आपल्या लक्षात आले म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी वाटचाल करु शकतो. याबाबतीत असलेले 'तारतम्य' राष्ट्रसंतानी अगदी आवार्जन सांगितले आहे.प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तींचा सुसंवाद असणे हे तारतम्य सांभाळणे ही आज काळाची गरज आहे. कोणाच्याही कुटुंबात सर्वच सदस्य खराब नसतात. तर त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल पणाचे जर भान करुन दिले तर घराच घरपण टिकवणे सहज शक्य आहे. काही दिवसांपूर्वी झोपडीच्या घरात लोक गुण्यागोविंदाने जीवन जगत होते. आज गगनचुंबी इमारतीत सर्व वैभव अनुकुल असतांना समाधान नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज कौटुंबिक संवाद लोप पावला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आज एकत्र बसण्याची नितांत गरज आहे. एकमेकाच्या विचाराची देवाण घेवाण, कुटुंबाची मिळकत, अपेक्षित खर्च, इतर समस्या यावर एकत्रित बसून जर चर्चा झाली तर प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव निर्माण होईल व घरगुती एकोपा साधल्या जाईल. त्याकरीता प्रत्येक घरात किमान महिन्यातून एकदा एकत्र बसणे गरजेचे आहे. तरच आपल्या घराचे घरपण आपण कायम टिकवून ठेवू शकतो. आजच्या परिस्थितीत घराच घरपण हरवल्या सारख आहे. काही दिवसा अगोदर प्रत्येक गावाला गावपण होत ते आता अदृश्य झालं. ज्या गावात आपलं घर आहे त्या घरात बसून हजारो कि.मी. अंतरावरचं संगीत आपण ऐकतो. पण ज्या दिवशी आपल्या कौटुंबिक सभासदांच्या अंतर मनातील स्वर आपल्याला ऐकू येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनाचे तारतम्य आपल्या लक्षात येईल. 

- हभप मुरलीधर महाराज हेलगे (मृत्यूंजय) किन्ही सवडत 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक