शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मदतीची गरज कधीही कोणालाही भासू शकते, म्हणून मदत करा तरच मदत मिळेल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 09:30 IST

चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!

शाळा असो नाहीतर ऑफिस, वेळ झाली की आपली पावले अगतिकतेने घराकडे वळतात. कधी एकदा घर गाठतो, असे आपल्याला होऊन जाते. असेच एका श्रीमंत उद्योजकाच्या बाबतीत घडले. दिवसभराचे काम संपवून तो आपल्या आलिशान गाडीत बसून घराकडे जायला निघाला. 

रस्ता मोकळा होता. वातावरण छान होते. गाणी ऐकत घराच्या ओढीने गाडी भरधाव वेगाने जात होती. काही अंतरावर त्याला दुरून एक मुलगा हातात वीट घेऊन उभा असलेला दिसला. त्याने जोरजोरात हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले. परंतु तो जागेवरून हलत नव्हता. एवढेच नाही, तर त्याने हातातली वीट जोरात गाडीच्या दिशेने भिरकावली. उद्योजकाने जोरदार ब्रेक लावला आणि गाडी जवळपास मुलाच्या अंगावर येता येता थांबली. वीट फेकून मारल्याने महागड्या गाडीला चांगलाच पोचा पडला होता. 

उद्योजक रागारागाने गाडीतून उतरला, आणि त्या लहान मुलाच्या अंगावर धावून जाणार, तोच मुलाने मागच्या दिशेने बोट दाखवत म्हटले, `तुम्हाला माझा खूप राग आला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा नाईलाज झाला होता. तो बघा मागे, माझा मोठा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. आम्ही दोघे सायकलीवरून जात असताना एका ट्रकने धडक दिली आणि त्यात भावाला चांगलीच दुखापत झाली. ट्रक ड्रायव्हर मदत करायची सोडून पळून गेला. मी त्याला एकट्याला नेऊ शकत नाही. मगापासून सगळ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी हा पर्याय निवडला. तुमचे नुकसान झाले, परंतु कदाचित या कृतीने माझ्या भावाचा जीव वाचेल असे वाटले. कृपया मदत करा...'

उद्योजकाने क्षणाचाही विलंब न करता दोघांना गाडीत घेतले. त्याची महागडी गाडी रक्ताने बरबटली होती. घरी जाण्याची ओढ असूनही उद्योजकाने जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांच्या पालकांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी मुलगा सुखरूप असल्याचे सांगितल्यावर उद्योजक घरी जाण्यास निघाला.

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्याने आपल्या आलिशान गाडीकडे पाहिले आणि ठरवले, काहीही झाले, तरी मी गाडीची डागडुजी करणार नाही. ही आठवण अशीच ठेवीन. कारण, गाडीची ही अवस्था मला कायम या प्रसंगाची आठवण करून देईल. 

आपण सुखात आहोत, आनंदात आहोत, म्हणजे सगळे सुखी आहेत, असा अर्थ होत नाही. कोणाला मदतीची गरज असेल, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. उद्या आपल्यावर तशी वेळ आली आणि कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले तर चालेल का? नाही ना? म्हणून 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या पंक्तीप्रमाणे मदतीचा हात देत चला. चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!