शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

Ashadhi Ekadashi 2022: वारीला जाता आले नाही? तर घरबसल्या पं. भीमसेन जोशींचा दैवी सूर वारीची देईल अनुभूती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:12 IST

Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीची वारी, पांडुरंगाचा गजर आणि पं. भीमसेन जोशींची अभंगवाणी हे वर्षानुवर्षे जुळून आलेले समीकरण आहे. त्याबद्दल थोडेसे... 

माझे माहेर पंढरी, अणुरेणिया थोकडा, इंद्रायणी काठी, टाळ बोले चिपळीला अशी शेकडो गाणी ज्या दैवी स्वराने अजरामर केली, तो सूर आहे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा. त्यांच्या सुरावटीत चिंम्ब भिजून भक्तिमय वातावरणात वारीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांची अभंगवाणी लावा आणि घरबसल्या वारीचे सौख्य मिळवा. 

पं. भीमसेन जोशी हे शास्त्रीय गायक म्हणून, ते जगाला परिचित आहेतच, परंतु सर्वसामान्य जनाला ते परिचित आहेत, ते त्यांनी अजरामर केलेल्या अभंगवाणीमुळे! संतांच्या पश्चात सामान्यजनाला भक्तीमार्गाला लावण्यात त्यांच्या प्रासादिक सूराचे मोठे योगदान आहे. एवढेच काय, तर सकल संतांनाही आपल्या अभंगरचनांना भीमसेनीस्पर्श झाला, याचा निश्चितच आनंद असेल. 

सकल संतांनी समाज प्रबोधनार्थ, समाज हितार्थ अभंगरचना केल्या. त्यांनी त्यांच्या परीने लोकांपर्यंत पोहोचवल्या. परंतु कलियुगात परिस्थती अशी आहे, की लोकांकडे ग्रंथ उघडून वाचण्याइतकीही फुरसत नाही. त्यामुळे संत गाथा मूक झाली होती. मात्र, तिला वाचा फोडली, ती याच भीमसेनी स्वराने! अन्य गायकांनीही अभंगवाणी गायली, परंतु भीमसेनजींच्या सूरात नामा म्हणे, तुका म्हणे, चोखा म्हणे, गात असताना जी अधिकारवाणी होती, ती क्वचितच अन्य गायकांच्या ठिकाणी ऐकू येईल. 

भीमसेनजी गातात, ती प्रत्येक रचना आपली समजून गातात.  एवढी आत्मियता, लगाव, समरसता त्यांच्या सूरातून स्पष्ट दिसून येते. माझे माहेर पंढरी म्हणताना, ही भावना संत एकनाथांची नसून भीमसेन जोशींचीच आहे की काय, असा विचार मनात डोकावतो. प्रत्येक सासुरवाशीण आपल्या माहेराबद्दल जेवढ्या आपुलकीने, अदबीने, व्याकुळतेने बोलते, कौतुक करते, तेच भाव माझी बहिण चंद्रभागा, पुंडलिक आहे बंधू, बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई, ही ओळख पटवून देताना भीमसेनजींच्या सूरातून जाणवतात. 

कधीही, कुठलाही अभंग ऐका, मन प्रसन्न होणार याची शंभर टक्के हमी! त्याचे कारण म्हणजे, सतरा ते अठरा तास घोकून केलेला रियाज. मी आणि माझा तानपुरा, एवढेच त्यांचे विश्व. डोक्यात चोवीस तास संगीत आणि केवळ संगीतच. याचा अर्थ त्यांना बाकी गोष्टीत रस नव्हता असे नाही. परंतु, गायनसेवा हे ईश्वरी काम त्यांनी निष्ठेने केले. शिष्यांची फौज निर्माण न करता, ज्यांना गाण्याप्रती खरोखर आस्था आहे, असे मोजकेच शिष्य घडवले. हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीतावर अपार प्रेम केले. म्हणूनच 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' ही संत नामदेवांची अभंगरचना असो, नाहीतर 'सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा' ही पुरंदरदासांची कन्नड रचना असो, ऐकताना भाषेचा अडसर श्रोत्यांना जाणवत नाही. त्यातील भक्तीमय सूर मनाचा गाभारा व्यापून टाकतो. 

शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसणारा एखादा कानसेनदेखील, भीमसेनजींच्या गाण्यांवरून शास्त्रीय संगीताकडे आकर्षित होतो. हे सामर्थ्य त्यांच्या सुरावटीत होते, आहे आणि पुढेही राहील. तोच दैवी अनुभव वारीच्या निमित्ताने तुम्हीसुद्धा अवश्य घ्या, जेणेकरून तुम्हालाही प्रचिती येईल.... 

आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया... 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीBhimsen Joshiभीमसेन जोशी