शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जन्म आणि मृत्यू ही तर परमात्म्याकडे जाण्याची द्वारे- ओशो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 12:13 IST

परमात्मा जीवनात आहे, तसा मृत्यूमध्येही आहे. जीवन म्हणजे परमात्म्याचा दिवस तर मृत्यू म्हणजे त्याची रात्र.

मृत्यूच्या दारी उभा असताना तो अनुभव घेण्याची सॉक्रेटिसला विलक्षण ओढ लागली होती. सॉक्रेटिसची एखाद्या लहान मुलासारखी वृत्ती होती. लहान मुलाला कसे प्रत्येक बाबतील प्रश्न पडतात, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते. तो खुशाल विचारतो, 'मी मरेन का?' जर आपण म्हटले , 'हो,' तर तो विचारतो कधी मरेन? आज? उद्या? केव्हा घडेल ही गोष्ट? आणि इथे हा ज्येष्ठवयीन सॉक्रेटिस या लहान मुलाइतकाच ताजा, जिज्ञासू, उत्सुक आहे. त्याच्या लख्ख आरशावर धुळीचा कणही नाही. इतके वय झाले तरी मनाची पाटी लखलखीत आहे. याने जीवन जाणले. हा मृत्यूही जाणून घेईल. ज्याला जीवन आणि मृत्यू दोन्ही कळले, त्याने परमत्म्याला जाणून घेतले असे समजा. 

परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची ही दोन द्वारे आहेत. परमात्मा जीवनात आहे तसा मृत्यूमध्येही आहे. जीवन म्हणजे परमात्म्याचा दिवस तर मृत्यू म्हणजे त्याची रात्र. ज्याने केवळ दिवसच जाणला पण रात्रीबद्दल काहीच जाणू शकला नाही, त्याचे ज्ञान अपूर्णच म्हणायला हवे. रात्रीची आपली अशी वेगळीच मजा आहे. विश्रांतपणा आहे. रात्रीची आपली अशी एक शालीनता आहे. गूढ गहिरेपण आहे. रात्रीचा अंधार जी शांती प्रदान करतो तो शांती सूर्यप्रकाश देऊ शकत नाही. सूर्यप्रकाशात सगळं आरपार दिसते. त्याच गोष्टी रात्रीच्या अंधारात गहन होतात, सखोल भासतात.

दिवसभराच्या कामाने थकलेल्या भागलेल्या माणसाला रात्रीची झोप हवी असते. म्हणजे परत सकाळी ताजेतवाने होऊन उठता येते. सूर्याचे स्वागत करता येते. आपल्या कामाला लागता येते. असच जीवनभराच्या कष्टाने थकला भागलेला माणूस मृत्यूच्या शांत विश्रब्ध झोपेची इच्छा धरतो. जो नीटपणे जगला, तोच नीटपणे मृत्यूचा स्वीकार करू शकतो. सम्यक जीवनातून सम्यक मृत्यूची प्राप्ती होते. अजिबात भय बाळगू नका. घाबराल तर जीवन हातून निसटून जाईल आणि मृत्यूही निसटेल. त्या अवस्थेत तुमचे जगणे न जगण्यासारखे असेल आणि मरणही तसेच असेल. सगळीकडून रिकामेच राहाल.

दु:खही सहन होत नाही आणि सुखही सहन होत नाही अशी तुमची अवस्था असेल तर तुमच्या डोळ्यावरची झापडं दूर होऊन तुम्हाला तुमच्या अंतरंगात दिसायला लागेल. या अवस्थेचा उपयोग करा. प्रेम आणि पीडा दोन्हीपासून मुक्त होणे आवश्यक आहे. 

जीवन जसे समोर येईल तसे जगा. जे उपलब्छ होईल ते समरसून परिपूर्णपणे जगा. तुमच्या वाट्याला वेदना आल्या तर वेदना, प्रेम आले तर प्रेम, जे मिळेल ते मनापासून स्वीकारा आणि पूर्णपणे जगा. अर्धवटपणे, द्विधा मन:स्थितीत, रडत झगडत, ओढत खेचत, कण्हत जगू नका. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण आपली मनोधारणा अशी असते की सुख आपण समरसून स्वीकारतो. पण दु:खं पूर्णपणे स्वीकारत नाही. ते ज्या दिवशी खुल्या दिलाने स्वीकाराल त्या दिवसापासून जन्म मृत्यू या दोन्ही घटनांकडे समान नजरेने बघायला शिकाल आणि आपसुख आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करत परमात्म्याशी जोडले जाल.