शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Ashadhi Ekadashi 2021 : तुकाराम महाराजांची 'ही' विरहिणी, जणू वारकऱ्यांचे शब्दबद्ध झालेले दु:खंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 17:05 IST

Ashadhi Ekadashi 2021: या अभंगाची आर्तता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुस्वरात आणखीनच अधोरेखित होते.

आज वारीला जाऊ न शकलेल्या प्रत्येक वारकऱ्याची तळमळ या अभंगात एकवटली आहे. या अभंगाला तुकाराम महाराजांनी लिहिलेली विरहिणी असे म्हटले तरी चालेल. विरहिणी अर्थात ओढ लावणारे, दर्शवणारे काव्य. सदर अभंगात तुकाराम महाराजांना पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली आहे, ते लिहितात -

भेटीलागी जीवा, लागलीसे आस।पाहे रात्रंदिवस, वाट तूझी।पूर्णिमेचा चंद्र, चकोरा जीवन।तैसे माझे मन वाट पाहे।दिवाळीच्या मूळा, लेकी आसावली।पहातसे वाटुली, पंढरीची।भुकेलिया बाळ, अति शोक करी।वाट पाहे परी, माउलीची।तुका  म्हणे मज, लागलीसे भूक।धावूनि श्रीमुख दावी देवा।

देवा तुझ्या भेटीच्या आशेने मी रात्रंदिवस तळळतआहे. माझ्या जीवाला जराही स्वस्थता नाही. ज्याप्रमाणे चकोरासाठी पौर्णिमेचा चंद्र हा सारसर्वस्व असतो, तोच त्याच्या जगण्याचा आधार असतो. त्यामुळे चकोर नेहमी चंद्रोदयाची वाट बघत राहतो. देवा, माझे मनही तुझी अशीच वाट पाहत आहे. सासरी असलेली मुलगी दिवाळीला माहेरुन बोलावणे येईल म्हणून उत्सुकतेने सांगाव्याची, निरोपाची वाट बघत असते. तसाच मीदेखील विठुमाऊलीच्या दर्शनाची वाट बघत आहे. देवा, धावत येऊन मला तुझे श्रीमुख दाखव. असे तुकाराम महाराज या अभंगातून सांगत आहेत.

अशी आस निर्माण होते, तेव्हा भगवंत आपणहून भक्ताच्या भेटीला धावून येतो, अशी त्याची ख्याती आहे. आजही वारीचे स्वरूप नेहमीसारखे नसले, तरीदेखील भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, कारण तनाने ते वारीत सहभागी झाले नसले, तरी मनाने ते वारी करत पंढरपुरापर्यंत नक्कीच पोहोचले असतील आणि उद्या त्या परब्रह्माच्या दर्शनाचा, भेटीचा दिवस येऊन ठेपला आहे. त्याबाबत ज्ञानोबा माउली आनंद व्यक्त करताना लिहितात- 

रूप पाहता लोचनि, सुख झाले हो साजणी...

या अभंगाची गोडी उद्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चाखुया... तोवर जय हरी!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी