शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चाणक्यनीती : तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर 'या' तीन गोष्टी आयुष्यातून वगळाव्या लागतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:47 IST

चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपणही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. 

समर्थ रामदासस्वामी सांगतात, ' जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला!' अर्थात परावलंबी आयुष्य न जगता स्वावलंबी आयुष्य जगणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी लोकांकडे पाहिले तर त्यांच्या जीवनावरून आपल्याला हाच आदर्श घेता येईल, की ते लहानात लहान गोष्टी स्वतः करणे पसंत करतात अन्यथा शिकून घेतात. आचार्य चाणक्य सांगतात, तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर पुढील तीन गोष्टींचा सखोल विचार करा. या गोष्टी तुमच्या यशाला तारक ठरतील आणि नाही शिकलात तर मारक ठरतील!

चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. असेही म्हणता येईल की यशस्वी लोकांमध्ये काही गोष्टी साम्य असतात. या गोष्टी किंवा गुण त्यांना यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपणही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. 

प्रत्येक माणसाला आयुष्यात सन्मान मिळावा असे वाटते. पण तो अशा काही चुका करतो ज्या घोर अपमानाचे कारण बनतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणे चांगले. आज आपण अशाच ३ गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे अपमान होतो.

इतरांवर अवलंबून राहणे: असे लोक जे नेहमी इतरांवर अवलंबून असतात, त्यांचा कधी ना कधी अपमान होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची सवय सोडा. मेहनती व्हा आणि पुढे येऊन जबाबदारी घ्या. मेहनती, आत्मविश्वासू आणि स्वावलंबी लोकांना नेहमीच सर्वत्र सन्मान मिळतो.

अज्ञान : अज्ञानामुळे अपमान होतो. तर ज्ञानी माणसाला सर्वत्र आदर मिळतो. म्हणून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा आणि अज्ञानाचा अंधार तुमच्या जीवनातून दूर करा.

राग: रागावलेला माणूस कधीकधी संयम गमावतो आणि अशा गोष्टी करतो ज्यामुळे त्याची प्रतिमा खराब होते. याशिवाय रागाच्या भरात बोललेले कटू शब्द माणसाचे अनेक शत्रू निर्माण करतात, ते शत्रू अपमानाचा बदला घेतात. रागाने माणसाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते. म्हणून शक्य तेवढे रागावर नियंत्रण मिळवा. 

रतन टाटा, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, असीम प्रेमजी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सुधा मूर्ती यासारख्या व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घ्या आणि आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी वगळून चांगल्या गोष्टींना, सवयींना आयुष्यात स्थान द्या. तुमचाही उत्कर्ष होईल.