शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

कर्म करताना कायम भान ठेवा, देव सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवत असतो; जसे की हे उदाहण घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:18 IST

देवाचा हिशोब पक्का असतो, त्यातून कोणाचीही सुटका नसते!

एक फकीर आपल्या स्वानंदात मदमस्त होत राम नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता . पावसाचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न आणि थंडगार होते. फकीर गाणी गात एका हलवायाच्या दुकानासमोरून जात होता.

त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलबी आणि खमंग समोशांचा वास येत होता. फकीराची भूक चाळवली. तो क्षणभर तिथे घुटमळला पण जास्त वेळ थांबला नाही. हलवायाने ही बाब हेरली आणि पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला. तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद देऊन फकीर पुन्हा आनंदात रामनाम घेत पुढे निघाला.

रसनातृप्ती केल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आणि हलवायलाचे पुन्हा आभार मानले. आनंदाच्या भरात त्याने रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलांसारखी उडी मारली. त्याला गंमत वाटली. पण पुढच्याच क्षणी एका माणसाने त्याची गचांडी आवळली आणि म्हणाला, `काही अक्कल आहे का? तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली.' असे म्हणत त्याने फकिराच्या सणकन मुस्कटात लगावली. 

काही क्षणांपूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला, `देवा, तुझी लिला न्यारी. कधी गरमागरम जिलबी, समोसे खाऊ घालतोस, तर कधी सणसणीत चपराख!' चिखलाने माखलेला फकीर स्वत:वर हसत हसत उठला. 

त्याला मारून पुढे गेलेला बाईकस्वार काही अंतरावर बाईकवरून घसरून पडला. डोके दगडावर आपटले, रक्त येउ लागले. लोक गोळा झाले. त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याला सावरू लागली. जमा झालेल्या गर्दीला म्हणाली, `त्या फकिराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार!'

लोकांना हातसफाईला निमित्त मिळाले. गर्दी फकीराच्या दिशेने धावली. ती त्याला मारणार, तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला, `मला जरूर मारा, पण माझा अपराध काय ते तरी आधी सांगा!' गर्दीने दूर बोट दाखवत त्या दाम्पत्याला शाप दिल्याचे म्हटले. 

त्यावर हसून फकीर म्हणाला, `माझ्या शापाने काय होणारे? हा तर देवाचा हिशोब होता, त्याने तो पूर्ण केला. त्या माणसाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारले, तसे देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही, म्हणून त्याला शिक्षा दिली. हिशोब पूर्ण झाला!'

म्हणून लोकहो, कर्म करताना कायम भान ठेवा, देव सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवतो आणि गुण-दोष, सत्कर्म, कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो.