शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मोबाईल, लॅपटॉपइतकेच मनाचे चार्जींगही महत्त्वाचे!- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 08:00 IST

सकाळी उठल्यावर न विसरता जसे आपण आपले गॅझेट्स चार्ज करतो, तसे मनाला सकारात्मक विचारांचे चार्जिंग होणे महत्त्वाचे आहे!

रोज सकाळी उठल्यापासून आपण यंत्रवत कामाला सुरू करतो.  सुटीचा दिवस वगळता आपल्या दिनचर्येत सहसा बदल होत नाही. मात्र, याच तोचतोपणामुळे आपले आयुष्यसुद्धा चाकोरीबद्ध झाले आहे. त्यावर पर्याय एकच, ज्याप्रमाणे उठल्यावर आपण मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगला लावतो, तसे रोज किमान तासभर आपल्या मनाचेही चार्जिंग करून घ्या, सांगत आहेत ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.

अतिश्रमामुळे जसे शरीर थकते, तसे अतिविचारामुळे मन थकते. त्याला गरज असते विश्रांतीची. परंतु आपण ती मिळूच देत नाही. सतत आपल्या मनावर, बुद्धीवर विचारांचा भडीमार करत राहतो. त्यामुळे मन योग्य दिशेने विचार करायचे सोडून चुकीच्या दिशेने विचार करू लागते. म्हणून मन शांत ठेवण्यासाठी दिवसभरातील चोवीस तासांपैकी एक तास फक्त मनासाठी द्या. ते शांत असेल, तर बाह्य जगतात कितीही तणावाचे प्रसंग आले, तरी तुम्ही ते सहज हाताळू शकाल. 

आपल्याला स्वत:मध्ये बदल करायचा आहे. आपला प्रवास कलियुगाकडून सत्ययुगाच्या दिशेने न्यायचा आहे. सत्यनारायण पूजेत सांगितले जाते, ज्याचे कर्म चांगले तो नराचा नारायण होतो. याचा अर्थ सत्ययुगात नारायण आणि लक्ष्मीचे अस्तित्त्व होते, कलियुगात नर आणि नारीचे अस्तित्त्व आहे. परंतु, आपल्या चांगल्या कर्माने आपण कलियुगातही सत्ययुग आणू शकतो. त्यासाठी आपल्याठायी क्षमाशील वृत्ती हवी.

कोणाचे आभार मानायचे आहेत, कोणाचे माफी मागायची आहे, कोणाला मदत करायची आहे, कोणाशी हितगुज करायची आहे, तर आज करू उद्या करू म्हणत दिरंगाई करू नका. वर्तमानात जगा, आहे तो क्षण अनुभवून घ्या, जगून घ्या. ज्या क्षणी जे महत्त्वाचे आहे, त्या गोष्टी करून मोकळे व्हा. असे केल्यामुळे तुमच्या मनावर कसलेही ओझे राहणार नाही. मन आपोआप शांत राहील. शांत मन चांगल्या कामात रमवता येईल. तुम्ही प्रसन्न व्हाल आणि तुम्हाला पाहून इतरांनाही प्रसन्न वाटेल. 

या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे, फक्त मनाचे चार्जिंग विसरू नका.