शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

आनंद तरंग: श्रीराम आम्हाला देतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 03:33 IST

शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात.

मोहनबुवा रामदासीआम्ही काय कुणाचे खातो। श्रीराम आम्हाला देतो।जो अन्न देतो उदरासी। शरीर विकावे लागे त्यासी।मां जेणे घातले जन्मासी। त्यासी कैसे विसरावे।।मातेच्या उदरातून हा जीव म्हणून जेव्हा बाहेर आला, त्या क्षणापासून ईश्वराने त्याच्या जीवनाची चिंता वाहिलेली असते. खरंतर जीव जन्माला घालण्यापूर्वी भगवंताने त्या जिवाच्या सर्व व्यवस्था व अवस्था निश्चित करून अधोरेखित केलेल्या असतात. या जीवसृष्टीवर भगवंताची एकमेव सत्ता आहे. त्या भगवंताच्या ऋणात राहणं हेच साधकाचं प्रथम कर्तव्य असतं. अन्नाचा कण ज्याने निर्माण केला, त्या ईश्वराने केवळ माणूसच नव्हे, तर सृष्टीतील सर्व जीव, जंतू, पशू, पक्षी आणि प्राण्यांच्याही उदरनिर्वाहाची काळजी घेतलेली असते. दुर्दैवाने या पशू, पक्षी, प्राण्यांना बुद्धी नाही असे म्हणतात; परंतु हेच पशुपक्षी बुद्धीचे वरदान माणसांपेक्षा कमी असूनही निसर्गाचे नियम पाळतात. मात्र, माणूस असूनही तो निसर्गाचे नियम नीट पाळत नाही. म्हणून तर निसर्गाचे संतुलन ढळलेले आपल्याला पाहायला मिळते. शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात. त्यामागे ईश्वर नावाची शक्ती मातेच्याच रूपात असते. तीच प्रत्येक जिवाला आई म्हणून घास भरवते. म्हणूनच ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो’ या विचारांचा प्रभाव मनावर असावा आणि आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या. गरजांचा डोंगर वाढला की, दु:ख पदरी पडत असतं. म्हणून प्रत्येक घास घेताना हा घास त्या रामाने माझ्यासाठी निर्माण केला आहे हा भाव असावा. त्यासाठी प्रयत्न, जिद्द ही हवीच! नाहीतर ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ या निष्क्रिय भावनेचा जाणीवपूर्वक त्याग करावा व हे सर्व रामाचे आहे, त्याने निर्माण केलेलं आहे, तो मला कधीच उपाशी ठेवणार नाही ही श्रद्धा व हा भाव असावा.