शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

चाणक्य नीती : वय, कर्म, धन अन्...; आईच्या गर्भातच निश्चित होतात माणसाच्या जीवनातील 'या' ५ गोष्टी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: August 19, 2024 13:02 IST

आचार्य चाणक्य हे इतिहासातील एक असे व्यक्तिमत्व होते, ज्याने हाती शस्त्र न घेता, केवळ बुद्धी आणि नीतीच्या बळावर भारताच्या इतिहासाला एक सुंदर दिशा दिली. आर्य चाणक्य यांनी धर्म, कर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत.

आचार्य चाणक्य हे नाव ऐकताच अशक्यही शक्य करून दाखवणाऱ्या एका अलौकिक आणि बुद्धिमान अशा युग पुरुषाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. आचार्य चाणक्य हे इतिहासातील एक असे व्यक्तिमत्व होते, ज्याने हाती शस्त्र न घेता, केवळ बुद्धी आणि नीतीच्या बळावर भारताच्या इतिहासाला एक सुंदर दिशा दिली. आर्य चाणक्य यांनी धर्म, कर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत. ते आपल्या नीतीशास्त्रामुळे सर्वपरिचित आहेत. त्यांच्या नीती 'चाणक्य नीती' म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे विचार अथवा सिद्धांत आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात.

चाणक्य म्हणतात -आयुः कर्म च वित्तं च, विद्या निधनमेव च।पञ्चैतानि हि सृज्यन्ते, गर्भस्थस्यैव देहिनः।। 

अर्थ - जीव जेव्हा आईच्या गर्भात येतो, तेव्हाच त्याचे वय, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू या पाच गोष्टी निश्चित होऊन जातात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मानवाच्या जीवनातील काही गोष्टी आधीपासूनच निश्चित असतात. जसे, एखादी व्यक्ती किती वर्षांपर्यंत जगणार? ती कशाप्रकारचे कर्म करणार? तिला धनाची प्राप्ती कशी, केव्हा आणि किती होणार? तिचे शिक्षण कसे आणि किती होणार? इथपासून ते मृत्यूपर्यंत. अर्थात, आचार्य चाणक्य यांनी कर्मालाही अत्यंत महत्त्व दिले आहे. यामुळे व्यक्तीने कर्म करत राहायला हवे. कारण मानवी जीवनात कर्माला सर्वात वरचे स्थान देण्यात आले आहे. 

चाणक्य यांच्या मते, वरील पाच गोष्टी आधीपासूनच निश्चित असल्या तरी, व्यक्तीने कर्माचा त्याग करावा, असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही. हिंदू धर्मशास्त्रांतही, कर्माला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. पण, असे असले तरी, एखादी व्यक्ती तिने ग्रहण केलेल्या विद्येनुसार आणि विवेकानुसारच चांगले-वाईट कर्म करत असते. भगवद्गितेतही भागवान श्रीकृष्णांनी कर्माचे महत्त्व विशद केले आहे...

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी