शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी टाळल्या, तर आयुष्यात पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही! - चाणक्यनीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 07:00 IST

Chanakyaniti: कोणतीही कृती विचारपूर्वक करावी असे म्हणतात, पण तो विचार नेमका कोणता? सांगताहेत आचार्य चाणक्य!

आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. याकाळात जर तरुणांनी आपली प्रतिभा समजून घेतली आणि आपली सर्व शक्ती योग्य दिशेने लावली तर तो काहीही साध्य करू शकतो. एवढेच नाही तर त्यांनी कोणतेही ध्येय ठरवले तरी ते साध्य होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ, ताकद, आरोग्य इ. पण हा वेळ त्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवला तर त्यांना आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी यशाच्या आड येणाऱ्या या गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.

व्यसनाधीनता: नशा सर्व काही उध्वस्त करते, परंतु तारुण्यात व्यसनाधीन होण्याने व्यक्तीचे करिअर, आरोग्य, कौटुंबिक जीवन, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा नाश होतो. तो निराशेच्या, नैराश्याच्या गर्तेत सापडतो. अशा परिस्थितीत, इच्छा असूनही, त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊ शकत नाही. त्याचे असे नुकसान होते, जे भरून काढणे शक्य नसते.

आळस: आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही काहीही साध्य करू शकत नाही. जर त्याच्या तारुण्यात आळसाने त्याला घेरले तर तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ गमावतो. त्याऐवजी, त्याने आपल्या आयुष्यातील या सर्वात उत्साही वेळेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.

वाईट संगत : माणूस कितीही सुसंस्कृत, सद्गुणी, कष्टाळू, हुशार असला तरी वाईट संगतीत पडल्यास त्याचा नाश नक्कीच होतो. आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर तो मोठ्या संकटात सापडतो आणि त्याचे भविष्य गमावतो. म्हणून आपण कोणाच्या सान्निध्यात राहतोय याची पारख आपण वरचेवर केली पाहिजे. स्वार्थी, खोटारड्या आणि अहंकारी माणसांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तर स्वतःचा आणि इतरांचा विकास, प्रगती करणाऱ्या, दुसऱ्यांना मदत करणाऱ्या, खरे बोलणाऱ्या लोकांशी मैत्री केली पाहिजे. तरच प्रगती होत राहील.