शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
2
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
3
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
4
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
5
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
6
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
7
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
8
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
9
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
10
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
11
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
12
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
13
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
14
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
15
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
16
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
17
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
18
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
19
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
20
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?

Chanakyaniti: तुम्ही सुखी आहात पण समाधानी नाही? आचार्य चाणक्य सांगताहेत त्रिसूत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:05 IST

Chanakyaniti: आपल्या सकट सभोवतालचा प्रत्येक जण सुखासाठी धडपडत आहे, पण शाश्वत सुख समाधानात आहे आणि ते हवे असेल तर जाणून घ्या ही त्रिसूत्री!

चाणक्य नीती हा महान कूटनीतीज्ञ आणि अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यात त्यांनी मानवी आयुष्यातील अनेक बाजूंवर सखोल विचार करून त्यावर तोडगे दिले आहेत. ते अमलात आणले तर आपल्यालाही यशस्वी आयुष्याच्या दिशेने निश्चितपणे घोडदौड करता येईल. यासाठी त्यांनी शिकवलेल्या नीतिमूल्यांचा बारकाईने अभ्यास करू आणि ते मंत्र आत्त्मसात करू. 

वादात पडायला कोणालाही आवडत नाही. मात्र अनेकदा आपण विनाकारण वादविवादात अडकतो आणि समोरच्याशी वैर घेऊन बसतो. त्यामुळे होणार मनःस्ताप आणखीनच वेगळा. या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आचार्य चाणक्य तीन गोष्टींवर ताबा मिळवा असे सुचवतात. त्या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊया. 

अहंकार : अहंकाराची बाधा झालेला मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. स्वतःला सर्वेसर्वा समजण्यात आणि स्वतःची योग्यता सिद्ध करण्यात त्यांचे आयुष्य खर्च होते. गर्वाचे घर खाली, अशी आपल्याकडे म्हण आहे, ती यासाठीच! स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. स्वाभिमान आत्मविश्वास वाढवतो तर अभिमान अहंकाराला खतपाणी घालतो! अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की आपण आपल्या कलागुणांचा योग्य वापर करू शकत नाही. इतरांकडून चांगले शिकण्याची क्षमता गमावून बसतो. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, अशी देवाजवळ प्रार्थना करायची आणि आपण स्वतःशी कायम प्रामाणिक राहायचे!

स्वार्थ : स्वार्थाने बरबटलेली व्यक्ती दुसऱ्यांचे हित पाहू शकत नाही. ती आपल्याच कोशात असते. आपले भले कशात आहे, हे पाहण्याची क्षमता गमावून बसते. त्यातही ताणतणाव आणि वादग्रस्त परिस्थिती असेल, तर अशावेळी स्वार्थी व्यक्ती दुसऱ्यांसमोर लाचार होते. त्यांच्या तालावर नाचते आणि आत्मसन्मान गमावून बसते.

क्रोध : तुम्ही जेवढे आजवर काही कमावले, ते सगळे एका क्षणात गमावण्याची ताकद रागात असते. कारण तुमचा राग तुमच्या व्यक्तिमत्त्वाची उणी बाजू दाखवतो. राग, क्रोध रास्त जागी असेल तर समोरच्या जरब बसते. याउलट तो अनाठायी व्यक्त झाला तर केवळ एका शब्दाने नाहीतर कृतीने तुम्ही आजवर कमावलेला चांगुलपणा गमावून बसतो. 

अशा या तीन महत्त्वाच्या गोष्टी दिल्यानुसार आटोक्यात ठेवल्या तर या शहरी कोलाहलातही तुम्हाला शांतता आणि समाधान नक्की गवसेल!

टॅग्स :Chanakya Nitiचाणक्य नीति