शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आनंद तरंग: वैश्विक अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 00:46 IST

व्यक्ती आणि तिचा भवताल यांच्या संयोगातून हे सर्व घडत असते. मग काही व्यक्ती शरीराच्या पातळीवर, काही लोक मनाच्या पातळीवर, तर काही लोक उन्मनी अवस्थेमध्ये राहतात.

इंद्रजित देशमुखजगणं म्हणजे दररोज शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या अनुभवाने समृद्ध होणे आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रियाची दररोजची अनुभूती आणि तिचा अर्थ वेगवेगळा आहे. व्यक्ती आणि तिचा भवताल यांच्या संयोगातून हे सर्व घडत असते. मग काही व्यक्ती शरीराच्या पातळीवर, काही लोक मनाच्या पातळीवर, तर काही लोक उन्मनी अवस्थेमध्ये राहतात. त्यामुळे ज्या पातळीवर राहतो, त्या पातळीवरचे अनुभव घनदाट होतात. प्रतिदिन हा अनुभवाचा स्तर वाढत जाऊन वैश्विक सत्याच्या अनुभूतीपर्यंत पोहोचणे, ही परिपक्वता आहे. ही परिपक्वता सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. कारण, व्यक्तीला येणारा अनुभव हा त्याची परिस्थिती, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती आणि त्याच्यासोबत घडणाºया घटना यांच्या संयोगातून येत असतो. त्यामुळे त्यावर त्याची अनुभूती ठरत असते. मी फुलांचा व्यापारी आहे आणि गुलाबांची बाग पाहिली की माझा अनुभव फुलांचा दर ठरवेल. मी गुलकंदाची निर्मिती करतो, तर त्याच फुलांचा माझा अनुभव या फुलांपासून गुलकंद किती होईल हे ठरवितो. मी भक्त आहे, तर ईश्वराच्या निर्मितीने मला आश्चर्य वाटून मी नतमस्तक होईन. परिपक्वतेसाठी समग्रतेने आकलन होणे आणि त्याच समग्रतेच्या अनुभवात अंतर्बाह्य भरून राहणे, हेच तर ज्ञान्याचे ध्येयअसते. हे अनुभवाचे सुखच विधायक अनुभूतीकडे घेऊन जाते. म्हणून माउली म्हणतात,‘‘का जे यया मनाचे एक निकेजे देखिले गोडीचिया ठाया सोके,म्हणौनि अनुभव सुखाचे कवतिकेदावीत जाईजे’’हीच व्यापक अनुभूती, हे विश्वच माझे घर आहे आणि चराचरामध्ये मीच आहे, याचा निश्चय होऊन आनंद भोगत जगतो.