शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

Chaitra Pournima 2022 : सुख समृद्धीचे द्वार उघडावे असे वाटत असेल तर चैत्र पौर्णिमेला करा 'हे' प्रभावी उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 15:05 IST

Chaitra Pournima 2022 : हे उपाय केल्यास धन आणि सौभाग्य वाढण्यास फायदा होऊ शकतो.

हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी श्रीराम भक्त हनुमान यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच पौर्णिमेनिमित्त भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास केला जातो. सौभाग्यप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेचीदेखील पूजा केली जाते. यासाठी काही खास उपाय केल्यास खूप फायदा होईल. हे उपाय केल्यास धन आणि सौभाग्य वाढण्यास फायदा होऊ शकतो. या उपायांबद्दल जाणून घेऊया.

चंद्रोदय वेळ - १६ एप्रिल, शनिवार, ०६ वाजून २७ मिनिटे

या दिवशी पूजेबरोबरच पुढील उपाय करा-

>>देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चैत्र पौर्णिमेला लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. यासोबतच संध्याकाळी दिव्याचे दान करणे शुभ राहील.

>>चैत्र पौर्णिमेला चंद्रदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी एका भांड्यात पाणी, दूध आणि थोडे तांदूळ एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील.

>>जर पती-पत्नीमध्ये काही वाद झाला तर पौर्णिमेच्या वेळी दोघे मिळून चंद्रदेवाला अर्घ्य देतात. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.

>>कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मी पूजेसह कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यानंतर मातेचा आशीर्वाद घेऊन लाल कपड्यात गोवऱ्या बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवाव्यात.

>>धन आणि अन्न वाढीसाठी देवीच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. नारळ हे लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते. म्हणून त्याला आपण श्रीफळ असे म्हणतो. श्री म्हणजे लक्ष्मी. नारळ अर्पण केल्यानेदेखील लक्ष्मी माता प्रसन्न होते. 

>>याशिवाय पौर्णिमेच्या निमित्ताने गोर गरिबांना यथाशक्ती दान, गोमातेची पूजा, मूक प्राणी पक्ष्यांना दाणा पाणी ठेवा, त्यायोगेही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा वरद हस्त प्राप्त होईल.