शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

सावधान! घराघरात कली प्रवेश करतोय; त्याला रोखण्याचे आहेत 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 09:00 IST

ज्या घरात शांत वातावरण नाही, तेथे कलीचा प्रवेश झाला असे समजावे.

एकूण चार युगे आहेत. त्यापैकी सत्य, त्रेता व द्वापार युगे होऊन गेलेली आहेत व शेवटचे कलियुग सुरू आहे. कली रंगाने काळा आहे. तो लिंग व जिव्हा यावर ताबा घेतो व स्वैर वागायला लावतो. कलीचे मुख्य गुण म्हणजे सर्व ठिकाणी गोंधळ माजवणे, जे व्यवस्थित चालले असेल त्याचा नाश करणे, कोणालाही सुखाने जगू न देणे, सर्व ठिकाणी भांडण-तंटे लावणे व अस्थिरता निर्माण करणे.

ज्या घरात शांत वातावरण नाही, तेथे कलीचा प्रवेश झाला असे समजावे. कलियुगात लोकांच्या मनोवृत्तीत फरक पडत आहे म्हणून त्यांच्या वागण्यातही फरक पडत आहे. भ्रष्टाचाराने पैसे खाणारे लखपती झाले आहेत. अशांच्या घरी गुंतागुंत वाढते. घरात नितिमत्तेमध्ये फरक पडला आहे त्यामुळे समाधान राहत नाही. अस्वस्थपणा, आजार वाढतो. 

कलियुगाचा प्रभाव ओळखणे सोपे आहे. भावाभावात प्रेम राहत नाही. वाद कायम राहतो. एक भाऊ श्रद्धावान तर दुसरा नास्तिक असतो. आई मुलाचे पटत नाही. सासू सुनेचे पटत नाही. वडील मुलाचे पटत नाही. एवढेच काय तर नवरा बायकोचे पटत नाही. म्हणून विभक्त होतात. घरात इस्टेटीवरून वाद होऊन नातेसंबंध विकोपाला जातात.

पूर्वी घरामध्य धार्मिक वातावरण होते. लोक पूजाअर्चा, ध्यानधारणा करत असत. आजकाल सुशिक्षितपणाच्या नावावर धर्माला, शास्त्राला तिलांजली दिली जाते. विज्ञाननिष्ठ म्हणत जुन्या बाबींना अनावश्यक ठरवले जाते. काहींना पैशांचा अभिमान वाटतो, काहींना शिक्षणाचा, काहींना पद-प्रतिष्ठेचा. जो तो आपापल्या अहंकारात जगतो. याचे कारण मनुष्याला धार्मिक बैठक उरलेली नाही. बाहेरचा आहार तामसी गुणांना उत्तेजित करतो. घरचा सात्त्विक आहार बेचव वाटू लागतो. हा कलीचा महिमा आहे. 

इतके दिवस कली बाहेरून प्रभाव पाडत होता. तो मनुष्यापोटी जन्माला येत आहे. तसे होऊ नये म्हणून पूर्वी गर्भवती स्त्रियांना जपले जात. गर्भसंस्कार घातले जात. आता कोणाला काहीच बंधन नको असते त्यामुळे कलीचा शिरकाव सहज शक्य झाला आहे. व्यभिचार करताना मनुष्य धजत नाही. त्याला पाप-पुण्याची नोंद ठेवावी वाटत नाही. अशाने मनुष्य केवळ स्वत:ची अधोगती ओढावून घेत आहे. 

हे वास्तव आहे आणि ते आपण अनुभवत आहोत. दिवसेंदिवस होणारा संस्कृतीचा ऱ्हास , धर्माची विटंबना, थोरा मोठ्यांचा अनादर, व्यक्तिस्वातंत्र्यांच्या नावावर चाललेला नंगानाच ही कलीची रूपे आहेत. ती आपल्या उंबरठ्यापर्यंत, नव्हे घरातच आली आहेत. 

त्यावर उपाय आहे तो केवळ सन्मार्गाचा, भक्तीमार्गाचा, अध्यात्माचा. संतांचे ग्रंथ, भगवंताचे नाव, सदाचरण, सद्भक्ती, ईश्वर कार्य, समाजसेवा या गोष्टीच कलियुगातून आपल्याला तारून नेणार आहेत. अन्यथा कली कलह वाढवत नेईल आणि आपला सर्वनाश करेल!