शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आनंद तरंग: श्रीराम आम्हाला देतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 03:33 IST

शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात.

मोहनबुवा रामदासीआम्ही काय कुणाचे खातो। श्रीराम आम्हाला देतो।जो अन्न देतो उदरासी। शरीर विकावे लागे त्यासी।मां जेणे घातले जन्मासी। त्यासी कैसे विसरावे।।मातेच्या उदरातून हा जीव म्हणून जेव्हा बाहेर आला, त्या क्षणापासून ईश्वराने त्याच्या जीवनाची चिंता वाहिलेली असते. खरंतर जीव जन्माला घालण्यापूर्वी भगवंताने त्या जिवाच्या सर्व व्यवस्था व अवस्था निश्चित करून अधोरेखित केलेल्या असतात. या जीवसृष्टीवर भगवंताची एकमेव सत्ता आहे. त्या भगवंताच्या ऋणात राहणं हेच साधकाचं प्रथम कर्तव्य असतं. अन्नाचा कण ज्याने निर्माण केला, त्या ईश्वराने केवळ माणूसच नव्हे, तर सृष्टीतील सर्व जीव, जंतू, पशू, पक्षी आणि प्राण्यांच्याही उदरनिर्वाहाची काळजी घेतलेली असते. दुर्दैवाने या पशू, पक्षी, प्राण्यांना बुद्धी नाही असे म्हणतात; परंतु हेच पशुपक्षी बुद्धीचे वरदान माणसांपेक्षा कमी असूनही निसर्गाचे नियम पाळतात. मात्र, माणूस असूनही तो निसर्गाचे नियम नीट पाळत नाही. म्हणून तर निसर्गाचे संतुलन ढळलेले आपल्याला पाहायला मिळते. शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात. त्यामागे ईश्वर नावाची शक्ती मातेच्याच रूपात असते. तीच प्रत्येक जिवाला आई म्हणून घास भरवते. म्हणूनच ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो’ या विचारांचा प्रभाव मनावर असावा आणि आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या. गरजांचा डोंगर वाढला की, दु:ख पदरी पडत असतं. म्हणून प्रत्येक घास घेताना हा घास त्या रामाने माझ्यासाठी निर्माण केला आहे हा भाव असावा. त्यासाठी प्रयत्न, जिद्द ही हवीच! नाहीतर ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ या निष्क्रिय भावनेचा जाणीवपूर्वक त्याग करावा व हे सर्व रामाचे आहे, त्याने निर्माण केलेलं आहे, तो मला कधीच उपाशी ठेवणार नाही ही श्रद्धा व हा भाव असावा.