शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
4
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
5
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
6
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
9
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
10
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
11
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
12
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
13
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
14
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
15
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
16
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
17
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
18
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
19
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
20
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  

मदतीची गरज कधीही कोणालाही भासू शकते, म्हणून मदत करा तरच मदत मिळेल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 09:30 IST

चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!

शाळा असो नाहीतर ऑफिस, वेळ झाली की आपली पावले अगतिकतेने घराकडे वळतात. कधी एकदा घर गाठतो, असे आपल्याला होऊन जाते. असेच एका श्रीमंत उद्योजकाच्या बाबतीत घडले. दिवसभराचे काम संपवून तो आपल्या आलिशान गाडीत बसून घराकडे जायला निघाला. 

रस्ता मोकळा होता. वातावरण छान होते. गाणी ऐकत घराच्या ओढीने गाडी भरधाव वेगाने जात होती. काही अंतरावर त्याला दुरून एक मुलगा हातात वीट घेऊन उभा असलेला दिसला. त्याने जोरजोरात हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले. परंतु तो जागेवरून हलत नव्हता. एवढेच नाही, तर त्याने हातातली वीट जोरात गाडीच्या दिशेने भिरकावली. उद्योजकाने जोरदार ब्रेक लावला आणि गाडी जवळपास मुलाच्या अंगावर येता येता थांबली. वीट फेकून मारल्याने महागड्या गाडीला चांगलाच पोचा पडला होता. 

उद्योजक रागारागाने गाडीतून उतरला, आणि त्या लहान मुलाच्या अंगावर धावून जाणार, तोच मुलाने मागच्या दिशेने बोट दाखवत म्हटले, `तुम्हाला माझा खूप राग आला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा नाईलाज झाला होता. तो बघा मागे, माझा मोठा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. आम्ही दोघे सायकलीवरून जात असताना एका ट्रकने धडक दिली आणि त्यात भावाला चांगलीच दुखापत झाली. ट्रक ड्रायव्हर मदत करायची सोडून पळून गेला. मी त्याला एकट्याला नेऊ शकत नाही. मगापासून सगळ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी हा पर्याय निवडला. तुमचे नुकसान झाले, परंतु कदाचित या कृतीने माझ्या भावाचा जीव वाचेल असे वाटले. कृपया मदत करा...'

उद्योजकाने क्षणाचाही विलंब न करता दोघांना गाडीत घेतले. त्याची महागडी गाडी रक्ताने बरबटली होती. घरी जाण्याची ओढ असूनही उद्योजकाने जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांच्या पालकांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी मुलगा सुखरूप असल्याचे सांगितल्यावर उद्योजक घरी जाण्यास निघाला.

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्याने आपल्या आलिशान गाडीकडे पाहिले आणि ठरवले, काहीही झाले, तरी मी गाडीची डागडुजी करणार नाही. ही आठवण अशीच ठेवीन. कारण, गाडीची ही अवस्था मला कायम या प्रसंगाची आठवण करून देईल. 

आपण सुखात आहोत, आनंदात आहोत, म्हणजे सगळे सुखी आहेत, असा अर्थ होत नाही. कोणाला मदतीची गरज असेल, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. उद्या आपल्यावर तशी वेळ आली आणि कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले तर चालेल का? नाही ना? म्हणून 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या पंक्तीप्रमाणे मदतीचा हात देत चला. चांगले काम करत राहा. मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही, तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात देईल!