शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

ज्योतिषशास्त्र सांगते 'चौथ्या' प्रहरात पाहिलेली स्वप्नं खरी होतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 16:11 IST

स्वप्नांमध्ये पाहिलेल्या व्यक्ती, वस्तु, प्रसंग यामुळे मन कधी सुखावते, तर कधी धास्तावते.

स्वप्नं कोणत्या प्रहरात पडतात, त्यावर त्यांची सत्य-असत्यता अवलंबून असते. सगळीच स्वप्ने खरी होतात असे नाही. कित्येक स्वप्नं झोपून उठल्यावर आठवतही नाहीत. तर कित्येक स्वप्न चित्रपटासारखी लख्ख आठवतात. अनेक दिवस स्मरणात राहतात.स्वप्नांमध्ये पाहिलेल्या व्यक्ती, वस्तु, प्रसंग यामुळे मन कधी सुखावते, तर कधी धास्तावते. आजवर आपण ऐकत आलो आहोत, की पहाटेची स्वप्ने खरी ठरतात. यावर स्वप्नांचा आणि प्रहराचा ज्योतिषशास्त्राने सविस्तर खुलासा केला आहे. 

प्रथम प्रहर : जी स्वप्ने रात्री झेपल्यावर रात्री १० वाजल्यापासून १२ वाजेपर्यंतच्या वेळेत पडतात, ती शरीरप्रकृतीची द्योतक असतात, प्रीतीची द्योतक असतात, सट्टा किंवा लॉटरी अशा अनपेक्षित लाभाची द्योतक असतात विंâवा घरच्या प्रापंचिक संबंधाची, काही विशिष्ट घडामोडींची द्योतक समजली जातात.

द्वितीय प्रहर : जी स्वप्ने द्वितीय प्रहरात पडतात, म्हणजे १२ वाज्यापासून २ वाजेपर्यंतच्या काळात पडतात, ती स्वप्ने प्रवासाची, व्यापार, पत्रे, नवीन गोष्ट, कर्ज, खर्च, इ. संबंधी असतात आणि स्वत:पुरत्याच घरातल्या अडचणींची व मित्रासंबंधीची द्योतक समजली जातात.

तृतीय प्रहर : जी स्वप्ने तृतीय प्रहरात म्हणजे रात्री २ पासून पहाटे ४ च्या आधीच्या काळात पडतात, ती नातेवाईकांशी संबंध, प्रवास, कार्य यांची द्योतक असतात.

चतुर्थ प्रहर : अर्थात पहाटेची स्वप्ने! ही स्वप्ने पहाटे ४ ते ६ दरम्यान पडतात ती जास्त सत्य समजली जातात. कारण त्यांच्या अगोदर कित्येक घडामोडी विचार शक्तीने मेंदूत होऊन तो स्वस्थ असतो व अशा वेळेस सर्वशक्तिमान आत्माच आपले भविष्यकालीन दृष्य आठवत असतो आणि आपल्या सुख दु:खाचे, भावी कल्पनांचे चित्र डोळ्यासमोर रेखाटत असतो. ही पहाटेची स्वप्ने उत्तम प्रवासाची द्योतक असतात. इच्छाशक्तीची वाट दर्शवणारी व ती इच्छाशक्ती पूर्णतेस जाणार याची द्योतक असतात. स्त्रीलाभ, धन, वाहन, स्वत:च्या उपयोगी पडणारा पैसा व हाती घेतलेले कार्य तडीस जातील अशा प्रकारची सूचक असतात, असे म्हटले जाते.