शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

घरातील लक्ष्मी कोणत्या गोष्टींमुळे होते नाराज?, चुकूनही करू नका 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 19:59 IST

धनाची देवी लक्ष्मीची कृपा राहिली तर जीवनाशी संबंधित सर्व सुख सहज मिळू शकतं. कष्टाचं फळ आणि धनलाभ मिळावा म्हणून बहुतेक लोक लक्ष्मीची पूजा-अर्चा करतात.

धनाची देवी लक्ष्मीची कृपा राहिली तर जीवनाशी संबंधित सर्व सुख सहज मिळू शकतं. कष्टाचं फळ आणि धनलाभ मिळावा म्हणून बहुतेक लोक लक्ष्मीची पूजा-अर्चा करतात. असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीची कृपा जर एखाद्यावर राहिली तर अडचणी आणि दुःखं संबंधित व्यक्तीला त्रास देत नाहीत. असंही म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा असेल तर त्याच्या जीवनात धन, समृद्धी, मान-सन्मान, कीर्ती इत्यादीची कमतरता कधीच भासत नाही. मात्र, आपल्या चुकांमुळे किंवा इतर कारणांमुळे माता लक्ष्मी जर कोणावर रागावली तर राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. अनेकदा लोक अशा काही चुका करतात की ज्या माता लक्ष्मीच्या नाराजीचं कारण बनतात.

एखाद्या गोष्टीमधून आपण माता लक्ष्मीला दुखावतोय हे लोकांना कळतही नाही. कोणत्याही घरातून धनदेवतेचे प्रस्थान होण्याचे केवळ घराशी संबंधित वास्तू दोषच मोठे कारण बनत नाहीत तर दैनंदिन जीवनाशी संबंधित आपल्या काही सवयी देखील यासाठी कारणीभूत असतात. 

झाडूचा अपमानघरात वापरण्यात येणारा झाडू धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. अनेकदा लोक झाडू घरात वापरल्यानंतर अशा ठिकाणी ठेवतात, जिथे पाय लागण्याची शक्यता असते. असं मानलं जातं की जर एखाद्यानं झाडूला पाय लावला तर त्याचा अपमान होतो आणि तो देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं आहे. एवढंच नाही तर ज्योतिष शास्त्रात असं सांगितलेलं आहे की, झाडू अशा ठिकाणी ठेवू नये, जिथं तो लोकांच्या डोळ्यांना दिसेल. कारण सहज दिसेल अशा ठिकाणी झाडू घरात असेल तर घरात पैशाची कमतरता भासण्याचं ते कारण ठरू शकतं. झाडू लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.

अन्नाची नासाडीज्या लोकांना अनेकदा अन्न वाया घालवण्याची सवय असते, त्यांना लक्ष्मीच्या कोपाचा सामना करावा लागू शकतो. अन्न वाया गेल्यानं देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि अशा लोकांच्या जीवनात आर्थिक समस्या वारंवार येतात. एवढंच नाही तर पाण्याचा अपव्यय हे लक्ष्मीच्या नाराजीचं कारण बनू शकतं. असं झाल्यावर माता लक्ष्मी रागावते आणि घरातून निघून जाते, असं मानलं जातं. 

पांढर्‍या रंगाची फुलं अर्पण करणं चुकीचंअनेकदा लोक नकळत देवी लक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करण्याची चूक करतात. लक्ष्मी देवीला पांढरे फूल अर्पण करण्यास शास्त्रात निषिद्ध आहे. पांढरे फूल अर्पण केल्याने माता लक्ष्मी नाराज होतात. लक्ष्मीची पूजा करताना फुलं अर्पण करायची असतील तर जास्वंद, गुलाब किंवा झेंडूची फुलं अर्पण करावीत.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक