शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मदतीची गरज कधीही कोणालाही भासू शकते, म्हणून मदत करा तरच मदत मिळेल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 09:30 IST

चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!

शाळा असो नाहीतर ऑफिस, वेळ झाली की आपली पावले अगतिकतेने घराकडे वळतात. कधी एकदा घर गाठतो, असे आपल्याला होऊन जाते. असेच एका श्रीमंत उद्योजकाच्या बाबतीत घडले. दिवसभराचे काम संपवून तो आपल्या आलिशान गाडीत बसून घराकडे जायला निघाला. 

रस्ता मोकळा होता. वातावरण छान होते. गाणी ऐकत घराच्या ओढीने गाडी भरधाव वेगाने जात होती. काही अंतरावर त्याला दुरून एक मुलगा हातात वीट घेऊन उभा असलेला दिसला. त्याने जोरजोरात हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले. परंतु तो जागेवरून हलत नव्हता. एवढेच नाही, तर त्याने हातातली वीट जोरात गाडीच्या दिशेने भिरकावली. उद्योजकाने जोरदार ब्रेक लावला आणि गाडी जवळपास मुलाच्या अंगावर येता येता थांबली. वीट फेकून मारल्याने महागड्या गाडीला चांगलाच पोचा पडला होता. 

उद्योजक रागारागाने गाडीतून उतरला, आणि त्या लहान मुलाच्या अंगावर धावून जाणार, तोच मुलाने मागच्या दिशेने बोट दाखवत म्हटले, `तुम्हाला माझा खूप राग आला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा नाईलाज झाला होता. तो बघा मागे, माझा मोठा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. आम्ही दोघे सायकलीवरून जात असताना एका ट्रकने धडक दिली आणि त्यात भावाला चांगलीच दुखापत झाली. ट्रक ड्रायव्हर मदत करायची सोडून पळून गेला. मी त्याला एकट्याला नेऊ शकत नाही. मगापासून सगळ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी हा पर्याय निवडला. तुमचे नुकसान झाले, परंतु कदाचित या कृतीने माझ्या भावाचा जीव वाचेल असे वाटले. कृपया मदत करा...'

उद्योजकाने क्षणाचाही विलंब न करता दोघांना गाडीत घेतले. त्याची महागडी गाडी रक्ताने बरबटली होती. घरी जाण्याची ओढ असूनही उद्योजकाने जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांच्या पालकांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी मुलगा सुखरूप असल्याचे सांगितल्यावर उद्योजक घरी जाण्यास निघाला.

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्याने आपल्या आलिशान गाडीकडे पाहिले आणि ठरवले, काहीही झाले, तरी मी गाडीची डागडुजी करणार नाही. ही आठवण अशीच ठेवीन. कारण, गाडीची ही अवस्था मला कायम या प्रसंगाची आठवण करून देईल. 

आपण सुखात आहोत, आनंदात आहोत, म्हणजे सगळे सुखी आहेत, असा अर्थ होत नाही. कोणाला मदतीची गरज असेल, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. उद्या आपल्यावर तशी वेळ आली आणि कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले तर चालेल का? नाही ना? म्हणून 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या पंक्तीप्रमाणे मदतीचा हात देत चला. चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!