शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

Chaturmas 2024: चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : पतीत तू पावना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:43 IST

Chaturmas 2024: चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत.

संत कान्होपात्रा यांचा हा अभंग आपण रेडिओवर मधुवंती दांडेकर यांच्या सुस्वरात ऐकला आहे. संत कान्होपात्रा या संगीत नाटकात या अभंगाचा वापर करून त्याला सुंदर चाल दिल्याने ते नाट्यपद म्हणून प्रसिद्ध झाले. वास्तविक पाहता, तो एक अभंग आहे. कान्होपात्रेने लिहिलेला. यात तिने म्हटलं आहे-

पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥

तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥

याती शुद्ध नाहीं भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥

मुखीं नाम नाहीं । कान्होपात्रा शरण पायीं ॥४॥

कान्होपात्रा ही एक गणिका. आजच्या भाषेत सांगायचं तर वेश्या! नाईलाजाने या व्यायवसायात आली होती. पण मंगळवेढ्यात संत मंडळींच्या सहवासात राहून तिला विठ्ठल भक्तीचा लळा लागला आणि विठ्ठलाचा ध्यास घेत ती पांडुरंगात सामावून गेली. 

मात्र तिचा प्रवास सोपा नव्हता. दिसायला सुंदर, नाजूक आणि हा असा व्यवसाय म्हटल्यावर लोक तिला मिळवण्यासाठी झटत होते. मात्र संसार बंधनात अडकणारी ती नव्हती. म्हणून तिने देवाला धावा केला आणि म्हटलं, पतितांना पावन करून घेणाऱ्या नारायणा, मलाही पावन करून घे. 

तू आजवर तुझा शब्द मोडलेला नाहीस, वचन पूर्ती केली आहेस, माधवा, माझी हाक ऐक आणि माझाही शब्द मोडू देऊ नकोस. मला साथ देण्याचे वचन दे. तुझ्यावर माझी गाढ श्रद्धा आहे. 

माझी याती अर्थात जाती, व्ययवसाय उच्च वर्णीय नाही, पण माझ्या मनीचा भाव शुद्ध आहे, पवित्र आहे, मात्र नाईलाजाने हा व्यवसाय करावा लागत आहे, निदान तू तरी मला समजून घे. 

तुझे नाव माझ्या मुखात नाही, असा एक क्षणही  गेला नाही. ही कान्होपात्रा तुला शरण आली आहे, तिचा स्वीकार कर आणि स्वतः मध्ये सामावून घे, असा आर्जव तिने केला आहे. 

संतांनी आपल्या शिकवणुकीतून सिद्ध केले आहे, की ज्ञाती शुद्ध नसली तरी चालेल पण भाव शुद्ध हवा, त्याचे भक्ती भावाने आपणही नारायणाला शरण जाऊया. 

टॅग्स :chaturmasचातुर्मास