शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

तुळशीची पाने खुडताना 'हे' नियम कायम लक्षात ठेवा आणि त्यांचे पालन करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 14:36 IST

तुळशीची पूजा आपण रोज करतोच, त्याबरोबरीने तिला आवडणाऱ्या व न आवडणाऱ्या गोष्टीही आपण जाणून घेतल्या पाहिजेत!

हिंदू धर्मात तुळशीला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीची पूजा विधीपूर्वक केली जाते त्या घरात लक्ष्मी नेहमी वास करते. त्यामुळे तुळशीच्या रोपाला रोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. रोज देवपूजेत तुळशी दल श्रीकृष्णाला अर्पण करावे. तसे केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. शास्त्रात तुळशीच्या पूजेचे महत्त्व विस्ताराने सांगितले आहे. तसेच तुळशीची पाने खुडताना पाळावयाचे काही नियम सांगण्यात आले आहेत. 

तुळस तोडताना या गोष्टी लक्षात ठेवा

>>शास्त्रानुसार रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. कारण तो भगवान विष्णूंचा दिवस असतो व त्यांना तुळशी प्रिय असते. म्हणून तिला झालेला अपाय त्यांना सहन होत नाही. 

>>रविवारीही तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये. असे मानले जाते की रविवारी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. अशा स्थितीत पाणी दिल्यास तिचा उपवास मोडला जातो, अशी भावना आहे. शास्त्रीय दृष्ट्या पाहिले, तर तुळशीच्या रोपाला अतिरिक्त पाणी मानवत नाही. म्हणून एक दिवस आराम देऊन बाकी दिवसात आवश्यक तेवढेच पाणी घालावे. 

>>विष्णु पुराणानुसार एकादशी, द्वादशी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या दिवशी तुळशीची पाने खुडू नयेत. 

>>शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळीही तुळशीची पाने तोडू नयेत. कारण तुळशी हे राधेचे रूप मानले जाते. असे म्हटले जाते की संध्याकाळी राधा श्रीकृष्णासोबत विहार करते. ज्या दारात तुळशीपाशी दिवा लावला असेल त्या घरात जाते. अशा वेळी तुळशी तोडून तिचा अपमान करू नये. 

>>आंघोळ केल्याशिवाय तुळशीला कधीही स्पर्श करू नये. तिचे पावित्र्य जपले पाहिजे. तुळशीचे रोप कुंडीत तग धरत नसेल तर वाहत्या पाण्यात ते सोडून या. मात्र पाने नसलेली कोरडी तुळस घरात ठेवू नका. नकारात्मकता वाढते. 

>>भगवान विष्णूच्या सर्व अवतारांना तुळशीची पाने अर्पण करावीत. परंतु श्रीगणेश आणि शंकराला अर्पण करू नये.