शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Chandra Grahan 2021 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी आहे व त्याचा इथे प्रभाव पडणार आहे का जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 16:53 IST

Chandra Grahan 2021: कार्तिक पौर्णिमेला धर्मशास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व आहे. आंशिक चंद्रग्रहणामुळे भारतातील बहुतांश भागात ते दिसणार नाही. हे फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागातच दिसेल.

या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आता होणार आहे. याआधी मे महिन्यात चंद्रग्रहण झाले होते. आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण कार्तिक पौर्णिमेला होणार आहे. 

कार्तिक पौर्णिमेला धर्मशास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व आहे. आंशिक चंद्रग्रहणामुळे भारतातील बहुतांश भागात ते दिसणार नाही. हे फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागातच दिसेल.

ग्रहणकाळ निषिद्ध मानला जाणार नाही -

हे चंद्रग्रहण आंशिक असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. दुसरीकडे, कार्तिक पौर्णिमेमुळे, या दिवशी लोक गंगेत स्नान करतात, दिवे दान करतात, अन्नदान करतात. या आंशिक ग्रहणामुळे सर्व धार्मिक कार्ये सामान्य पद्धतीने करू शकतील. ज्योतिषशास्त्रानुसार, १९ नोव्हेंबर २०२१ रोजी, शुक्रवारी हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५. ३३ मिनिटांनी संपेल.

वृषभ राशीवर पडणार प्रभाव 

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण वृषभ राशीत होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात थोडी काळजी घेतली पाहिजे. हे ग्रहण भारतात प्रभावी नसले तरी वृषभ राशीवर थोड्या बहुत प्रमाणात प्रभाव पडेल. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात देवाचे नामस्मरण करावे व ग्रहणकाळ संपल्यावर आवर्जून दान करावे. 

२०२१ या वर्षभरात एकूण ४ ग्रहणे आली. त्‍यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण आहेत. यापैकी १ सूर्यग्रहण आणि १ चंद्रग्रहण झाले आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेम्बर रोजी तर सूर्यग्रहण ४ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे.