शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संन्यस्त साधू दिवसातून तीन वेळा स्नान करतात; पण का? त्यामुळे कोणते लाभ होतात? सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 07:00 IST

एकीकडे आपण दिवसातून एकदा अंघोळीचा कंटाळा करतो, तर दुसरीकडे साधू, पूर्वीचे ऋषी मुनी त्रिकाल स्नान संध्या करत असत; जाणून घ्या कारण... 

दिवसाची सुरुवात ही स्नानापासून होत असते. अंग स्वच्छ केल्याशिवाय काहीही कर्म करू नये. म्हणूनच आपल्याकडे स्नानाचे फार महत्त्व आहे. संन्यस्त, वैराग्य प्राप्त झालेल्या व्यक्तींनी `त्रिकाल' स्नान करण्याची पद्धत आहे. त्यातील पहिले सकाळचे स्नान सूर्योदयापूर्वी तर संध्याकाळचे स्नान सूर्यास्तानंतर करावे.

स्नानाचे वेळी दक्षिण दिशेला तोंड असू नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. सूर्योदयापूर्वी करण्यात येणाऱ्या स्नानाला प्रात:स्नान म्हणतात. त्यावेळी स्नान करणाऱ्याने पूर्वेला सूयाकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. तर संध्याकाळचे स्नानाचे वेली स्नान करणाऱ्याने पश्चिमेला किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. संध्याकाळच्या स्नानाला सायंस्नान म्हणतात. 

प्रात:स्नानानंतर सूर्याची किरणे अंगावर घेण्याची शास्त्रात पद्धत सांगितली आहे. तसे केल्याने मन उल्हसित होते व बुद्धी आपोआप प्रगल्भ होत जाते. याचाच अर्थ, स्नानामुळे प्रज्ञाजागृतीचा थोडासा आविष्कारच जणू होऊ लागतो. तसेच आत्मविश्वास वाढतो, निर्णयशक्ती येते, नीट बोलता येते. 

स्नानासाठी कधीही फार कढत किंवा फार थंड पाणी घेऊ नये. तर कोमट पाणी घ्यावे. गार पाण्यात गरम पाणी घालावे व ते कोमट करून झाल्यावर त्याने स्नान करावे. मुखाने पवित्र नद्यांचा नामोच्चार करावा. आपल्याकडे शास्त्रात `स्मरण' फार महत्त्वाचे सांगितले आहे. भगवंतसुद्धा स्मरण केल्यावर कृपा करीतच असतात. 

स्नानाचे वेळी भगवंताचे नामस्मरण तोंड बंद ठेवून मनातल्या मनात केले तरी चालते. माणसाने फक्त स्नान करतेवेळी स्वत:च्या डोक्यावर पाणी घेताना भगवंताच्या नावाचा तोंडाने उच्चार करू नये. तसे केले तर त्या भगवंताचे रूप स्नानकत्र्याला प्राप्त झाल्यासारखे होईल. ते कदापिही शक्य नाही. म्हणून अशा वेळी शास्त्रात फक्त पवित्र नद्यांची नावे घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उदा. गंगे, यमुने, गोदे, भागिरथी, कृष्णे, सरस्वती इ. सर्व भक्तांनी प्रात:स्नानाला जरूर महत्त्व द्यावे. जे लोक बोलताना अडखळतात, त्यांनी प्रात:स्नान जरूर करावे. 

प्रात:स्नान सूर्योदयापूर्वी करणे आवश्यक आहे. तरच प्रज्ञाजागृती होते. हे अनंत काळ करावे लागते. त्यात सातत्य हवे. मुळीच खंड नको. पूर्वीचे लोक नदीत उभे राहून अघ्र्य देत असता. पहाटेची वेळ ही ब्राह्म मुहूर्ताची वेळ असते व त्यामुळे ती महत्त्वाची मानलेली आहे. अखंड काळ असे केल्यानंतर प्रज्ञाजागृती होत असते, इतके प्रात:स्नानाला महत्त्व आहे.

स्नानामुळे बाह्य शरीर स्वच्छ होत असते. म्हणूनच अंगावरील मळ निघण्याइतपतच साबणाचा वापर करावा. स्नानाचे पाणी तापवताना त्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे पाण्याला शुद्धता येते. नदीवर स्नान करताना नदीला पाठ न दाखवता नदी ज्या दिशेने प्रवाही असेल त्या दिशेने तोंड करून स्नान करावे. स्नान करताना चुकूनही रामरक्षा, अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र ही स्तोत्र म्हणू नयेत. स्नान झाल्यावर म्हणावीत.

पूर्वीच्या काळी स्नानासाठी पाणी न मिळाल्यास सूर्यस्नान, भस्मस्नान, पवनस्नान इ. प्रकार चालत. आपल्याकडे स्नानानंतर देवपूजा किंवा इतर साधना करण्यापूर्वी अंगाला भस्म लावण्याची पद्धत आहे. अंगाला भस्म लावल्याने बाह्य अंगाची शुद्धी होते. 

स्नानाचे एवढे प्रकार आणि महत्त्व वाचल्यावर आपण दिवसातून तीनदा नाही तर निदान दोनदा किंवा एकदा तरी प्रात:स्नानाची सवय लावून घ्यायला हवी, नाही का?