शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
4
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
5
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
6
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
7
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
8
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
9
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
10
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
11
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
12
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
13
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
14
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
16
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
17
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
18
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
19
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
20
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का

चाणक्य नीती : वय, कर्म, धन अन्...; आईच्या गर्भातच निश्चित होतात माणसाच्या जीवनातील 'या' ५ गोष्टी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: August 19, 2024 13:02 IST

आचार्य चाणक्य हे इतिहासातील एक असे व्यक्तिमत्व होते, ज्याने हाती शस्त्र न घेता, केवळ बुद्धी आणि नीतीच्या बळावर भारताच्या इतिहासाला एक सुंदर दिशा दिली. आर्य चाणक्य यांनी धर्म, कर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत.

आचार्य चाणक्य हे नाव ऐकताच अशक्यही शक्य करून दाखवणाऱ्या एका अलौकिक आणि बुद्धिमान अशा युग पुरुषाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. आचार्य चाणक्य हे इतिहासातील एक असे व्यक्तिमत्व होते, ज्याने हाती शस्त्र न घेता, केवळ बुद्धी आणि नीतीच्या बळावर भारताच्या इतिहासाला एक सुंदर दिशा दिली. आर्य चाणक्य यांनी धर्म, कर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत. ते आपल्या नीतीशास्त्रामुळे सर्वपरिचित आहेत. त्यांच्या नीती 'चाणक्य नीती' म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे विचार अथवा सिद्धांत आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात.

चाणक्य म्हणतात -आयुः कर्म च वित्तं च, विद्या निधनमेव च।पञ्चैतानि हि सृज्यन्ते, गर्भस्थस्यैव देहिनः।। 

अर्थ - जीव जेव्हा आईच्या गर्भात येतो, तेव्हाच त्याचे वय, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू या पाच गोष्टी निश्चित होऊन जातात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मानवाच्या जीवनातील काही गोष्टी आधीपासूनच निश्चित असतात. जसे, एखादी व्यक्ती किती वर्षांपर्यंत जगणार? ती कशाप्रकारचे कर्म करणार? तिला धनाची प्राप्ती कशी, केव्हा आणि किती होणार? तिचे शिक्षण कसे आणि किती होणार? इथपासून ते मृत्यूपर्यंत. अर्थात, आचार्य चाणक्य यांनी कर्मालाही अत्यंत महत्त्व दिले आहे. यामुळे व्यक्तीने कर्म करत राहायला हवे. कारण मानवी जीवनात कर्माला सर्वात वरचे स्थान देण्यात आले आहे. 

चाणक्य यांच्या मते, वरील पाच गोष्टी आधीपासूनच निश्चित असल्या तरी, व्यक्तीने कर्माचा त्याग करावा, असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही. हिंदू धर्मशास्त्रांतही, कर्माला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. पण, असे असले तरी, एखादी व्यक्ती तिने ग्रहण केलेल्या विद्येनुसार आणि विवेकानुसारच चांगले-वाईट कर्म करत असते. भगवद्गितेतही भागवान श्रीकृष्णांनी कर्माचे महत्त्व विशद केले आहे...

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी