शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल, लॅपटॉपइतकेच मनाचे चार्जींगही महत्त्वाचे!- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 08:00 IST

सकाळी उठल्यावर न विसरता जसे आपण आपले गॅझेट्स चार्ज करतो, तसे मनाला सकारात्मक विचारांचे चार्जिंग होणे महत्त्वाचे आहे!

रोज सकाळी उठल्यापासून आपण यंत्रवत कामाला सुरू करतो.  सुटीचा दिवस वगळता आपल्या दिनचर्येत सहसा बदल होत नाही. मात्र, याच तोचतोपणामुळे आपले आयुष्यसुद्धा चाकोरीबद्ध झाले आहे. त्यावर पर्याय एकच, ज्याप्रमाणे उठल्यावर आपण मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगला लावतो, तसे रोज किमान तासभर आपल्या मनाचेही चार्जिंग करून घ्या, सांगत आहेत ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.

अतिश्रमामुळे जसे शरीर थकते, तसे अतिविचारामुळे मन थकते. त्याला गरज असते विश्रांतीची. परंतु आपण ती मिळूच देत नाही. सतत आपल्या मनावर, बुद्धीवर विचारांचा भडीमार करत राहतो. त्यामुळे मन योग्य दिशेने विचार करायचे सोडून चुकीच्या दिशेने विचार करू लागते. म्हणून मन शांत ठेवण्यासाठी दिवसभरातील चोवीस तासांपैकी एक तास फक्त मनासाठी द्या. ते शांत असेल, तर बाह्य जगतात कितीही तणावाचे प्रसंग आले, तरी तुम्ही ते सहज हाताळू शकाल. 

आपल्याला स्वत:मध्ये बदल करायचा आहे. आपला प्रवास कलियुगाकडून सत्ययुगाच्या दिशेने न्यायचा आहे. सत्यनारायण पूजेत सांगितले जाते, ज्याचे कर्म चांगले तो नराचा नारायण होतो. याचा अर्थ सत्ययुगात नारायण आणि लक्ष्मीचे अस्तित्त्व होते, कलियुगात नर आणि नारीचे अस्तित्त्व आहे. परंतु, आपल्या चांगल्या कर्माने आपण कलियुगातही सत्ययुग आणू शकतो. त्यासाठी आपल्याठायी क्षमाशील वृत्ती हवी.

कोणाचे आभार मानायचे आहेत, कोणाचे माफी मागायची आहे, कोणाला मदत करायची आहे, कोणाशी हितगुज करायची आहे, तर आज करू उद्या करू म्हणत दिरंगाई करू नका. वर्तमानात जगा, आहे तो क्षण अनुभवून घ्या, जगून घ्या. ज्या क्षणी जे महत्त्वाचे आहे, त्या गोष्टी करून मोकळे व्हा. असे केल्यामुळे तुमच्या मनावर कसलेही ओझे राहणार नाही. मन आपोआप शांत राहील. शांत मन चांगल्या कामात रमवता येईल. तुम्ही प्रसन्न व्हाल आणि तुम्हाला पाहून इतरांनाही प्रसन्न वाटेल. 

या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे, फक्त मनाचे चार्जिंग विसरू नका.