शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बाकी देवांच्या तुलनेत एकट्या बाप्पाचे पोट मोठ्ठे का? जाणून घ्या त्यामागचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:56 IST

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत.

९ ऑक्टॉबर, आश्विन मासातील विनायकी चतुर्थी. देवी शारदेची उपासना सुरू असतानातिच्या सुपुत्राची अर्थात गणपती बाप्पाची सेवा करण्याची ही नामी संधी आहे. त्यानिमित्ताने आपण बाप्पाची पूजा करूच. पण ही पूजा करताना तुमच्या मनात कधी एक प्रश्न आलाय का? की हिंदू धर्मातील सगळे देव तंदुरुस्त असताना, एकटा गणपती बाप्पा तुंदिल तनू का? त्यामागचे कारण म्हणजे, आपण सगळे रोज त्याच्याकडे करत असलेली प्रार्थना...!

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे,अन्याय माझे कोट्यानु कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

आपल्याला एखादे काम करून घ्यायचे असेल, तर आपण आपल्या लाडक्या व्यक्तीला गळ घालतो. गणपती बाप्पा हे तर सर्वांचेच लाडके दैवत! मग सुख असो, दु:ख असो, तक्रार असो नाहीतर अपराध असो, आपण आपले गाऱ्हाणे त्यालाच जाऊन सांगतो. तोही बिचारा सुपाएवढे कान पसरून भक्तांचे सगळे बोलणे निमुटपणे ऐकून घेतो. एवढा ताण सहन करूनही त्याचा चेहरा कधीच तणावग्रस्त दिसत नाही. याचे कारण, सूप ज्याप्रमाणे धान्य पाखडताना फोलकटे फेकून देते आणि चांगले धान्य जवळ ठेवते, तसेच बाप्पासुद्धा बरे-वाईट सगळे ऐकून घेतो आणि चांगल्या गोष्टी जवळ ठेवून वाईट गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. पण तो एक `गुड लिसनर' अर्थात `उत्तम श्रोता' असल्यामुळे आपण सगळे काही त्यालाच जाऊन सांगतो. इथवर ठीक आहे. 

परंतु, आपली चूक कबुल करताना आपण त्याला घातलेली अट महाभयंकर आहे, `देवा, तू आमचा पालक आहेस. आम्ही तुझे बालक आहोत. आई जशी आपल्या मुलांच्या चुका पदरात घेते, तसे तू देखील आमचे कोट्यानु कोटी अन्याय पोटात घे.' बाप्पा तथास्तु म्हणतो आणि सगळ्या गोष्टी पोटात दडवून ठेवतो. 

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत. समर्थ रामदास स्वामी सांगतात, `राम म्हणता राम होईजे...' आपण ज्या दैवताची उपासना करतो, त्याचे गुण आपण आपल्या अंगी बाणले पाहिजेत. केवळ बाप्पाला मोदक आवडतात, म्हणून आपणही चवीने मोदक खायचे, हा एकमेव गुण घ्यायचा नाही. तर, बाप्पासारखे आपल्यालाही उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, उत्तम लढवय्या आणि जिज्ञासू विद्यार्थी होता आले पाहिजे. 

आपल्याला कोणी काही सांगत असेल, तर ते शांतपणे ऐकून घेता आले पाहिजे. ऐकलेल्या गोष्टी डोक्यात न साठवता, पोटात साठवल्या पाहिजेत. अर्थात त्या गुपित ठेवता आल्या पाहिजेत. देवाचे सूपासारखे कान त्याचे डोक शांत ठेवतात, तसे आपणही आपल्या कानांनी ऐकलेल्या गोष्टींवर फार विचार करत न बसता, अनावश्यक गोष्टी डोक्यातून डिलीट करून चित्त स्थिर ठेवले पाहिजे. बाप्पाचे बारीक डोळे, दूरदृष्टीचे सूचक आहेत. आपल्यालाही दैनंदिन जीवनात आगामी संधी, संकटे यांचा अंदाज घेता आला पाहिजे. बाप्पाला आपल्या सोंडेने चांगल्या-वाईट गोष्टी हुंगूनही ओळखता येतात. त्याप्रमाणे आपल्यालाही परिस्थितीचा ओळखता आली पाहिजे. तो मंगलमूर्ती आहे. त्याला पाहून इतरांना जसा आनंद होतो, तसा आपल्याला पाहून लोकांना आनंद वाटला पाहिजे. आपले अनंत अपराध पोटात घेऊन बाप्पा तुंदिलतनू झाला, तरी युद्धात त्याला कोणीही हरवू शकले नाही. कारण, त्याने कधी युक्तीने तर कधी शक्तीने शत्रूचा पराभव केला. त्याच्याप्रमाणे आपणही शत्रूसमोर केवळ शक्तीप्रदर्शन न करता, स्थलकालानुरूप लढाई जिंकली पाहिजे. त्यासाठी बाप्पा जसा पाशांकुशधारी आहे, तसा आपल्यालाही हाताशी मिळेल त्या साधनाचा प्रसंगी शस्त्राप्रमाणे वापर करून आपला आणि इतरांचा बचाव करता आला पाहिजे. उंदरासारख्या कुरतडणाऱ्या काळ्या कभिन्न वृत्तीवर स्वार होता आले पाहिजे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन नेतृत्त्व निभावता आले पाहिजे. 

या सगळ्या गोष्टी आत्मसात करता आल्या, तरच आपण बाप्पाचे भक्त म्हणवून घेऊ शकू . मग बाप्पाही न सांगता आपले अनंत अपराध पोटात घेईल आणि मोबदल्यात मोदकाचा गोड गोड प्रसाद देईल. 

गणपती बाप्पा मोऽऽऽरया!

टॅग्स :ganpatiगणपती