शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Ashadhi Ekadashi 2022: वारीला जाता आले नाही? तर घरबसल्या पं. भीमसेन जोशींचा दैवी सूर वारीची देईल अनुभूती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:12 IST

Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीची वारी, पांडुरंगाचा गजर आणि पं. भीमसेन जोशींची अभंगवाणी हे वर्षानुवर्षे जुळून आलेले समीकरण आहे. त्याबद्दल थोडेसे... 

माझे माहेर पंढरी, अणुरेणिया थोकडा, इंद्रायणी काठी, टाळ बोले चिपळीला अशी शेकडो गाणी ज्या दैवी स्वराने अजरामर केली, तो सूर आहे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा. त्यांच्या सुरावटीत चिंम्ब भिजून भक्तिमय वातावरणात वारीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांची अभंगवाणी लावा आणि घरबसल्या वारीचे सौख्य मिळवा. 

पं. भीमसेन जोशी हे शास्त्रीय गायक म्हणून, ते जगाला परिचित आहेतच, परंतु सर्वसामान्य जनाला ते परिचित आहेत, ते त्यांनी अजरामर केलेल्या अभंगवाणीमुळे! संतांच्या पश्चात सामान्यजनाला भक्तीमार्गाला लावण्यात त्यांच्या प्रासादिक सूराचे मोठे योगदान आहे. एवढेच काय, तर सकल संतांनाही आपल्या अभंगरचनांना भीमसेनीस्पर्श झाला, याचा निश्चितच आनंद असेल. 

सकल संतांनी समाज प्रबोधनार्थ, समाज हितार्थ अभंगरचना केल्या. त्यांनी त्यांच्या परीने लोकांपर्यंत पोहोचवल्या. परंतु कलियुगात परिस्थती अशी आहे, की लोकांकडे ग्रंथ उघडून वाचण्याइतकीही फुरसत नाही. त्यामुळे संत गाथा मूक झाली होती. मात्र, तिला वाचा फोडली, ती याच भीमसेनी स्वराने! अन्य गायकांनीही अभंगवाणी गायली, परंतु भीमसेनजींच्या सूरात नामा म्हणे, तुका म्हणे, चोखा म्हणे, गात असताना जी अधिकारवाणी होती, ती क्वचितच अन्य गायकांच्या ठिकाणी ऐकू येईल. 

भीमसेनजी गातात, ती प्रत्येक रचना आपली समजून गातात.  एवढी आत्मियता, लगाव, समरसता त्यांच्या सूरातून स्पष्ट दिसून येते. माझे माहेर पंढरी म्हणताना, ही भावना संत एकनाथांची नसून भीमसेन जोशींचीच आहे की काय, असा विचार मनात डोकावतो. प्रत्येक सासुरवाशीण आपल्या माहेराबद्दल जेवढ्या आपुलकीने, अदबीने, व्याकुळतेने बोलते, कौतुक करते, तेच भाव माझी बहिण चंद्रभागा, पुंडलिक आहे बंधू, बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई, ही ओळख पटवून देताना भीमसेनजींच्या सूरातून जाणवतात. 

कधीही, कुठलाही अभंग ऐका, मन प्रसन्न होणार याची शंभर टक्के हमी! त्याचे कारण म्हणजे, सतरा ते अठरा तास घोकून केलेला रियाज. मी आणि माझा तानपुरा, एवढेच त्यांचे विश्व. डोक्यात चोवीस तास संगीत आणि केवळ संगीतच. याचा अर्थ त्यांना बाकी गोष्टीत रस नव्हता असे नाही. परंतु, गायनसेवा हे ईश्वरी काम त्यांनी निष्ठेने केले. शिष्यांची फौज निर्माण न करता, ज्यांना गाण्याप्रती खरोखर आस्था आहे, असे मोजकेच शिष्य घडवले. हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीतावर अपार प्रेम केले. म्हणूनच 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' ही संत नामदेवांची अभंगरचना असो, नाहीतर 'सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा' ही पुरंदरदासांची कन्नड रचना असो, ऐकताना भाषेचा अडसर श्रोत्यांना जाणवत नाही. त्यातील भक्तीमय सूर मनाचा गाभारा व्यापून टाकतो. 

शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसणारा एखादा कानसेनदेखील, भीमसेनजींच्या गाण्यांवरून शास्त्रीय संगीताकडे आकर्षित होतो. हे सामर्थ्य त्यांच्या सुरावटीत होते, आहे आणि पुढेही राहील. तोच दैवी अनुभव वारीच्या निमित्ताने तुम्हीसुद्धा अवश्य घ्या, जेणेकरून तुम्हालाही प्रचिती येईल.... 

आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया... 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीBhimsen Joshiभीमसेन जोशी