शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

आनंद तरंग : दिव्यत्वाची प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 03:01 IST

विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या सा-याला शून्य किंमत आहे. जिवाचे अस्तित्व आणि ऊर्जा या गोष्टींसाठी व्यर्थ घालवणे म्हणजे अनमोल आयुष्यातील उत्कट आनंदाचे क्षण वाया घालवणे, हे त्यालापटलेले असते.

- इंद्रजित देशमुखज्या व्यक्तीमध्ये निर्भयता आणि नम्रता ठायी ठायी अनुभवायला येते, त्याने पूर्णत्वाचा अधिकार प्राप्त केलेला असतो. निर्भयता यामुळे असते की, भयाची जी कारणे आहेत ती सर्व तकलादू आहेत. तत्कालीन आहेत. याला त्याने जाणलेले असते. अपयशाचे, अपमानाचेआणि मृत्यूचे भय याची मुळापासून जाणत्याला आलेली असते. विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या सा-याला शून्य किंमत आहे. जिवाचे अस्तित्व आणि ऊर्जा या गोष्टींसाठी व्यर्थ घालवणे म्हणजे अनमोल आयुष्यातील उत्कट आनंदाचे क्षण वाया घालवणे, हे त्यालापटलेले असते. म्हणून तो प्रत्येक क्षण क्षुद्रतेमध्ये व्यतीत न करता, व्यापकतेत, समग्रतेत आणि उमदेपणाने व्यतीत करतो. प्रतिक्षण जगणे आणि सोडून देणे, हे त्याला अवगत झालेले असते. हे मूलभूत ज्ञान झाल्यानंतर त्याला काय गवसते, याबद्दल माउली म्हणतात, ‘ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे।जिथे शांतीचा अंकुर फुटे।।’ तो प्रशांतहोतो. त्याला अखंड विश्वाच्या विराटतेचा अनुभव आल्यामुळे स्वत:च्या अस्तित्वाचे खुजेपण आणि क्षणभंगुरपण समजलेलेअसते. म्हणून तो खूप विनम्र असतो. त्याचा शब्द, त्याचे चालणे, बोलणे, बसणे, उठणे यांमध्ये प्रचंड मृदुता आलेली असते. त्याच्या जगण्यातल्या कोमलतेत एक संगीताची लय आलेली असते. तो ज्या दिशेला जातो, ती दिशा स्नेहाने आणि प्रेमाने भारावून टाकतो. त्याच्या जगण्याचे प्रबंध आता फक्त उपकारासाठीच शिल्लक असतात. तो ज्या दिशेला जातो,ती दिशा उजळून जाते. त्याची पाऊले ही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. त्याचा सहवासहा दिव्यत्वाने भारलेला असतो. व्यापकता, नम्रता, निरागसता, निरामयता यांची प्रत्यक्ष प्रचिती त्याच्या सहवासात येते आणि अशा दिव्यत्वाच्या ठायी आपले हात आपोआप जुळतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक