शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Chaturmas 2024: चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : पतीत तू पावना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:43 IST

Chaturmas 2024: चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत.

संत कान्होपात्रा यांचा हा अभंग आपण रेडिओवर मधुवंती दांडेकर यांच्या सुस्वरात ऐकला आहे. संत कान्होपात्रा या संगीत नाटकात या अभंगाचा वापर करून त्याला सुंदर चाल दिल्याने ते नाट्यपद म्हणून प्रसिद्ध झाले. वास्तविक पाहता, तो एक अभंग आहे. कान्होपात्रेने लिहिलेला. यात तिने म्हटलं आहे-

पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥

तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥

याती शुद्ध नाहीं भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥

मुखीं नाम नाहीं । कान्होपात्रा शरण पायीं ॥४॥

कान्होपात्रा ही एक गणिका. आजच्या भाषेत सांगायचं तर वेश्या! नाईलाजाने या व्यायवसायात आली होती. पण मंगळवेढ्यात संत मंडळींच्या सहवासात राहून तिला विठ्ठल भक्तीचा लळा लागला आणि विठ्ठलाचा ध्यास घेत ती पांडुरंगात सामावून गेली. 

मात्र तिचा प्रवास सोपा नव्हता. दिसायला सुंदर, नाजूक आणि हा असा व्यवसाय म्हटल्यावर लोक तिला मिळवण्यासाठी झटत होते. मात्र संसार बंधनात अडकणारी ती नव्हती. म्हणून तिने देवाला धावा केला आणि म्हटलं, पतितांना पावन करून घेणाऱ्या नारायणा, मलाही पावन करून घे. 

तू आजवर तुझा शब्द मोडलेला नाहीस, वचन पूर्ती केली आहेस, माधवा, माझी हाक ऐक आणि माझाही शब्द मोडू देऊ नकोस. मला साथ देण्याचे वचन दे. तुझ्यावर माझी गाढ श्रद्धा आहे. 

माझी याती अर्थात जाती, व्ययवसाय उच्च वर्णीय नाही, पण माझ्या मनीचा भाव शुद्ध आहे, पवित्र आहे, मात्र नाईलाजाने हा व्यवसाय करावा लागत आहे, निदान तू तरी मला समजून घे. 

तुझे नाव माझ्या मुखात नाही, असा एक क्षणही  गेला नाही. ही कान्होपात्रा तुला शरण आली आहे, तिचा स्वीकार कर आणि स्वतः मध्ये सामावून घे, असा आर्जव तिने केला आहे. 

संतांनी आपल्या शिकवणुकीतून सिद्ध केले आहे, की ज्ञाती शुद्ध नसली तरी चालेल पण भाव शुद्ध हवा, त्याचे भक्ती भावाने आपणही नारायणाला शरण जाऊया. 

टॅग्स :chaturmasचातुर्मास