शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

आनंद तरंग : दिव्यत्वाची प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 03:01 IST

विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या सा-याला शून्य किंमत आहे. जिवाचे अस्तित्व आणि ऊर्जा या गोष्टींसाठी व्यर्थ घालवणे म्हणजे अनमोल आयुष्यातील उत्कट आनंदाचे क्षण वाया घालवणे, हे त्यालापटलेले असते.

- इंद्रजित देशमुखज्या व्यक्तीमध्ये निर्भयता आणि नम्रता ठायी ठायी अनुभवायला येते, त्याने पूर्णत्वाचा अधिकार प्राप्त केलेला असतो. निर्भयता यामुळे असते की, भयाची जी कारणे आहेत ती सर्व तकलादू आहेत. तत्कालीन आहेत. याला त्याने जाणलेले असते. अपयशाचे, अपमानाचेआणि मृत्यूचे भय याची मुळापासून जाणत्याला आलेली असते. विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या सा-याला शून्य किंमत आहे. जिवाचे अस्तित्व आणि ऊर्जा या गोष्टींसाठी व्यर्थ घालवणे म्हणजे अनमोल आयुष्यातील उत्कट आनंदाचे क्षण वाया घालवणे, हे त्यालापटलेले असते. म्हणून तो प्रत्येक क्षण क्षुद्रतेमध्ये व्यतीत न करता, व्यापकतेत, समग्रतेत आणि उमदेपणाने व्यतीत करतो. प्रतिक्षण जगणे आणि सोडून देणे, हे त्याला अवगत झालेले असते. हे मूलभूत ज्ञान झाल्यानंतर त्याला काय गवसते, याबद्दल माउली म्हणतात, ‘ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे।जिथे शांतीचा अंकुर फुटे।।’ तो प्रशांतहोतो. त्याला अखंड विश्वाच्या विराटतेचा अनुभव आल्यामुळे स्वत:च्या अस्तित्वाचे खुजेपण आणि क्षणभंगुरपण समजलेलेअसते. म्हणून तो खूप विनम्र असतो. त्याचा शब्द, त्याचे चालणे, बोलणे, बसणे, उठणे यांमध्ये प्रचंड मृदुता आलेली असते. त्याच्या जगण्यातल्या कोमलतेत एक संगीताची लय आलेली असते. तो ज्या दिशेला जातो, ती दिशा स्नेहाने आणि प्रेमाने भारावून टाकतो. त्याच्या जगण्याचे प्रबंध आता फक्त उपकारासाठीच शिल्लक असतात. तो ज्या दिशेला जातो,ती दिशा उजळून जाते. त्याची पाऊले ही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. त्याचा सहवासहा दिव्यत्वाने भारलेला असतो. व्यापकता, नम्रता, निरागसता, निरामयता यांची प्रत्यक्ष प्रचिती त्याच्या सहवासात येते आणि अशा दिव्यत्वाच्या ठायी आपले हात आपोआप जुळतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक