शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी टाळल्या, तर आयुष्यात पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही! - चाणक्यनीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 07:00 IST

Chanakyaniti: कोणतीही कृती विचारपूर्वक करावी असे म्हणतात, पण तो विचार नेमका कोणता? सांगताहेत आचार्य चाणक्य!

आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. याकाळात जर तरुणांनी आपली प्रतिभा समजून घेतली आणि आपली सर्व शक्ती योग्य दिशेने लावली तर तो काहीही साध्य करू शकतो. एवढेच नाही तर त्यांनी कोणतेही ध्येय ठरवले तरी ते साध्य होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ, ताकद, आरोग्य इ. पण हा वेळ त्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवला तर त्यांना आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी यशाच्या आड येणाऱ्या या गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.

व्यसनाधीनता: नशा सर्व काही उध्वस्त करते, परंतु तारुण्यात व्यसनाधीन होण्याने व्यक्तीचे करिअर, आरोग्य, कौटुंबिक जीवन, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा नाश होतो. तो निराशेच्या, नैराश्याच्या गर्तेत सापडतो. अशा परिस्थितीत, इच्छा असूनही, त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊ शकत नाही. त्याचे असे नुकसान होते, जे भरून काढणे शक्य नसते.

आळस: आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही काहीही साध्य करू शकत नाही. जर त्याच्या तारुण्यात आळसाने त्याला घेरले तर तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ गमावतो. त्याऐवजी, त्याने आपल्या आयुष्यातील या सर्वात उत्साही वेळेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.

वाईट संगत : माणूस कितीही सुसंस्कृत, सद्गुणी, कष्टाळू, हुशार असला तरी वाईट संगतीत पडल्यास त्याचा नाश नक्कीच होतो. आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर तो मोठ्या संकटात सापडतो आणि त्याचे भविष्य गमावतो. म्हणून आपण कोणाच्या सान्निध्यात राहतोय याची पारख आपण वरचेवर केली पाहिजे. स्वार्थी, खोटारड्या आणि अहंकारी माणसांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तर स्वतःचा आणि इतरांचा विकास, प्रगती करणाऱ्या, दुसऱ्यांना मदत करणाऱ्या, खरे बोलणाऱ्या लोकांशी मैत्री केली पाहिजे. तरच प्रगती होत राहील.