शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

राशीनुसार केलेले मंत्रोच्चारण अधिक लाभदायक ठरते; जाणून घ्या तुमच्या राशीसाठी सुयोग्य मंत्र कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 12:18 IST

अध्यात्मामध्ये आणि ज्योतिष शास्त्रानेदेखील नामस्मरणाला पर्याय नाही, असे सांगितले आहे.

प्रत्येक राशीवर त्याच्या राशी स्वामींचा आणि नवग्रहांचा परिणाम दिसून येतो. परंतु त्याहीपेक्षा अधिक परिणामकार ठरते, ती म्हणजे उपासना. आपल्या ग्रहांची दशा योग्य आहे की अयोग्य हे आपल्याला ज्ञात नाही आणि तेवढा आपला अभ्यासपण नाही. परंतु, कितीही वाईट ग्रहदशा असेल, तरी परमेश्वर कृपेने प्राप्त परिस्थितीवर मात करण्याचे बळ प्राप्त होते. म्हणून अध्यात्मामध्ये आणि ज्योतिष शास्त्रानेदेखील नामस्मरणाला पर्याय नाही, असे सांगितले आहे. नामस्मरण करण्यासाठी जपाची माळ हे माध्यम वापरले जाते.

प्रत्येकाने आपल्या इष्टदेवतेची पूजा, अर्चा करावी, नामस्मरण घ्यावे, त्याचबरोबर आपल्या राशीला अनुकूल अशा मंत्राचा जप करावा असे ज्योतिष शास्त्र सांगते. राशीनुसार केलेल्या नामजपामुळे ग्रहस्थिती सुधारण्यात नक्कीच मदत होते. म्हणून पुढे दिलेले मंत्र आपल्या राशी नुसार दिवसातून एकदा जपावेत. हे मंत्र भगवान महाविष्णूंचे प्रभावी मंत्र आहेत. भगवान विष्णू हे जगताचे पालक आहेत, ते आपल्या मार्गातील अडचणी दूर करतील तसेच अडचणींवर मात करण्याचे बळ अवश्य देतील. यासाठी श्रद्धेने आणि शांत चित्ताने हे नामस्मरण करावे. 

मेष- ॐ ह्रीं श्रीं श्रीलक्ष्मीनारायणाय नम:।

वृषभ- ॐ गोपालाय उत्तरध्वजाय नम:।

मिथुन- ॐ क्लीं कृष्णान नम:।

कर्क- ॐ ह्रीं हिरण्यगर्भाय अव्यक्तरूपिणे नम:।

सिंह- ॐ क्लीं ब्राह्मणे जगदाधाराय नम:।

कन्या- ॐ पीं पिताम्बराय नम:।

तुला- ॐ तत्वनिरंजनाय तारक रामाय नम:।

वृश्चिक- ॐ नारायणाय सूरसिंहाय नम:।

धनु- ॐ श्रीं देवकृष्णाय उर्ध्वजाय नम:।

मकर- ॐ श्रीं वत्सलाय नम:।

कुंभ- ॐ श्रीं उपेन्द्राय अच्युताय नम:।

मीन- ॐ क्लीं उद्धृताय उद्धारिणे नम:।