शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

'बजरंगबली' हे मारुती रायाचे नाव नाहीच मुळी; जाणून घ्या त्याचे मूळ नाव आणि त्याचा अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:24 IST

काही गोष्टी कानगोष्टीसारख्या पसरतात आणि त्याच रूढ होतात, मात्र थोडे कुतूहल जागृत केले तर विषयाच्या मुळाशी पोहोचता येते.

अनेकदा बोलीभाषेत दोष निर्माण होऊन कानगोष्टीनुसार गोष्टी पुढे पुढे सांगितल्या जातात आणि कालांतराने त्याच रूढ होत जातात. अशा वेळी पौराणिक संदर्भ पाहणे हिताचे ठरते. आपल्या लाडक्या मारुती रायाला आपण अनेक नावांनी हाक मारतो, जयजयकार करतो, त्यापैकी प्रचलित असलेले एक नाव आहे बजरंगबली. वास्तविक पाहता ते नाव बजरंगबली नसून वज्रान्गबाली असे आहे. 

काय आहे त्याचा अर्थ? तर - वज्र - हिरा, अंग- शरीर, बाली- प्रबळ!

हनुमान चालीसामध्ये सुद्धा वर्णन आले आहे, 

हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मुंज जनेऊ साजे!

याचा अर्थ ज्याच्या हातात वज्र नावाचे शस्त्र आहे आणि धर्माचा ध्वज आहे! धर्माचा ध्वज कोणीही घेऊन चालत नाही, ते खांदे सक्षम असावे लागतात. त्यासाठी मारुती रायाने व्यायाम करून एवढी सुदृढ शरीरयष्टी कमावली आहे की त्याचे शरीर वज्रासारखे टणक झाले आहे. म्हणून वज्रासारखा कठोर किंवा वज्रासारखे बळ असलेला असे त्याचे वर्णन करता येईल. 

हिऱ्याचे तेज लपता लपत नाही, तसे मारुतीरायांच्या भक्तीचे तेज हिऱ्यासारखे झळाळत असते. त्या अर्थानेही ते वज्रान्ग आहेत. मूळ अर्थ हा असला, तरी त्याचा उच्चार बदलत बदलत बजरंगबली हे नाव रूढ झाले आहे. तेच नाव आता आपल्याही ओठी, मनी रुळले आहे. म्हणून उच्चार जरी आपण बजरंगबली असा करत असलो तरी मनात मूळ अर्थ लक्षात ठेवावा म्हणून हा लेखन प्रपंच!